Mumbai High court : धक्कादायक! मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्तींनी कोर्टरुममध्येच दिला राजीनामा

  130

काय आहे कारण?


मुंबई : मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High court) कायमस्वरुपी न्यायमूर्तीपदी (Justice) नियुक्ती करण्यात आलेल्या मात्र नुकतीच अलाहाबाद उच्च न्यायालयात (Alahabad High court) बदली करण्यासंदर्भात सूचना प्राप्त झालेल्या न्यायमूर्ती रोहित देव (Justice Rohit Deo) यांनी बदलीमुळे व्यथित होऊन कोर्टरुममध्येच राजीनामा दिला आहे. आज सकाळी नागपुरातील खंडपीठात कोर्टरूममधे आल्यानंतर त्यांनी राजीनामा (Resignation) देत असल्याचे जाहीर केले.


न्यायमूर्ती रोहित देव हे शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणेच खंडपीठाच्या कोर्ट रूममध्ये आले. मात्र त्यांनी राजीनाम्याबद्दल घोषणा करताच सर्वजण आश्चर्यचकित झाले. मी कोर्ट रूममधल्या उपस्थितांची दिलगिरी व्यक्त करतो, माझ्या वागण्यामुळे कुणाचं मन दुखावलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे, असं त्यांनी म्हटलं. दरम्यान, त्यांनी भावनिक होऊन आपले मन मोकळे करताना आपण सर्व एक परिवार आहोत आणि परिवाराचा विकास व्हावा हाच आपला नेहमी उद्देश होता, असं वकिलांना सांगितलं. तसंच, सर्वांना चांगले काम करत राहण्याचं आवाहन केले. त्यानंतर ते संपूर्ण दिवसाचे कामकाज रद्द करीत असल्याचं सांगून स्वत:च्या कक्षात निघून गेले.


न्या. रोहित देव नागपूरकर असून त्यांची ५ जून २०१७ रोजी मुंबई उच्च न्यायालयामध्ये अतिरिक्त न्यायमूर्ती पदी नियुक्ती करण्यात आली होती. दोन वर्षाच्या सेवेनंतर त्यांना न्यायमूर्ती पदी कायम करण्यात आले होते. वरिष्ठ वकील सुबोध धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षे कार्य केल्यानंतर १९९० पासून त्यांनी स्वतंत्रपणे वकिली व्यवसायाला सुरुवात केली. त्यांनी ३० वर्षांच्या वकिली व्यवसायात विविध प्रकारची प्रकरणे हाताळली होती.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.