Bacchu Kadu : हा जुगाराचा अड्डा आहे का? आमदार-खासदाराचं पोरगं मरत नाही ना म्हणून...

सभागृहातच बच्चू कडूंचा आदित्य ठाकरेंसह सरकारवर जोरदार 'प्रहार'


मुंबई : विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांचा प्रस्ताव मांडण्याच्या शेवटच्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी प्रहार संघटनेचे बच्चू कडू (Bacchu Kadu) आक्रमक भूमिकेत पाहायला मिळाले. यावेळी बच्चू कडू यांनी आदित्य ठाकरेंसह सरकारवर जोरदार 'प्रहार' केला.


बच्चू कडू (Bacchu Kadu) सभागृहात पोटतिडकीने जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर बोलत असताना आदित्य ठाकरेंसह ठाकरे गटाचे आमदार गप्पा मारण्यात दंग झाले होते. या आमदारांना तुम्ही जुगाराच्या अड्ड्यावर बसले आहात का? असा खोचक सवाल करीत बच्चू कडू यांनी विधानसभा अध्यक्षांकडे त्यांची तक्रार केली.


बच्चू कडू म्हणाले, अध्यक्ष महोदय, मी बोलत असतांना काही लोक गप्पा मारत आहेत. हे सभागृहात बसले आहेत की सभागृहाच्या बाहेर? जुगार अड्ड्यावर बसले आहेत की काय? आदित्य ठाकरे, जाधव साहेब, वायकर हे आपसात बोलत आहेत. अध्यक्ष महोदय, यांना सभागृहाचे नियम सांगा. तुमचा प्रभाव पडत नसल्याचं बच्चू कडू म्हणाले आहेत.


तसेच विरोधी पक्षाचा अंतिम आठवडा प्रस्ताव असून खरेतर विरोधी पक्षच राहणार नाही असे दिसतेय. कदाचित ती जबाबदारी आमच्यावरही येऊ शकते, असा टोला सुरुवातीलाच कडू यांनी लगावला. राज्यातल्या ग्रामीण भागातील विजेच्या मुद्द्यावरुन कडू यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. ‘तुम्ही आम्ही सगळे ग्रामीण भागातले आहोत. २४ तासांचे वीज बिल घेतात, ८ तासच वीज देतात.


विजेच्या मुद्द्यावरुन राज्यात जे चाललंय, ते थांबवायला हवे. विजेच्या वायर घराच्या हातभर उंचावरून जातात. जेवढे धर्माच्या नावाने मेले नाहीत तेवढे या व्यवस्थेने मारले आहेत. अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही. चार-पाच लाखाची मदत देऊन तोंड गप्प केले जाते. गरीबाचा मृत्यू एवढा स्वस्त केला आहे. आमदार खासदाराचं पोरगं मरत नाही ना म्हणून तिकडे लक्ष दिले जात नाही’, अशी सडकून टीका कडू यांनी केली.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

राज्यात पाऊस आणि थंडीचं दुहेरी संकट; हवामान खात्याकडून १२ आणि १३ नोव्हेंबरला अलर्ट

 मुंबई : नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच पावसाने धडक दिल्यानंतर आता वातावरणात मोठा बदल पाहायला मिळतोय. देशभरात काही

CM Devendra Fadnavis Cabinet Mumbai : पाचव्या वित्त आयोगाला मुदतवाढ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटचे ५ महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (मंगळवार) राज्य मंत्रिमंडळाची (Cabinet) महत्त्वपूर्ण

Delhi Bomb Blast : दिल्ली स्फोटानंतर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ मंदिराच्या सुरक्षेत वाढ; सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशनवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त

पुणे : भारताची राजधानी दिल्लीमध्ये (New Delhi)  सोमवारी, १० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी झालेल्या दोन बॉम्बस्फोटांमुळे (Bomb

क्रिकेटच्या वादातून गोळीबारात तरुणाचा मृत्यू

जळगाव : शहरातील कांचन नगरातील विलास चौकात क्रिकेटच्या वादातून झालेल्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला. आकाश

पुण्यातून २०६ किमी लांबीचा सहापदरी महामार्गाचा प्रस्ताव

पुणे : पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी सरकारनं नवा प्रकल्प हातात घेतलाय. सहापदरी रस्त्याचा हा

ठोंबरे आणि मिटकरींना पक्षातून 'दे धक्का', प्रवक्ते पदावरून उचलबांगडी!

सूरज चव्हाण यांना मात्र 'अभय'; राष्ट्रवादी अजित पवार गटातील अंतर्गत वादाला नवे वळण मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस