Jan Aakrosh Morcha in Rahuri : हिंदू बांधवांचा जनआक्रोश; राहुरी येथे काढण्यात आला मोर्चा... 

  226

भाजप आमदार नितेश राणे यांचाही सक्रिय सहभाग



छत्रपती संभाजीनगर : सकल हिंदू समाजाच्या वतीने आज छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) राहुरी येथे जनआक्रोश मोर्चाचं आयोजन केलं गेलं होतं. गेल्या काही दिवसांपासून लव्ह जिहाद (Love jihad) आणि धर्मांतराचा (Conversion) आरोप करत हिंदू संघटनांनी या मोर्चाचं आयोजन केलं. भाजपचे आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. या मोर्चासाठी वाय एम. सी. मैदानावर प्रचंड गर्दी जमली होती. राहुरी शहरासोबतच राहुरी तालुक्यात कडकडीत बंद पाळ नागरिकांनी मोर्चात सहभाग नोंदवला.


वाय. एम. सी. मैदानावरुन या मोर्चास प्रारंभ झाला. यावेळेस मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांच्या नाश्त्याची देखील सोय करण्यात आली होती. कोपरगाव, श्रीरंगपूर, संगमनेर या शहरांमध्ये यापूर्वी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यानंतर आता राहुरी येथे जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चेकरांच्या हातात 'तू दुर्गा बन, तू काली बन, पर तू लव्ह जिहाद का शिकार ना बन', अशा अनेक घोषणांचे बॅनर्स होते.


'हिंदू बांधवांची जी एकात्मता आहे ती टिकवून ठेवण्यासाठी आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत. कुणाबद्दलही द्वेष नाही, मात्र हिंदूंची जनजागृती होणे ही काळाची गरज आहे', अशी प्रतिक्रिया एका मोर्चेक-याने दिली. मोर्चात सहभागी झालेल्या प्रत्येकाच्या डोक्यावर भगवी टोपी व हातात भगवे झेंडे होते. या मोर्चामुळे वाय. एम. सी. मैदानावर भगवं वादळ निर्माण झालं होतं.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.


Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक