Shocking! नववीतल्या मुलीचा शाळेतच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

बीड : बीड (Beed) शहरात नववीच्या वर्गात शिकणारी एक १५ वर्षाची विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती. प्रार्थना संपल्यानंतर ती आपल्या वर्गात बसली असतानाच, तिला अचानक भोवळ आली आणि काही कळण्या अगोदरच या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. रेश्मा शेख असे या मुलीचे नाव आहे. या घटनेनंतर पालकांमध्ये खळबळ उडाली असून, चिंताही वाढली आहे.


नववीच्या वर्गात शिकणारी १५ वर्षीय रेश्मा नेहमीप्रमाणे सकाळी शाळेत गेली होती. दुपारची सुट्टी झाल्यानंतर तिने आपल्या आईसोबत शाळेत जेवण केलं. जेवण झाल्यावर पुन्हा ती आपल्या वर्गात जाऊन बसली. पण याचवेळी तिला अचानक भोवळ आल्याने ती बेशुद्ध झाली. त्यानंतर शिक्षकांनी तिला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात पोहोचण्या अगोदरच रेश्माचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेने रेश्माच्या आई-वडीलांना मोठा धक्का बसला आहे.


रेश्मा बीड शहरातल्या एका खाजगी शाळेमध्ये नववीच्या वर्गात शिक्षण घेत होती. दुपारपर्यंत शाळेत जायचे आणि त्यानंतर तिचं ट्युशन असायचं. त्यामुळे अभ्यासाच्या ताण-तणावातून तिला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच तिचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


मात्र तिला शाळेमध्ये आणि घरीही अभ्यासाचा दबाव नसल्याचं तिच्या वडिलांनी सांगितले.


कोरोनानंतर आपल्या सगळ्यांच्याच जीवनशैलीमध्ये बदल झाला आहे. काम करण्याच्या पद्धती आणि शिक्षणाच्या पद्धतीमध्ये देखील मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यातच मुलांचा असलेला ऑनलाईन अभ्यास आणि त्यामुळे त्यांच्या हातात आलेला मोबाईल या सगळ्या गोष्टींमुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. ज्यात मुलं पुरेशी झोपत नसल्याने लहान वयातच मुलांना अनेक दुर्धर आजारांचा सामना करावा लागत असल्याचे आरोग्य अधिकारी सांगतात.



Comments
Add Comment

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली

Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक

Sanjay Shirsat : "तुमचा डबा रुळावरून घसरलाय, आता काठावर बसा"; मंत्री शिरसाटांचा उद्धव ठाकरेंना टोला

छत्रपती संभाजीनगर : "उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाचा जीव केवळ मुंबईत अडकलेला आहे. नगरपालिका निवडणुकीत

Ladki Bahin Yojna : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेच्या ४० लाख महिला अपात्रतेच्या उंबरठ्यावर?

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक