Edelweiss Company : नितीन देसाई आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या एडलवाईज कंपनीचे शेअर्स घसरले...

या प्रकरणात कंपनीचं म्हणणं काय?


मुंबई : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्यानंतर (Nitin Desai Suicide Case) त्यांच्या आत्महत्येची कारणे समोर येत आहेत. एडलवाईज कंपनीकडून (Edelweiss Company) घेतलेले कर्ज फेडता न आल्याले कंपनीने नितीन देसाईंचा मानसिक छळ केला आणि त्यातूनच नितीन यांनी आत्महत्या केली, असे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. तसेच त्यांच्या कुटुंबियांनीही एडलवाईज कंपनीवर नितीन देसाई यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे.


नितीन देसाई कर्जाची रक्कम फेडण्यास तयार होते असे कुटुंबियांचे म्हणणे आहे. नितीन देसाईंची पत्नी नेहा (Neha Desai) यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून, त्यात त्यांनी म्हटले आहे की, ईसीएल फायनान्स कंपनी आणि एडलवाईस ग्रुपने कर्ज वसुलीसाठी नितीन देसाईंवर मानसिक दबाव टाकला, त्यामुळे त्यांनी हे मोठे पाऊल उचलले. कंपनीने तोडगा काढण्याचा प्रयत्न न करता केवळ त्रास दिला. नितीन देसाईंची पत्नी नेहा यांनी एडलवाईस ग्रुप आणि ईसीएल फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांसह पाच जणांविरुद्ध लेखी तक्रार दिली होती आणि एफआयआर दाखल केला होता.



कंपनीचं म्हणणं काय ?


याप्रकरणी कंपनीच्या वक्तव्यानुसार, कलादिग्दर्शकावर कोणताही दबाव टाकण्यात आला नव्हता. कंपनीने जास्त व्याजही घेतले नव्हते असे निवेदन देखील कंपनीने प्रसिद्ध केले आहे. एडलवाईस कंपनीने स्टॉक मार्केटला (Stock Market) पत्र पाठवून सांगितले की, आर. बी. आय. (RBI) च्या नियमांनुसारच कायद्यामध्ये राहून कारवाई केली होती. कोणत्याही कर्जदारावर कर्ज वसुलीसाठी दबाव टाकला नाही. असं या पत्रात नमुद केलं आहे. मात्र, या प्रकरणानंतर एडलवाईस कंपनीचे शेअर्स ८५ पैशांनी घसरले आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या

मुंबईकरांना यंदा पाण्याचे ‘नो टेन्शन’

पुरवठा करणाऱ्या धरण, तलाव क्षेत्रांतील पाणीसाठा ९८.४० टक्के शेवटच्या १७ दिवसांत १.६० टक्के साठ्याचे

Rain Update : आठवड्याच्या शेवटी पावसाने धरला जोर, अनेक ठिकाणी कोसळधारा, हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पावसाच्या जोरदार सरी कोसळत