Jaipur Express Firing : ट्रेन गोळीबारातील मृतांची नावे आली समोर... एका प्रवाशाने सांगितला घटनेचा थरारक अनुभव!

नेमकं काय घडलं 'त्या' डब्यात... कसा झाला गोळीबार?


पालघर : आज पहाटे साडेपाचच्या सुमारास जयपूर एक्स्प्रेसमध्ये (Jaipur Express Firing) झालेल्या गोळीबारामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. चेतन सिंह या आरपीएफ जवानाने (RPF Police) प्रवाशांशी झालेल्या बाचाबाचीतून गोळीबार केला. या घटनेत तीन प्रवासी व एका आरपीएफ जवानाचा मृत्यू झाला, तर काही प्रवासी जखमी झाले. या प्रकरणी आता मृत व्यक्तींची नावे समोर आली असून मृत सहाय्यक पोलीस निरिक्षकाच्या कुटुंबाला २५ लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, ही घटना नेमकी कशी घडली याचाही जयपूर एक्स्प्रेसमधील एका प्रवाशाने उलगडा केला आहे.


जयपूर एक्सप्रेसच्या एकूण तीन डब्यांमध्ये गोळीबार झाला. B5, S6 आणि पँट्री कारमध्ये आरपीएफचा हवालदार चेतन सिंहने गोळीबार केला. चेतनने या प्रवाशांना शोधून गोळ्या झाडल्याची शक्यता आहे. टिकाराम मीणा (एएसआय, आरपीएफ), अब्दुल कादर मोहम्मदहुसेन भानपुरावाला, रा. नालासोपारा, वय ५० वर्षे (प्रवासी), अख्तर अब्बास अली, रा. शिवडी. वय ४८ वर्षे (प्रवासी) अशी मृतांची नावं आहेत.


पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (मुंबई) नीरज कुमार यांच्या माहितीनुसार सकाळी सहाच्या सुमारास एस्कॉर्टिंग ड्युटीवर तैनात असलेल्या एका आरपीएफ हवालदाराने गोळीबार केल्याचे त्यांना समजले. गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला, हे कळताच रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. सध्या मृतांच्या कुटुंबियांशी संपर्क केला असून त्यांना नुकसानभरपाई दिली जाईल, अशी माहिती नीरज कुमार यांनी दिली.



नेमकं काय घडलं 'त्या' डब्यात? प्रवाशाचा थरारक अनुभव!


जयपूर एक्सप्रेसमधील प्रवाशांपैकी एक असलेले एसी कोच अटेंडंट कृष्णकुमार शुक्ला यांनी घटनेची अंगावर शहारे आणणारी माहिती सांगितली. ते म्हणाले की, पहाटे ५ च्या सुमारास बोगीत गोळीबाराचा आवाज झाला. मी एसी कोचच्या दिशेने गेलो. तेव्हा मृतदेह खाली पडले होते. पोलिस कॉन्स्टेबलच्या हातात पिस्तूल होते. तो डब्यात फिरत होता. एएसआय टिकाराम खाली पडले होते. त्याने अन्य ३ प्रवाशांवरही गोळीबार केला. मी लांबूनच हा सर्व प्रकार पाहिला. या घटनेमुळे सर्वच प्रवासी प्रचंड घाबरले होते.



गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर प्रवाशी प्रचंड घाबरले होते. ते गोंधळून गेले होते. त्यामुळे बोरिवलीजवळ रेल्वेचा वेग कमी होताच तकाही प्रवाशांनी रेल्वेतून खाली उड्या मारल्या. त्यात काही जण जखमी झाले. महिला प्रवाशांनी आपल्या मुलांसह सुरक्षित ठिकाणी धाव घेतली.



पोलिसांनी वेळीच त्याला पकडले


गोळीबारानंतर आरोपीने दहिसर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेची चेन ओढली. त्यानंतर उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण रेल्वे पोलिसांनी वेळीच त्याच्या मुसक्या आवळल्या. ४ मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात हलवण्यात आलेत. आरोपीने मानसिक तणावातून हा गोळीबार केल्याची घटना आहे. बी-५ बोगीच्या काचेच्या दरवाजातून गोळी आरपार गेल्याची खूणही घटनास्थळी दिसून येत आहे. सद्यस्थितीत आरोपीची बोरीवली पोलीस स्टेशनमध्ये चौकशी सुरू आहे. हा गोळीबार त्याने का केला याचा पोलिस शोध घेत आहेत, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे सीपीआरओ सुमीत ठाकूर यांनी दिली.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Teacher Suicide Case : सुनील मोरे आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा; दोन्ही मुलांसोबत केलं भयकंर नंतर...

शिक्षक सुनील मोरेंनी रचला बनवा; आत्महत्या पूर्वी दोन्ही लेकरांची हत्या, पोस्टमार्टम रिपोर्ट आले समोर Teacher Suicide Case :

Nitin Gadkari : पुणे-संभाजीनगर प्रवास दोन तासांत; मुंबई-बेंगळुरू अंतर पाच तासांत

पुणे : पुणे ते संभाजीनगर प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी नवीन उन्नत मार्ग उभारण्यात येणार असून, या प्रकल्पामुळे हे

Governor Jishnu Dev Verma : विद्यापीठांनी शिक्षणासह कौशल्यांचे एकत्रिकरण करणे आवश्यक - राज्यपाल जिष्णु देव वर्मा

पुणे : कृत्रिम बुद्धीमत्ता, डेटा सायन्स, रोबोटिक्स, क्वांटम तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि स्वच्छ

Navneet Rana : अमरावतीतील हनुमान गढीवर राणा दांपत्याचे हनुमान चालीसा पठण; उद्धव ठाकरेंना दिले खुले निमंत्रण

ठाकरेंनी अमरावतीत येऊन हनुमान चालीसा वाचावी; राणा दांपत्याचे थेट आव्हान अमरावती : उबाठा यांच्या रामरक्षा

Government Scheme: देशातील टॉप कॉलेजमध्ये शिकायचं आहे ? पण पैश्यांमुळे काळजी करताय तर काळजी करू नका, आता खर्च सरकार उचलणार ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rajarshi Shahu Maharaj Scholarship Scheme : मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षण घ्य

Maharashtra Corona Alert : कोरोनाची पुन्हा चाहूल? महाराष्ट्रात ४८ रुग्णांची नोंद; आरोग्य विभागाने दिला महत्त्वाचा इशारा

मुंबई : कोरोना महामारीच्या आठवणी अजून ताज्या असतानाच पुन्हा एकदा कोविड-१९च्या रुग्णसंख्येबाबत चिंता वाढवणारी