Bhalchandra Nemade speech : औरंग्याला मोठं करणार्‍यांना आमच्या देशामध्ये पुरस्कार द्यायचे का?

नितेश राणे यांचा खडा सवाल


ठाकरे पिता-पुत्रांचाही घेतला समाचार


मुंबई : ज्ञानपीठ पुरस्काराचे विजेते आणि कोसला कादंबरीचे लेखक भालचंद्र नेमाडे (Bhalchandra Nemade) यांनी एका कार्यक्रमात बोलताना अनेक वादग्रस्त वक्तव्यं केली आहेत. यामुळे हिंदू मने दुखावली गेली असून अशा लोकांना पुरस्कार द्यायचा का असा थेट सवाल भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उपस्थित केला आहे. तसेच आता मुंबईतील टोलविषयी बोलणार्‍या व गुजराती आणि मारवाडी लोकांवर द्वेष दाखवणार्‍या ठाकरे पिता-पुत्रावरही हल्लाबोल चढवला आहे.


नितेश राणे म्हणाले, काही दिवसांपूर्वी भालचंद्र नेमाडे यांनी औरंग्याला मोठं करण्याच्या आणि इतिहासामध्ये शिवरायांना औरंग्यापेक्षा लहान दाखवण्याच्या षडयंत्राला खतपाणी घातले. औरंग्या हिंदूद्वेष्टा नव्हता, असं भालचंद्र नेमाडे एका कार्यक्रमात म्हणाले. ज्याने हिंदूंची मंदिरं तोडली, हिंदू महिलांवर, समाजावर अत्याचार केला, धर्मांतरं घडवून आणली अशा औरंग्याला मोठं करण्याचं जे काम महाराष्ट्रात चाललं आहे, त्याला खतपाणी घालण्याचं काम भालचंद्र नेमाडेंसारख्या लोकांकडून होत आहे. अशा लोकांना आमच्या देशामध्ये पुरस्कार द्यायचे का? आणि दिलेले पुरस्कार सरकारने परत घेतले पाहिजेत, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.



सगळे कॉन्ट्रॅक्ट हायवे कन्स्ट्रक्शनलाच का?


संजय राऊत सकाळच्या पत्रकार परिषदेत असे किंवा सामनामध्ये असो, केंद्रीय गृहमंत्री असलेल्या अमित शाहांना महाराष्ट्र किती कळतो यावर आपले अकलेचे तारे चमकवलेले आहेत. तेव्हा जशी ब्रिटीशांची ईस्ट इंडिया कंपनी होती तशी या ठाकरेंची हायवे कन्स्ट्रक्शन कंपनी आहे का? कारण कोविडचा काळ असो किंवा महापालिकेच्या यांच्या सत्तेचा काळ असो, सगळे कॉन्ट्रॅक्ट फक्त हायवे कन्स्ट्रक्शनला देण्यात यायचे. पण मग वैभव चेम्बर्समध्ये बसून कोण कोण किती किती गुजराती आणि मारवाडी व्यापार्‍यांना भेटायचा याची माहिती आम्ही महाराष्ट्राला देऊ का? असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला.



पुन्हा वसुली चालू करायचा हा धंदा


आज गुजराती आणि मारवाडी लोकांवर जो द्वेष दाखवला जातोय, मातोश्री २ हे कुठल्या गुजराती आणि मारवाडींच्या पैशांवर तयार झालंय याची थोडी माहिती द्यावी. कालपासून जो पेंग्विन तडफडतोय, काल त्याने पत्रकार परिषद घेऊन मुंबईतील टोल बंद करावेत असं म्हटलं. मातोश्रीतील टोल बंद झाल्यामुळे आता या लोकांना मुंबईतील टोल आठवले आहेत. सगळं खर्चपाणी बंद झाल्याने अप्रत्यक्ष पद्धतीने कॉन्ट्रॅक्टरांना यानिमित्ताने भडकवायचं आणि परत हप्ते चालू करायचे, वसुली चालू करायची हा त्यांचा धंदा आहे, असा आरोप नितेश राणे यांनी केला.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

चित्र साकारताना कल्पनाशक्तीची ज्योत सतत तेवत ठेवा; शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांचा संदेश

मुंबई: चित्रकला म्हणजे मनातील विचारांना कागदावर उतरविण्याचे साधन असते. यात निसर्गातील विविध रंगांसह आपल्या

मुंबई महापालिका रुग्णालयांमधील मिळणार खाटांची माहिती; डॅशबोर्डची सेवा उपलब्ध करून देणार

मुंबई: नागरिकांना महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपलब्ध रुग्णशया व अतिदक्षता विभागातील रुग्णाशय्या इत्यादी

घाटकोपरवासियांचा १० एप्रिल २०२६ पासून पाणीपुरवठा पूर्ववत; पुढील काही दिवस उकळून प्यावे लागणार पाणी

मुंबई: घाटकोपर (पश्चिम) येथील घाटकोपर निम्नस्तरीय जलाशयातील दोन कप्प्याच्या दुरुस्तीचे काम महानगरपालिकेच्या

MLA Amit Satam सीसी रस्त्यांमुळे खड्डे दुरुस्तीवरील खर्चात जवळपास ७० टक्क्याहून अधिक घट — भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम

आमदार अमीत साटम यांनी घेतला सीसी रस्त्यांच्या कामांचा आढावा मुंबई : भाजप-नेतृत्वाखालील महायुती सरकारकडून

Matunga Fire : माटुंगा वर्कशॉपमध्ये ट्रेनच्या डब्यांना भीषण आग; धुरामुळे परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : मुंबईतील माटुंगा रेल्वे वर्कशॉप येथे आज म्हणजेच मंगळवार ७ एप्रिल रोजी दुपारी उभ्या असलेल्या ट्रेनच्या

रंगांमधून उमलणारी स्वप्नं : जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये

दिव्यांग कलाकारांसाठी ‘विविधतेचा उत्सव’ मुंबई : कॅनव्हासवर रंग उमटत होते, पण ते केवळ चित्र