मुंबईत साथीच्या आजारांचे रुग्ण वाढले

मलेरिया, डेंग्यूसह स्वाईन फ्लूचाही धोका!


मुंबई : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांचा फैलाव झपाट्याने होत असून, स्वाईन फ्लूचा धोका वाढला आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात स्वाईन फ्लूच्या ५६ रुग्णांची नोंद झाली आहे, तर मलेरिया २२६, डेंग्यू १५७, लेप्टोचे ७५ रुग्णांची नोंद झाली आहे.


मुंबईत पावसाने विश्रांती घेतली असली, तरी पावसाळी आजार बळावत असल्याने साथीच्या आजारांचे रुग्ण वाढले आहेत.
-
जून महिना कोरडा गेल्याने यंदा पावसाळ्यात उद्भविणाऱ्या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव कमी होईल असे वाटत होते. मात्र, संपूर्ण जुलै महिन्यात डेंग्यूचे ५७९, मलेरियाचे ७२१, लेप्टोचे ३७७, गॅस्ट्रोचे १६४९, कावीळ १३८, स्वाईन फ्ल्यू ८६ आणि चिकनगुनियाचे २४ रुग्ण आढळले होते. ही रुग्णवाढ ऑगस्टमध्येही कायम असून, सर्वच पावसाळी आजारांची संख्या वाढल्याचे आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.



तीन हजार खाटा तैनात


पावसाळी आजारांच्या पार्श्वभूमीवर प्रमुख आणि उपनगरीय रुग्णालयात एकूण तीन हजार बेड तैनात ठेवण्यात आले आहेत. यामध्ये उपनगरीय रुग्णालयात विशेष ५०० बेडही तैनात आहेत. तसेच संध्याकाळी ४ ते ६ वा. पर्यंत ओपीडी सुरू ठेवण्यात येत आहे. शिवाय, कीटकनाशक विभागाकडूनही पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धूम्र फवारणी मोहीम व्यापकपणे राबविण्यात येत आहे.



आठवड्याभरात आढळलेले रुग्ण


मलेरिया २२६
डेंग्यू १५७
लेप्टो ७५
स्वाईन फ्लू ५६
गॅस्ट्रो २०
चिकनगुनिया - ९
कावीळ ६



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

ब्रँड विरुद्ध ब्रँडी: फडणवीस-ठाकरे गटात शाब्दिक युद्ध, राजकारण तापले!

मुंबई: बेस्ट (BEST) निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात 'ब्रँड' विरुद्ध 'ब्रँडी' असा नवा वाद सुरू झाला आहे.

मेट्रोमुळे टॅक्सी आणि रिक्षा चालक धास्तावले!

'मेट्रो लाइन ३' दक्षिण मुंबईतील प्रवासात क्रांती घडवेल मुंबई: दक्षिण मुंबईत सध्या विकसित होत असलेली 'मेट्रो लाइन

मुंबई भाजपची डबेवाल्यांसाठी नेत्र तपासणी शिबिर, 'आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा' उपक्रमाची सुरुवात

पुढील दिवसांत भाजप कार्यकर्ते घरोघरी जाऊन मुंबईकरांचे अभिप्राय आणि मते जाणून घेतील - अमीत साटम मुंबई :

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल गणेशोत्सव झाला कि वेध लागतात नवरात्रीचे.

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र