आरे ते कफ परेड मेट्रो रात्रभर धावणार

बुधवारी मेट्रोच्या विशेष फेऱ्यांचे नियोजन


मुंबईकरांचा प्रवास होणार सुखकर


मुंबई : नववर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री सेलिब्रेशनसाठी बाहेर जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मेट्रोची ‘ॲक्वालाईन’(मेट्रो-३) म्हणजेच आरे ते कफ परेड ही मेट्रो रात्रभर सुरू राहणार आहे. यामुळे मध्यरात्री घरी परतणाऱ्या प्रवाशांना आता टॅक्सी किंवा रिक्षाच्या प्रतीक्षेत राहण्याची गरज भासणार नाही.


ही विशेष सेवा ३१ डिसेंबर रोजी रात्री १०.३० वाजल्यापासून सुरू होईल ते १ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ५.५५ वाजेपर्यंत सातत्याने सुरू राहणार आहे. त्यानंतर, १ जानेवारीची नियमित मेट्रो सेवा सकाळी ५.५५ वाजल्यापासून नेहमीप्रमाणे सुरू होईल. मुंबईकरांना ३१ डिसेंबरच्या सकाळी सुरू झालेली सेवा थेट १ जानेवारीच्या रात्रीपर्यंत सलग उपलब्ध मिळणार आहे.


नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. अशावेळी रस्त्यांवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि प्रवाशांना विनासायास प्रवास करता यावा, यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे. विशेषतः महिला आणि कुटुंबियांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मेट्रोचा हा रात्रभराचा प्रवास अत्यंत सोयीचा ठरणार आहे. नववर्षाचा आनंद साजरा करताना मेट्रोच्या नियमांचे पालन करावे आणि या विशेष सुविधेचा लाभ घ्यावा, असे मेट्रो प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे.

Comments
Add Comment

BMC Staff : महानगरपालिका कर्मचारीच स्व-गणना सदिच्छादूत

मेट्रो, रेल्वे, बस स्थानक, सार्वजनिक ठिकाणी स्व-गणना संदर्भात जनजागृती  मुंबई (विशेष प्रतिनिधी) : आतापर्यंत

Water Cut : ग्रॅण्टरोड, गिरगांव भायखळा, महालक्ष्मी,वरळी आदी काही भागांमध्ये शुक्रवारीही पाणीपुरवठा राहणार बंद

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : डॉ. ई. मोझेस मार्गावरील फेमस स्टुडिओसमोर असलेल्या १६५० मिलिमीटर व्यासाच्या मुख्य

BJP : शुक्रवारपासून भाजप नालेसफाईच्या पाहणी मोहिमेवर..

मुंबई अध्यक्ष, पालकमंत्री, नगरसेवक महापालिका अधिकाऱ्यांसमवेत करणार पाहणी मुंंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील

SSC Result : कधी आहे दहावीचा निकाल ? आली मोठी अपडेट

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) दहावीच्या परीक्षेचा निकाल

Mumbai Pydhonie Family News : ना कलिंगड, ना बिर्याणी, उंदिर मारण्याच्या औषधामुळे पायधुनीतील 'त्या' चौघांचा मृत्यू

मुंबई : पायधुनी भागात २६ एप्रिल रोजी एकाच कुटुंबातील चार जणांचा बिर्याणी आणि कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यू झाला

Mumbai Water Metro : मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाविषयी काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस ?

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील वाढत्या वाहतूक गरजांसाठी शाश्वत आणि पर्यावरणपूरक जलवाहतूक व्यवस्था उभारण्याचा