Ajinkya Rahane : रॉयल लंडन वनडे चषकातून अजिंक्य रहाणेने घेतली माघार

  251

काय आहे या ब्रेकचे कारण?


लंडन : भारतीय कसोटी संघात प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन करणाऱ्या टीम इंडियाचा स्टार खेळाडू अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) आता आपल्या एका निर्णयाने सर्वांनाच चकित केले आहे. त्याने रॉयल लंडन वनडे चषकात (Royal London one-day cup) न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. कामाचा ताण कमी करण्यासाठी त्याने ब्रेक घेतला असल्याचे समजते.


अजिंक्य रहाणेने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली होती. रहाणे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलमध्ये तब्बल १८ महिन्यांनंतर टीम इंडियात परतला. भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी या सामन्याच्या दोन्ही डावात त्याने चांगली कामगिरी केली. यानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत रहाणेसाठी विशेष काही घडले नाही.


या कामगिरीच्या जोरावर लीसेस्टरशायने (Leicestershire) अजिंक्य रहाणेचा आपल्या संघात समावेश केला होता. त्यामुळे अजिंक्य रहाणे रॉयल लंडन वनडे चषकात खेळणार होता, पण कामाचा ताण कमी करण्यासाठी त्याने ब्रेक घेतला आहे. म्हणून तो या स्पर्धेत खेळताना दिसणार नाही. याबाबत लीसेस्टरशायरचे क्रिकेट संचालक क्लॉड हेंडरसन यांनी माहिती दिली आहे.


लीसेस्टरशायरचे क्रिकेट संचालक म्हणाले की, ‘आम्ही अजिंक्य रहाणेची परिस्थिती चांगल्या प्रकारे समजून घेत आहोत. गेल्या काही दिवसांपासून त्याचे वेळापत्रक खूप तणावाचे होते. केवळ भारतातच नाही, तर राष्ट्रीय संघ जिथे जिथे दौऱ्यावर गेला आहे, तिथे अजिंक्य रहाणेही गेला आहे. आम्ही त्याच्याशी सतत संवाद साधत असतो आणि क्रिकेटमधील परिस्थिती लवकर कशी बदलते हे आम्ही जाणून आहोत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Russia Ukraine War: रशियाचा युक्रेनवर ४० क्षेपणास्त्रे आणि ४०० ड्रोनचा भयंकर हल्ला!

रशियाचा युक्रेनवर ड्रोन, क्रूझ आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वर्षाव कीव्ह: रशियाने शुक्रवारी सकाळी

बांगलादेशमध्ये एप्रिल २०२६मध्ये होणार निवडणूक, मुहम्मद युनूस यांनी केली घोषणा

ढाका: बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद यूनुस यांनी देशातील पुढील राष्ट्रीय निवडणुकीची

या ठिकाणी पाच रुपयांचा पार्ले जी बिस्किटांचा पुडा २३०० रुपयांत मिळतो

गाझा : पार्ले जी बिस्कीट एक लोकप्रिय ब्रँड आहे. भारतात मागील अनेक दशकांपासून पार्ले जी बिस्किटांची विक्री सुरू

विनाश ७ जून नंतर अटळ, बाबा वेंगाचे भाकीत

बल्गेरिया : बल्गेरिया येथील बाबा वेंगा यांनी केलेली भविष्यवाणी या नावाने एक भाकीत व्हायर होत आहे. या भाकितानुसार

Shashi Tharoor : 'भारताला कोणत्याही तिसऱ्या पक्षाची गरज नाही', राहुल गांधींच्या विधानावर थरूर यांची प्रतिक्रिया

राहुल गांधींच्या ‘सरेंडर’ विधानाशी शशी थरूर असहमत वॉशिंग्टन : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान