Manipur Violence : ‘१४ दिवस का लावले? पोलीस काय करत होते?’

Share

मणिपूरमध्ये महिलांची विवस्त्र धिंड काढण्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल

नवी दिल्ली : मणिपूरमधील हिंसाचार (Manipur Violence) आणि महिलांवरील अत्याचाराप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी सुरु आहे. सोमवारी झालेल्या सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सरकारवर प्रश्नांचा भडीमार केला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने विचारले की, “४ मे रोजीच्या घटनेवर पोलिसांनी १८ मे रोजी एफआयआर नोंदवला. १४ दिवस काहीही का झाले नाही? १४ दिवस का लावले?’ तसेच सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांना देखील अनेक सवाल केले आहेत. ‘हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोन महिलांवर बलात्कार झाल्याची आणि त्यांची विवस्त्र धिंड काढल्याची घटना समोर आली आहे. हे सगळं सुरू असताना पोलीस काय करत होते?’ असा सवाल न्यायालयाने पोलिसांना केला आहे.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी म्हटलं आहे की, ‘समजा १००० महिलांवरील गुन्हे आहेत. सीबीआय सर्वांची चौकशी करू शकणार आहे का?’ यावर उत्तर देताना सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सीबीआयच्या सहसंचालक दर्जाच्या एका महिला अधिकारी या तपासासाठी नियुक्त करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. तसेच अॅटर्नी जनरल आर वेंकटरामानी यांनी सांगितले की, ‘मंगळवारी सरकार प्रत्येक प्रकरणातील तथ्यांसह माहिती न्यायालयात हजर करेल.’

सरन्यायाधाशांनी एफआयआर विषयी देखील माहिती सादर करण्यास सांगितले आहे. यावर बोलतांना त्यांनी म्हटलं की, “आम्हाला हे जाणून घ्यायचे आहे की ६००० एफआयआरचे वर्गीकरण कसे करण्यात आले आहे. किती झीरो एफआयआर आहेत, काय कारवाई करण्यात आली आहे, किती जणांना अटक करण्यात आली आहे? असे अनेक सवाल सर्वेच्च न्यायालयाने विचारले आहेत. तसेच या प्रकरणावर मंगळवारी पुन्हा सुनावणी होणार असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान कलम ३७० नुसार या प्रकरणावर सुनावणी सुरु होणार आहे. यावर उत्तर देताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, मंगळवार सकाळपर्यंत एफआयआरबद्दल सर्व माहिती उपलब्ध करणे कठिण आहे.

या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी सरकारला अनेक कठोर सवाल केले आहेत. पीडित महिलांचे जबाब कोण नोंदवणार? असा सवाल देखील सर्वोच्च न्यायालयाने सरकारला केला आहे. एक १९ वर्षीय महिला जी मदत शिबिरात आहे, तिचे वडिल आणि भाऊ मारले गेल्याने ती घाबरलेली आहे त्यामुळे तिला न्यायालयीने प्रक्रिया शक्य होईल का असा कठोर सवाल देखील त्यांनी विचारला आहे.

Recent Posts

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २१ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…

25 minutes ago

Summer Tips : उन्हाळ्यात कशी घ्यावी डोळ्यांची काळजी, जाणून घ्या ‘या’ गोष्टी!

मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…

45 minutes ago

क्रिकेटपटूंच्या कराराची BCCI ने केली घोषणा, ३४ खेळाडूंशी करार; फक्त चार खेळाडूंचा ए+ मध्ये समावेश

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…

1 hour ago

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा २६/११ च्या हल्ल्यामागे अदृश्य हात, भाजपाच्या माधव भांडारींचा आरोप

मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…

2 hours ago

Benefits Of Watermelon : कलिंगड खा अन् हायड्रेट राहा!

ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…

2 hours ago