Jaipur Express Firing : ट्रेन गोळीबारातील मृतांची नावे आली समोर... एका प्रवाशाने सांगितला घटनेचा थरारक अनुभव!

नेमकं काय घडलं 'त्या' डब्यात... कसा झाला गोळीबार?


पालघर : आज पहाटे साडेपाचच्या सुमारास जयपूर एक्स्प्रेसमध्ये (Jaipur Express Firing) झालेल्या गोळीबारामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. चेतन सिंह या आरपीएफ जवानाने (RPF Police) प्रवाशांशी झालेल्या बाचाबाचीतून गोळीबार केला. या घटनेत तीन प्रवासी व एका आरपीएफ जवानाचा मृत्यू झाला, तर काही प्रवासी जखमी झाले. या प्रकरणी आता मृत व्यक्तींची नावे समोर आली असून मृत सहाय्यक पोलीस निरिक्षकाच्या कुटुंबाला २५ लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, ही घटना नेमकी कशी घडली याचाही जयपूर एक्स्प्रेसमधील एका प्रवाशाने उलगडा केला आहे.


जयपूर एक्सप्रेसच्या एकूण तीन डब्यांमध्ये गोळीबार झाला. B5, S6 आणि पँट्री कारमध्ये आरपीएफचा हवालदार चेतन सिंहने गोळीबार केला. चेतनने या प्रवाशांना शोधून गोळ्या झाडल्याची शक्यता आहे. टिकाराम मीणा (एएसआय, आरपीएफ), अब्दुल कादर मोहम्मदहुसेन भानपुरावाला, रा. नालासोपारा, वय ५० वर्षे (प्रवासी), अख्तर अब्बास अली, रा. शिवडी. वय ४८ वर्षे (प्रवासी) अशी मृतांची नावं आहेत.


पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (मुंबई) नीरज कुमार यांच्या माहितीनुसार सकाळी सहाच्या सुमारास एस्कॉर्टिंग ड्युटीवर तैनात असलेल्या एका आरपीएफ हवालदाराने गोळीबार केल्याचे त्यांना समजले. गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला, हे कळताच रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. सध्या मृतांच्या कुटुंबियांशी संपर्क केला असून त्यांना नुकसानभरपाई दिली जाईल, अशी माहिती नीरज कुमार यांनी दिली.



नेमकं काय घडलं 'त्या' डब्यात? प्रवाशाचा थरारक अनुभव!


जयपूर एक्सप्रेसमधील प्रवाशांपैकी एक असलेले एसी कोच अटेंडंट कृष्णकुमार शुक्ला यांनी घटनेची अंगावर शहारे आणणारी माहिती सांगितली. ते म्हणाले की, पहाटे ५ च्या सुमारास बोगीत गोळीबाराचा आवाज झाला. मी एसी कोचच्या दिशेने गेलो. तेव्हा मृतदेह खाली पडले होते. पोलिस कॉन्स्टेबलच्या हातात पिस्तूल होते. तो डब्यात फिरत होता. एएसआय टिकाराम खाली पडले होते. त्याने अन्य ३ प्रवाशांवरही गोळीबार केला. मी लांबूनच हा सर्व प्रकार पाहिला. या घटनेमुळे सर्वच प्रवासी प्रचंड घाबरले होते.



गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर प्रवाशी प्रचंड घाबरले होते. ते गोंधळून गेले होते. त्यामुळे बोरिवलीजवळ रेल्वेचा वेग कमी होताच तकाही प्रवाशांनी रेल्वेतून खाली उड्या मारल्या. त्यात काही जण जखमी झाले. महिला प्रवाशांनी आपल्या मुलांसह सुरक्षित ठिकाणी धाव घेतली.



पोलिसांनी वेळीच त्याला पकडले


गोळीबारानंतर आरोपीने दहिसर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेची चेन ओढली. त्यानंतर उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण रेल्वे पोलिसांनी वेळीच त्याच्या मुसक्या आवळल्या. ४ मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात हलवण्यात आलेत. आरोपीने मानसिक तणावातून हा गोळीबार केल्याची घटना आहे. बी-५ बोगीच्या काचेच्या दरवाजातून गोळी आरपार गेल्याची खूणही घटनास्थळी दिसून येत आहे. सद्यस्थितीत आरोपीची बोरीवली पोलीस स्टेशनमध्ये चौकशी सुरू आहे. हा गोळीबार त्याने का केला याचा पोलिस शोध घेत आहेत, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे सीपीआरओ सुमीत ठाकूर यांनी दिली.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात