आरे ते कफ परेड मेट्रो रात्रभर धावणार

बुधवारी मेट्रोच्या विशेष फेऱ्यांचे नियोजन


मुंबईकरांचा प्रवास होणार सुखकर


मुंबई : नववर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री सेलिब्रेशनसाठी बाहेर जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मेट्रोची ‘ॲक्वालाईन’(मेट्रो-३) म्हणजेच आरे ते कफ परेड ही मेट्रो रात्रभर सुरू राहणार आहे. यामुळे मध्यरात्री घरी परतणाऱ्या प्रवाशांना आता टॅक्सी किंवा रिक्षाच्या प्रतीक्षेत राहण्याची गरज भासणार नाही.


ही विशेष सेवा ३१ डिसेंबर रोजी रात्री १०.३० वाजल्यापासून सुरू होईल ते १ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ५.५५ वाजेपर्यंत सातत्याने सुरू राहणार आहे. त्यानंतर, १ जानेवारीची नियमित मेट्रो सेवा सकाळी ५.५५ वाजल्यापासून नेहमीप्रमाणे सुरू होईल. मुंबईकरांना ३१ डिसेंबरच्या सकाळी सुरू झालेली सेवा थेट १ जानेवारीच्या रात्रीपर्यंत सलग उपलब्ध मिळणार आहे.


नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. अशावेळी रस्त्यांवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि प्रवाशांना विनासायास प्रवास करता यावा, यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे. विशेषतः महिला आणि कुटुंबियांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मेट्रोचा हा रात्रभराचा प्रवास अत्यंत सोयीचा ठरणार आहे. नववर्षाचा आनंद साजरा करताना मेट्रोच्या नियमांचे पालन करावे आणि या विशेष सुविधेचा लाभ घ्यावा, असे मेट्रो प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे.

Comments
Add Comment

Madhuri Misal : ग्लोबल हॉस्पिटलचा अतिरिक्त FSI परत घेण्याबाबत कायदेशीर चाचपणी; विधान परिषदेत राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे उत्तर!

- २० वर्षे गरीब रुग्णांना खाटा न दिल्याचा मुद्दा गाजला; २१ जुलैच्या कोर्टाच्या सुनावणीनंतर शासन कडक पावले

Devendra Fadnavis : तपास न करताच वडील आणि भावावर हत्येचा गुन्हा, बेपत्ता मुलगी परतल्यानंतर पोलिसांचे बिंग फुटले

बुलढाण्यातील घटनेची विधानसभेत चर्चा; जबाबदार पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची

Devendra Fadnavis : 'आरटीओ' विभागातील गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी

 मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा; बजरंग खरमाटे प्रकरणात 'एसआयटी' स्थापन मुंबई : प्रादेशिक परिवहन (आरटीओ)

Narhari Zirwal : हाफकिनच्या आधुनिकीकरणासाठी २५ कोटींचा निधी मंजूर!

 खाजगी भागीदारीचा विचार नाही; मंत्री नरहरी झिरवाळ यांचे सकारात्मक स्पष्टीकरण मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेत

कातळशिल्पांचे संरक्षण करुनच विकास प्रकल्पांचा विचार करणार, मंत्री आशिष शेलारांनी दिली ग्वाही

मुंबई: मानवी उत्क्रांतीच्या इतिहासाचे महत्त्वाचे पुरावे असलेल्या कोकणातील कातळ शिल्पांचे पुर्ण संरक्षण करुनच

Powai Lake crocodile : पवई तलावाजवळील रहिवासी भागात मगर शिरली; वन विभागाच्या पथकाकडून सुखरूप रेस्क्यू

मुंबई : पवई तलावालगतच्या मोरारजी नगर परिसरात मंगळवारी सुमारे सात फूट लांबीची मगर ( Powai Lake crocodile)आढळल्याने परिसरात