खारघर सेक्टर-३० भागात बेकायदेशीरीत्या वास्तव्यास असलेल्या तीन बांग्लादेशी नागरिकांना दहशतवाद विरोधी पथकाच्या नवी मुंबई युनिटने बुधवारी अटक केली आहे. बादल मोईनुद्दीन खान (३८), कमल अहमद खान (३६) आणि अलीम युनूस शेख (४०) अशी या तिघांची नवे असून मागील काही महिन्यापासून हे तिघेही सदर ठिकाणी बेकायदेशीरीत्या वास्तव्यास असल्याचे आढळून आले आहे.
या कारवाईत अटक करण्यात आलेले तिघेही बांग्लादेशातील असून ते खारघर सेक्टर-३० ओवे गावच्या मागील भागात बेकायदेशीररीत्या राहत असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाच्या नवी मुंबई युनिटला मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे दहशतवाद विरोधी पथकाने बुधवारी खारघर सेक्टर-३० ओवे गावच्या मागील भागात साई पूजा सोसायटीत छापा मारला असता इथे तीन बांग्लादेशी नागरिक बेकायदेशीररीत्या राहत असल्याचे आढळून आले.
त्यानंतर पोलिसांनी या तिघांकडे चौकशी केली तेव्हा त्यांनी काही महिन्यांपूर्वी बांग्लादेशातून विनापासपोर्ट आणि वैध कागदपत्रांशिवाय बेकायदेशीररीत्या भारतात प्रवेश केल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी तिघा विरोधात खारघर पोलीस ठाण्यात विदेशी व्यक्ती अधिनियम तसेच पारपत्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल त्यांना अटक केली आहे.
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषकाचे (ITC T20 World cup) विजेतेपद पटकावल्याने देशवासीयांमध्ये आनंदाची…
पर्यटनासाठी आले आणि... पुणे : पावसाळा सुरु होताच अनेकजण पर्यटनाचं (Monsoon picnic) आयोजन करतात. मात्र,…
नवी मुंबई : महाराष्ट्र शासनामार्फत बेलापूर गावात होत असलेल्या विकास कामांचा पाहणी दौरा भाजपाच्या आमदार…
मुंबई : प्रत्येक महिन्याच्या १ तारखेपासून अनके गोष्टींच्या नियमांमध्ये (New Rules) बदल होतात. उद्यापासून म्हणजेच…
सुजाता सौनिक यांची झाली नियुक्ती मुंबई : राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्याच्या मुख्य सचिवपदी (Chief Secretary…
पुण्यात धक्कादायक प्रकारांचे सत्र सुरुच पुणे : पुण्यातील गुन्हेगारीचे (Pune crime) प्रमाण चिंताजनक झाले असतानाच…