Edelweiss Company : नितीन देसाई आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या एडलवाईज कंपनीचे शेअर्स घसरले...

या प्रकरणात कंपनीचं म्हणणं काय?


मुंबई : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्यानंतर (Nitin Desai Suicide Case) त्यांच्या आत्महत्येची कारणे समोर येत आहेत. एडलवाईज कंपनीकडून (Edelweiss Company) घेतलेले कर्ज फेडता न आल्याले कंपनीने नितीन देसाईंचा मानसिक छळ केला आणि त्यातूनच नितीन यांनी आत्महत्या केली, असे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. तसेच त्यांच्या कुटुंबियांनीही एडलवाईज कंपनीवर नितीन देसाई यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे.


नितीन देसाई कर्जाची रक्कम फेडण्यास तयार होते असे कुटुंबियांचे म्हणणे आहे. नितीन देसाईंची पत्नी नेहा (Neha Desai) यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून, त्यात त्यांनी म्हटले आहे की, ईसीएल फायनान्स कंपनी आणि एडलवाईस ग्रुपने कर्ज वसुलीसाठी नितीन देसाईंवर मानसिक दबाव टाकला, त्यामुळे त्यांनी हे मोठे पाऊल उचलले. कंपनीने तोडगा काढण्याचा प्रयत्न न करता केवळ त्रास दिला. नितीन देसाईंची पत्नी नेहा यांनी एडलवाईस ग्रुप आणि ईसीएल फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांसह पाच जणांविरुद्ध लेखी तक्रार दिली होती आणि एफआयआर दाखल केला होता.



कंपनीचं म्हणणं काय ?


याप्रकरणी कंपनीच्या वक्तव्यानुसार, कलादिग्दर्शकावर कोणताही दबाव टाकण्यात आला नव्हता. कंपनीने जास्त व्याजही घेतले नव्हते असे निवेदन देखील कंपनीने प्रसिद्ध केले आहे. एडलवाईस कंपनीने स्टॉक मार्केटला (Stock Market) पत्र पाठवून सांगितले की, आर. बी. आय. (RBI) च्या नियमांनुसारच कायद्यामध्ये राहून कारवाई केली होती. कोणत्याही कर्जदारावर कर्ज वसुलीसाठी दबाव टाकला नाही. असं या पत्रात नमुद केलं आहे. मात्र, या प्रकरणानंतर एडलवाईस कंपनीचे शेअर्स ८५ पैशांनी घसरले आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

खोकल्याच्या सिरपमुळे बालकांचा मृत्यू; खबरदारीसाठी राज्याने 'हा' टोल-फ्री क्रमांक केला जारी!

मुंबई: मध्य प्रदेश आणि राजस्थानसह देशातील काही राज्यांमध्ये 'कोल्ड्रिफ' (Coldrif) नावाच्या खोकल्याच्या सिरपमुळे काही

लाडक्या बहिणींची 'ई केवायसी'तील तांत्रिक अडचण लवकर दूर करणार, मंत्री आदिती तटकरेंचे आश्वासन

मुंबई(प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता 'ई-केवायसी' बंधनकारक केली आहे.

ठाकरे बंधूंची मात्रोश्रीवर भेट, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. शिवसेना

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करता येणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ते मालाड या पट्ट्यात प्रचंड लोकवस्ती आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय,

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात