पश्चिम रेल्वेवर आजपासून विविध मार्गांवर रेल्वे ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेने कांदिवली आणि बोरिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गाच्या बांधकामासाठी १८ जानेवारी २०२६ पर्यंत ३० दिवसांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे. या ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेच्या काही लोकल तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.


पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, ३० डिसेंबरच्या रात्रीपासून ते ६ जानेवारीपर्यंत वेगवेगळ्या मार्गांवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत अप जलद मार्गावर रात्री ११.१५ ते सकाळी ३.१५ वाजेपर्यंत ब्लॉक राहील. तसेच पाचव्या मार्गावर रात्री ११ ते सकाळी ३.३० वाजेपर्यंत ब्लॉक लागू असेल. डाउन जलद मार्गावरही वरील शटडाऊनच्या कालावधीत ब्लॉक घेण्यात येणार आहे.


या ब्लॉकदरम्यान काही लोकल गाड्या रद्द करण्यात येणार असून काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात येऊ शकतात. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी आपल्या गाडीची सद्यस्थिती तपासूनच प्रवास करण्याचे आवाहन पश्चिम रेल्वेतर्फे करण्यात आले आहे. सहावा मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय सेवांवरील ताण कमी होऊन प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

Comments
Add Comment

Dialysis facility : पश्चिम उनगरातील ३ आणि पूर्व उपनगरातील २ रुग्णालयात डायलेसिसची सुविधा

मुंंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतील उपनगरीय रुग्णालयांमध्ये डायलेसीस केंद्र सुरु करण्यात येत असून

Mumbai : मुंबई महापालिकेच्यावतीने विद्यार्थीनींसाठी कांदिवलीत वसतीगृह

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने गोरेगाव येथे नोकरदार महिलांसाठी वसतीगृह सुरु करण्यात

Education : 'महापालिकेचे शालेय भूखंड खासगी संस्थांना देऊच नका'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या माध्यमांतून शाळांच्या मोकळ्या जागा या खासगी

SIR साठी राजकीय पक्षांनीही स्थानिक भागांत मतदान केंद्रस्तरीय सहायकांची नेमणूक करा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भारत निवडणूक आयोग यांच्या निर्देशांनुसार, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात मतदार

BMC अतिरिक्त आयुक्तांनी दिली ॲक्वर्थ रुग्णालयाला अचानक भेट

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : ॲक्वर्थ महानगरपालिका कुष्ठरोग रुग्णालय येथे दीर्घकाळ उपचार घेणाऱ्या वयोवृद्ध

Atul Save : भटके-विमुक्त समाजाच्या समस्या निवारणासाठी त्रिस्तरीय समित्या

मुंबई : राज्यातील भटके-विमुक्त समाजाच्या समस्या प्रभावीपणे सोडविणे, त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे