Thackeray Gat Petitions : ठाकरे गटाच्या याचिकांसाठी सुप्रीम कोर्टाची नकारघंटा!

याचिकेबाबत कोणताही दिलासा मिळालेला नाही...


मुंबई : ठाकरे गटाचे (Thackeray Gat) खासदार सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेच्या विषयावर तसेच शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह यावर निर्णय घेण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष तसेच निवडणूक आयोगाला द्यावेत अशी विनंती एका याचिकेद्वारे केली होती. याबाबतच्या सुनावणीस सुप्रीम कोर्टाने तात्काळ सुनावणीसाठी नकार दिला आहे. त्याचबरोबर निश्चित तारीख देण्यासही कोर्टानं नकार दिला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला याचिकेबाबत कोणताही दिलासा मिळालेला नाही.


यावेळी अधिवक्ता अमित आनंद तिवारी (Advocate Amit Anand Tiwari) यांनी म्हटलं की, "कोर्टानं हे प्रकरण ३१ रोजी सूचीबद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या हे प्रकरण घटनापीठाच्या निकालात समाविष्ट आहे. यावर सरन्यायाधीश चंद्रचूड (CJI DY Chandrachud) यांनी जम्मू आणि काश्मीरवरील घटनापीठ संपेपर्यंत प्रतिक्षा करण्यास सांगितले आहे. तसेच यानंतर तुम्हाला तारीख देण्यात येईल, असे म्हटले आहे.


यावर पुन्हा तिवारी म्हणाले की, ही याचिका तातडीची याचिका आहे. यावर चंद्रचूड म्हणाले, ही याचिका धनुष्य आणि बाणाच्या चिन्हाबद्दल आहे बरोबर? आम्हाला ती ऐकावी लागेल. घटनापीठासाठी प्रतीक्षा करा, आम्ही याची यादी तयार करू. त्यामुळे या निकालासाठी ठाकरे गटाला प्रतिक्षा करावी लागणार आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Comments
Add Comment

मुलुंड कालिदास नाट्य गृह परिसरातील टर्फसह अनधिकृतरित्या बांधकामांवर कारवाई

महापौरांचे आदेश आणि दुसऱ्याच दिवशी कारवाईला सुरुवात मुंबई :मुलुंड येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा

विभागातील नागरी कामांसोबतच सहायक आयुक्तांच्या खांद्यावर आरोग्य इमारतींची जबाबदारी

रुग्णालय, दवाखाना परिसर अतिक्रमण मुक्त ठेवून स्वच्छ आणि सुंदर राखण्याचे निर्देश रुग्णालयांमधील कामांवर सहायक

पीपीपी धोरणांतर्गत वाटप केलेल्या ५ शाळांच्या भूखंडांचे वाटप तात्काळ रद्द करा

मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम यांचे महापौर आणि महापालिका आयुक्तांना पत्र मुंबई : शाळांसाठी राखीव असलेले

बारव संवर्धनाला प्राधान्य देऊन अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवा; मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई : राज्यातील ऐतिहासिक बारवांचे जतन व संवर्धन करण्यास पुरातत्व विभागाने प्राधान्य द्यावे, यासाठी कृती

नाशिकमधील 'कॉर्पोरेट जिहाद'नंतर राज्य सरकार ॲक्शन मोडमध्ये

 सरकारी आणि खासगी कंपन्यांमध्ये होणार झाडाझडती; महिलांच्या सुरक्षेसाठी ‘पॉश’ कायद्याची कठोर अंमलबजावणी मुंबई

Amruta Fadanvis : रेड कार्पेटची वाट पाहता येईल, पण माझा देश नेहमीच प्रथम!" पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर अमृता फडणवीसांचा 'कान्स' दौरा रद्द

मुंबई : सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर, देशातील जनतेने अनावश्यक परदेश वाऱ्या टाळाव्यात, इंधनाची