Rahuri Jan Aakrosh Morcha : हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला कुणीही त्रास दिला तर…

Share

नितेश राणे यांनी आजच्या राहुरी येथील जनआक्रोश मोर्चात सडक्या आंब्यांना लगावली चपराक

छत्रपती संभाजीनगर : तुमचे भोंगे सकाळी आणि संध्याकाळी पाच वाजता वाजणार आणि भोंग्यातून ‘सगळ्यांचा देव एकच अल्लाह’ एवढंच बोलून तुम्ही मोकळं होणार! तुम्ही आमच्या देवाचं नाव कधी घेणार नाही. वारंवार धर्मांतराच्या निमित्ताने आमच्या माता भगिनींकडे वाकड्या नजरेने पाहिलं जात आहे, उंबरे मधील हिंदू मुलीसोबत घडलेली घटना या सगळ्याविरोधात तीव्र संताप व्यक्त करत भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी राहुरी येथील आजच्या जनआक्रोश मोर्चात जबरदस्ती धर्मांतर घडवून आणणार्‍यांना चांगलीच चपराक लगावली.

नितेश राणे म्हणाले, ‘हे सर्व कोणाच्या राज्यात चालू आहे? हे काय पाकिस्तान आहे? हे काय काँग्रेसचं राज्य आहे? मुख्यमंत्री काय उद्धव ठाकरे बसलाय? मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि नगरचे पालकमंत्री कोण आहेत हे माहित नाही का? यांची नावं जर तुम्हाला विसरण्याची सवय असेल तर रोज सकाळी उठून मी तुम्हाला गुड मॉर्निंगच्या निमित्ताने फोन करुन सांगेन. मग कोण वाचवायला येणार तुम्हाला? यावेळेस नितेश राणे यांचा रोख पोलीस प्रशासनात गैरवर्तन करणार्‍या काही अधिकार्‍यांवर होता.

पोलिस खात्यातले जे जे कोण मस्ती करणारे आहेत, मी सगळ्या पोलीस खात्यांवर आरोप करत नाही. पण मी विधानसभेत देखील आदरणीय देवेंद्र फडणवीसजींना सांगितलं की डिपार्टमेंटमध्ये काही सडके आंबे आहेत. ते तुमचं नाव खराब करत आहेत, पोलीस दलाचंही नाव खराब करत आहेत. मला अॅडिशनल एस. पी. आय. स्वाती भोरताईंना विचारायचं आहे की, कोण वाचवायला येणार तुम्हाला? तुम्ही आमच्या मुलांबरोबर काय काय करता हे आम्हाला कळत नाही का? गृहमंत्री साहेबांपर्यंत तुमची माहिती पोहोचत नाही का? तुम्ही जबरदस्तीने आमच्या मुलांवर केसेस घ्यायला लावता, असा आरोप नितेश राणे यांनी केला. आठ-नऊ तास आमच्या मुलांना तुम्ही कोंबडा बनवून उभं करता, धमक्या देता असेही आरोप त्यांनी केले.

एवढंच धमक्या देता तर नावं घ्या की कोण फोन करतं तुम्हाला? कोण तुमचे वरिष्ठ आहेत? पहिलं नाव लिहा नितेश नारायण राणे. मी फोन करतो त्या मुलांसाठी. यानंतर नितेश राणे अॅडिशनल एसपी स्वाती भोर यांना उद्देशून म्हणाले, तुमच्या अधिकार क्षेत्रात येऊन मी तुम्हाला सांगतो की मी फोन करतो त्या मुलांसाठी आणि उद्याही मीच करणार, तुम्ही माझं काहीही वाकडं करु शकत नाही. हे हिंदुत्ववादी विचारांचं सरकार आहे. हे भगवं सरकार आहे. इथे माझ्या कुठल्याही हिंदुत्ववादी विचारांच्या कार्यकर्त्याला कुणीही अगर कुठल्याही पद्धतीचा त्रास दिला तर सगळी माहिती आमच्यापर्यंत पोहोचते. आणि आमच्यापर्यंत पोहोचते म्हणजे आदरणीय देवेंद्रजींकडे नक्की पोहोचणार. मग तुम्हाला जे कोणी फोन करतात की चल मी तुझ्याबरोबर आहे त्यांना विचारा की तुम्हाला कोण किती वाचवू शकणार आहे? असे खडेबोल यावेळी नितेश राणे यांनी सुनावले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

 

Recent Posts

चंद्रपूर: येत्या २४ एप्रिल पर्यंत उष्णतेचा ‘येलो अलर्ट’

चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…

52 minutes ago

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

8 hours ago

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

8 hours ago

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…

9 hours ago

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…

9 hours ago

PM Modi : आजची धोरणं, उद्याचं भारत! – पंतप्रधान मोदींचा नागरी सेवकांना मंत्र

PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…

9 hours ago