Shocking! नववीतल्या मुलीचा शाळेतच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

बीड : बीड (Beed) शहरात नववीच्या वर्गात शिकणारी एक १५ वर्षाची विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती. प्रार्थना संपल्यानंतर ती आपल्या वर्गात बसली असतानाच, तिला अचानक भोवळ आली आणि काही कळण्या अगोदरच या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. रेश्मा शेख असे या मुलीचे नाव आहे. या घटनेनंतर पालकांमध्ये खळबळ उडाली असून, चिंताही वाढली आहे.


नववीच्या वर्गात शिकणारी १५ वर्षीय रेश्मा नेहमीप्रमाणे सकाळी शाळेत गेली होती. दुपारची सुट्टी झाल्यानंतर तिने आपल्या आईसोबत शाळेत जेवण केलं. जेवण झाल्यावर पुन्हा ती आपल्या वर्गात जाऊन बसली. पण याचवेळी तिला अचानक भोवळ आल्याने ती बेशुद्ध झाली. त्यानंतर शिक्षकांनी तिला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात पोहोचण्या अगोदरच रेश्माचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेने रेश्माच्या आई-वडीलांना मोठा धक्का बसला आहे.


रेश्मा बीड शहरातल्या एका खाजगी शाळेमध्ये नववीच्या वर्गात शिक्षण घेत होती. दुपारपर्यंत शाळेत जायचे आणि त्यानंतर तिचं ट्युशन असायचं. त्यामुळे अभ्यासाच्या ताण-तणावातून तिला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच तिचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


मात्र तिला शाळेमध्ये आणि घरीही अभ्यासाचा दबाव नसल्याचं तिच्या वडिलांनी सांगितले.


कोरोनानंतर आपल्या सगळ्यांच्याच जीवनशैलीमध्ये बदल झाला आहे. काम करण्याच्या पद्धती आणि शिक्षणाच्या पद्धतीमध्ये देखील मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यातच मुलांचा असलेला ऑनलाईन अभ्यास आणि त्यामुळे त्यांच्या हातात आलेला मोबाईल या सगळ्या गोष्टींमुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. ज्यात मुलं पुरेशी झोपत नसल्याने लहान वयातच मुलांना अनेक दुर्धर आजारांचा सामना करावा लागत असल्याचे आरोग्य अधिकारी सांगतात.



Comments
Add Comment

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू

आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०

पुणे एक्सप्रेस वे अपघात प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या १३९ फेऱ्या रद्द

मुंबई : पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या

एक्सप्रेवेवर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी अन् २५ किलोमीटर पर्यंत रांगा; नेमकं पुण्यात घडलं काय ?

लोणावळा : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी सायंकाळी घडलेल्या एका अपघातामुळे संपूर्ण मार्गावर

Congress: काँग्रेसमधला वाद चव्हाट्यावर, नगरसेवक थेट दिल्लीत पोहोचले, बैठकीत नेमकं घडलं काय?

दिल्ली: चंद्रपूर महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेसमध्ये गटातील राजकारणामुळे सत्ता गमावण्याची वेळ