कसोटी सामन्यांची संख्या वाढवणे गरजेचे

भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरचे वक्तव्य


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्काय स्पोर्ट्स क्रिकेट पॉडकास्टवर याबाबत बोलताना हरमनप्रीत म्हणाली, “यावर्षी आमच्याकडे दोन कसोटी सामने आहेत, एक इंग्लंडविरुद्ध आणि एक ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि मला आशा आहे की या सामन्यांचा महिला क्रिकेटवर मोठा प्रभाव पडेल. मात्र, आताच्या काळात एवढेच सामने पुरेसे नाहीत त्यामुळे कसोटी सामन्यांची संख्या वाढवणे गरजेचे असल्याचे मत भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने व्यक्त केले. एका क्रीडा ग्रुपने हरमनप्रीतशी संवाद साधला. त्यावेळी तिने कसोटी क्रिकेटची निकड व्यक्त केली.


भारतीय महिला संघ २०२२-२५ दरम्यान चालणाऱ्या वर्तमान फ्यूचर टूर्स प्रोग्राम चक्रामध्ये सर्वात लांब फॉरमॅटमध्ये स्पर्धा करणाऱ्या चार संघांमध्ये सर्वात कमी कसोटी सामने खेळणारा फक्त भारतीय संघ आहे. बाकी इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे भारतापेक्षा अधिक कसोटी सामने खेळणार आहेत. या पार्श्वभूमीवर हरमनप्रीत म्हणाली की, कसोटी क्रिकेट स्वरूपातील अधिक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत सामने खेळले जायला पाहिजेत. आगामी काळात टीम इंडिया फक्त ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्धचा कसोटी मालिका खेळणार आहे.


हरमनप्रीत म्हणाली की, आम्हाला महिला क्रिकेटमध्ये कसोटी सामने परत आणावे लागतील. कारण महिला क्रिकेटसाठी ते खूप महत्त्वाचे आहे. २०२३-२४ हंगामात भारताला मायदेशात दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. संघाने याआधी २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटची कसोटी खेळली होती. सध्याच्या एफटीपीमध्ये इंग्लंड सर्वाधिक पाच कसोटी सामने खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका चार आणि तीन कसोटी खेळणार आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

६,६,६,६,६- श्रीलंकेविरुद्ध अफगाणच्या या क्रिकेटरने केली कमाल

अबू धाबी: आशिया कप २०२५ मध्ये श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील 'करो वा मरो' सामन्यात अफगाणिस्तानचा अनुभवी

नीरज चोप्राने पाकिस्तानच्या अर्शद नदीमला मैदानात दिला नाही भाव

मुंबई: जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५मध्ये आज भालाफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये सगळ्यांच्या नजरा नीरज

IND vs PAK : हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला!

मुंबई : भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात झालेल्या सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंनी हस्तांदोलन करण्यास नकार

India A vs Australia A : ध्रुव जुरेलची कमाल, ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध ठोकले शतक

लखनऊ: ऑस्ट्रेलिया 'अ' विरुद्ध सुरू असलेल्या चार दिवसीय कसोटी सामन्यात भारताचा युवा यष्टीरक्षक-फलंदाज ध्रुव

World Athletics Championship: कोण आहे सचिन यादव? ज्याने नीरज चोप्रालाही टाकले मागे

सचिन यादवची जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ मध्ये चमकदार कामगिरी! नवी दिल्ली: भारताचा उदयोन्मुख भालाफेकपटू

Asia Cup 2025 : पाकिस्तान 'सुपर-४' मध्ये, आता पुन्हा भारताशी होणार 'महामुकाबला'

दुबई: आशिया कप २०२५ स्पर्धेत पाकिस्तानने यूएईचा ४१ धावांनी पराभव करत 'सुपर-४' फेरीमध्ये आपले स्थान निश्चित केले