खारघरमध्ये तीन अवैध बांग्लादेशी अटकेत

खारघर सेक्टर-३० भागात बेकायदेशीरीत्या वास्तव्यास असलेल्या तीन बांग्लादेशी नागरिकांना दहशतवाद विरोधी पथकाच्या नवी मुंबई युनिटने बुधवारी अटक केली आहे. बादल मोईनुद्दीन खान (३८), कमल अहमद खान (३६) आणि अलीम युनूस शेख (४०) अशी या तिघांची नवे असून मागील काही महिन्यापासून हे तिघेही सदर ठिकाणी बेकायदेशीरीत्या वास्तव्यास असल्याचे आढळून आले आहे.


या कारवाईत अटक करण्यात आलेले तिघेही बांग्लादेशातील असून ते खारघर सेक्टर-३० ओवे गावच्या मागील भागात बेकायदेशीररीत्या राहत असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाच्या नवी मुंबई युनिटला मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे दहशतवाद विरोधी पथकाने बुधवारी खारघर सेक्टर-३० ओवे गावच्या मागील भागात साई पूजा सोसायटीत छापा मारला असता इथे तीन बांग्लादेशी नागरिक बेकायदेशीररीत्या राहत असल्याचे आढळून आले.


त्यानंतर पोलिसांनी या तिघांकडे चौकशी केली तेव्हा त्यांनी काही महिन्यांपूर्वी बांग्लादेशातून विनापासपोर्ट आणि वैध कागदपत्रांशिवाय बेकायदेशीररीत्या भारतात प्रवेश केल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी तिघा विरोधात खारघर पोलीस ठाण्यात विदेशी व्यक्ती अधिनियम तसेच पारपत्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल त्यांना अटक केली आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.
Comments
Add Comment

महाविद्यालयीन शुल्कातील गैरप्रकारांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची विधानसभेत घोषणा; दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे संकेत मुंबई :

'गॅस तुटवड्याविषयी सरकारने उपाययोजना कराव्यात'

मुंबई : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशासह राज्यात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचे पडसाद बुधवारी

नागरिकांना विनासायास डिजिटल सेवा मिळण्यासाठी व्यापक धोरण तयार करा; माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय ई-सेवा आणि आधार संबंधित सेवा कोणत्याही अडथळ्याविना मिळाव्यात,

माजी सैनिक आणि भूमिहीनांच्या जमिनी वर्ग १ होणार, महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा

मुंबई : राज्यातील माजी सैनिक, भूमिहीन शेतकरी आणि शेतमजुरांना महाराष्ट्र शेत जमीन (सीलिंग) अधिनियमांतर्गत वाटप

प्रवासी आरक्षण सेवा इतके तास बंद राहणार

मुंबई : मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) दिनांक १२.०३.२०२६ रोजी २३.४५ वाजल्यापासून दिनांक १३.०३.२०२६ रोजी

एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! महामंडळात १७,७४२ पदांची होणार जंगी भरती

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे विधानपरिषदेत आश्वासन मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एसटी)