Shocking! नववीतल्या मुलीचा शाळेतच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

बीड : बीड (Beed) शहरात नववीच्या वर्गात शिकणारी एक १५ वर्षाची विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती. प्रार्थना संपल्यानंतर ती आपल्या वर्गात बसली असतानाच, तिला अचानक भोवळ आली आणि काही कळण्या अगोदरच या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. रेश्मा शेख असे या मुलीचे नाव आहे. या घटनेनंतर पालकांमध्ये खळबळ उडाली असून, चिंताही वाढली आहे.


नववीच्या वर्गात शिकणारी १५ वर्षीय रेश्मा नेहमीप्रमाणे सकाळी शाळेत गेली होती. दुपारची सुट्टी झाल्यानंतर तिने आपल्या आईसोबत शाळेत जेवण केलं. जेवण झाल्यावर पुन्हा ती आपल्या वर्गात जाऊन बसली. पण याचवेळी तिला अचानक भोवळ आल्याने ती बेशुद्ध झाली. त्यानंतर शिक्षकांनी तिला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात पोहोचण्या अगोदरच रेश्माचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेने रेश्माच्या आई-वडीलांना मोठा धक्का बसला आहे.


रेश्मा बीड शहरातल्या एका खाजगी शाळेमध्ये नववीच्या वर्गात शिक्षण घेत होती. दुपारपर्यंत शाळेत जायचे आणि त्यानंतर तिचं ट्युशन असायचं. त्यामुळे अभ्यासाच्या ताण-तणावातून तिला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच तिचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


मात्र तिला शाळेमध्ये आणि घरीही अभ्यासाचा दबाव नसल्याचं तिच्या वडिलांनी सांगितले.


कोरोनानंतर आपल्या सगळ्यांच्याच जीवनशैलीमध्ये बदल झाला आहे. काम करण्याच्या पद्धती आणि शिक्षणाच्या पद्धतीमध्ये देखील मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यातच मुलांचा असलेला ऑनलाईन अभ्यास आणि त्यामुळे त्यांच्या हातात आलेला मोबाईल या सगळ्या गोष्टींमुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. ज्यात मुलं पुरेशी झोपत नसल्याने लहान वयातच मुलांना अनेक दुर्धर आजारांचा सामना करावा लागत असल्याचे आरोग्य अधिकारी सांगतात.



Comments
Add Comment

Teacher Suicide Case : सुनील मोरे आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा; दोन्ही मुलांसोबत केलं भयकंर नंतर...

शिक्षक सुनील मोरेंनी रचला बनवा; आत्महत्या पूर्वी दोन्ही लेकरांची हत्या, पोस्टमार्टम रिपोर्ट आले समोर Teacher Suicide Case :

Nitin Gadkari : पुणे-संभाजीनगर प्रवास दोन तासांत; मुंबई-बेंगळुरू अंतर पाच तासांत

पुणे : पुणे ते संभाजीनगर प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी नवीन उन्नत मार्ग उभारण्यात येणार असून, या प्रकल्पामुळे हे

Governor Jishnu Dev Verma : विद्यापीठांनी शिक्षणासह कौशल्यांचे एकत्रिकरण करणे आवश्यक - राज्यपाल जिष्णु देव वर्मा

पुणे : कृत्रिम बुद्धीमत्ता, डेटा सायन्स, रोबोटिक्स, क्वांटम तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि स्वच्छ

Navneet Rana : अमरावतीतील हनुमान गढीवर राणा दांपत्याचे हनुमान चालीसा पठण; उद्धव ठाकरेंना दिले खुले निमंत्रण

ठाकरेंनी अमरावतीत येऊन हनुमान चालीसा वाचावी; राणा दांपत्याचे थेट आव्हान अमरावती : उबाठा यांच्या रामरक्षा

Government Scheme: देशातील टॉप कॉलेजमध्ये शिकायचं आहे ? पण पैश्यांमुळे काळजी करताय तर काळजी करू नका, आता खर्च सरकार उचलणार ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rajarshi Shahu Maharaj Scholarship Scheme : मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षण घ्य

Maharashtra Corona Alert : कोरोनाची पुन्हा चाहूल? महाराष्ट्रात ४८ रुग्णांची नोंद; आरोग्य विभागाने दिला महत्त्वाचा इशारा

मुंबई : कोरोना महामारीच्या आठवणी अजून ताज्या असतानाच पुन्हा एकदा कोविड-१९च्या रुग्णसंख्येबाबत चिंता वाढवणारी