Chitra Wagh : उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र आणि पक्षासाठी नष्टर!

भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या ट्विटने लक्ष वेधले


मुंबई : उद्धव ठाकरे महाराष्ट्र आणि पक्षासाठी नष्टर असल्याची टीका भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केली आहे. यासंदर्भात वाघ यांनी ट्विट केले आहे.


काल मुंबईत संभाजी ब्रिगेडने आयोजित केलेल्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता मस्टरमंत्री झाल्याचे म्हणत डिवचले होते. त्यानंतर आता भाजप नेत्यांकडून उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली जात आहे.





चित्रा वाघ ट्विटमध्ये म्हणाल्या, “स्वतःच्या पक्षासाठी डिझास्टर ठरलेल्या उद्धव ठाकरेंना @uddhavthackeray मस्टर आणि मास्टर ब्लास्टरमधला फरक तो काय कळणार? तुम्ही मुख्यमंत्रीपदी असताना पक्षातील आमदार खासदारांना सांभाळता आले नाही, यापेक्षा मोठं डिझास्टर काय असू शकतं आणि विरोधी पक्षात असताना एकही आमदार देवेंद्र फडणवीसजी @Dev_Fadnavis यांना सोडून गेला नाही, यापेक्षा उत्तम नेतृत्व ते काय असू शकतं?


देवेंद्रजींनी विरोधी पक्षनेते असताना तुमच्या तिघांच्याही दांड्या उडवल्या आणि सत्तेत असताना निर्णयाचे चौकार-षटकार लगावले. देवेंद्रजी मस्टर नव्हे, तर मास्टर ब्लास्टर मंत्री आहेत, हे लक्षात ठेवा. तुम्ही मात्र राज्य आणि स्वत:चा पक्ष या दोघांसाठीही नष्टर आहात, हेही विसरू नका. अभ्यास कच्चा असल्यामुळे नापास झालेल्या विद्यार्थ्याने मेरिटमध्ये आलेल्यांवर बोलायचे नसते.”



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

MHADA Lottery : म्हाडाच्या दोन हजार ६४० सदनिकांसाठी निघणार सोडत, ७५ हजार १२७ अर्जदारांचे लक्ष

मुंबई : म्हाडा मुंबई (MHADA Mumbai) मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील २,६४० सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत (MHADA

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय! पुढील ४ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज-यलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम

Anil Kakodkar : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती

- 'जीएमआरटी' दुर्बिणीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणार; ६० दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई :

Sindhu Mahakumbh : सिंधू महाकुंभाच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या संदेशाचा महाराष्ट्रात गौरव; राज्यपालांच्या हस्ते इंद्रेश कुमार आणि पाल्गा रिंपोचे यांचा सन्मान

मुंबई : लडाख येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या सिंधू महाकुंभ (Sindhu Mahakumbh) उपक्रमाने राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक

Analog Paneer : पनीरच्या ३२ टक्के नमुन्यांमध्ये भेसळ, 'ॲनालॉग पनीर'मध्ये वनस्पती चरबीचा वापर

मुंबई : राज्यात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बाजारपेठेतून घेतलेल्या पनीरच्या नमुन्यांपैकी तब्बल ३२ टक्के नमुने

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी घेतला करंजा मत्स्य बंदर प्रकल्पाचा आढावा

- ४ हजार ५०० मेट्रिक टन मत्स्य उत्पादन हाताळण्याची क्षमता; अत्याधुनिक यंत्रणेसह अनुभवी मनुष्यबळाचा वापर