वर्सोव्यात मच्छिमारांची होडी बुडाली

एकाचा मृत्यू, एक बेपत्ता, एक बचावला


मुंबई (प्रतिनिधी) : वर्सोवा वेसावे गावातील देवाचीपाडा येथील समुद्रात शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास मासेमारी करून परतत असलेली होडी बुडाली. या होडीत तिघे जण होते, त्यापैकी एकाला पोहोता येत असल्याने त्याने समुद्र किनारा गाठल्याने बचावला. तर एकाचा मृतदेह रविवारी दुपारी लाईफ गार्डना आढळला असून शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर तिसऱ्याचा शोध सुरू असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.


वेसावे गावातील देवाचीवाडीमधील विजय बमानिया (३५), उस्मानी भंडारी (२२) आणि विनोद गोयल (४५) हे मासेमारीहून शनिवारी रात्री ८ च्या सुमारास परतत असताना त्यांची होडी वर्सोवा किनाऱ्यापासून ३ किलोमीटरवर बुडाली. यातील विजय बमानियाने पोहत येऊन मढ किनारा गाठला आणि झालेला प्रकार ग्रामस्थांना सांगितला. ग्रामस्थांनी तत्काळ याची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर अग्निशमन दल, जीवरक्षक, स्थानिक मच्छीमारांनी बुडालेल्या उस्मानी भंडारी आणि विनोद गोयल यांचा शोध सुरू होता. दरम्यान, दुपारी यातील विनोद गोयल यांचा मृतदेह जीवरक्षकांच्या हाती लागला. शवविच्छेदनासाठी तो कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला. दरम्यान, विनोद गोयल यांचा मृत्यू झाल्याचे कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी सांगितले.


शनिवारी रात्रीपासून अग्निशमन दल, जीवरक्षक आणि स्थानिक मच्छीमारांकडून तसेच नौदलाच्या हेलिकॉप्टरमधूनही शोध सुरू होता. दोरखंड, हूक आणि विविध प्रकारच्या साहित्याचा वापर करण्यात आला. मात्र, समुद्राला आलेल्या भरतीमुळे रविवारी दुपारी १ वाजता शोधमोहीम थांबवण्यात आली.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

Bhandup Bus Accident : भांडुप बस दुर्घटना; बस अपघातातील मृतांची नावं समोर, अवघ्या २५ वर्षांच्या तरुणीसह चौघांचा करुण अंत!

मुंबई : भांडुप पश्चिमेला रेल्वे स्थानकाजवळ काल रात्री १० च्या सुमारास काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली.

Snehal Jadhav : मुंबईत 'मनसे'ला मोठा धक्का; स्नेहल जाधव आणि सुधीर जाधव यांचा शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश!

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, महाराष्ट्र नवनिर्माण

पश्चिम रेल्वेचे प्रवासी-केंद्रित विकासाचे ऐतिहासिक वर्ष

२०२५ मुंबई : २०२५ हे वर्ष पश्चिम रेल्वेसाठी एक ऐतिहासिक आणि परिवर्तनकारी वर्ष म्हणून उदयास आले. हे वर्ष

राष्ट्रपतींचा 'आयएनएस वाघशीर'मधून प्रवास

मुंबई : भारतीय सशस्त्र दलांच्या सर्वोच्च कमांडर आणि भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी अरबी

पश्चिम रेल्वेवर आजपासून विविध मार्गांवर रेल्वे ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेने कांदिवली आणि बोरिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गाच्या बांधकामासाठी १८ जानेवारी २०२६

आरे ते कफ परेड मेट्रो रात्रभर धावणार

बुधवारी मेट्रोच्या विशेष फेऱ्यांचे नियोजन मुंबईकरांचा प्रवास होणार सुखकर मुंबई : नववर्षाच्या स्वागतासाठी