लंडन : भारतीय कसोटी संघात प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन करणाऱ्या टीम इंडियाचा स्टार खेळाडू अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) आता आपल्या एका निर्णयाने सर्वांनाच चकित केले आहे. त्याने रॉयल लंडन वनडे चषकात (Royal London one-day cup) न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. कामाचा ताण कमी करण्यासाठी त्याने ब्रेक घेतला असल्याचे समजते.
अजिंक्य रहाणेने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली होती. रहाणे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलमध्ये तब्बल १८ महिन्यांनंतर टीम इंडियात परतला. भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी या सामन्याच्या दोन्ही डावात त्याने चांगली कामगिरी केली. यानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत रहाणेसाठी विशेष काही घडले नाही.
या कामगिरीच्या जोरावर लीसेस्टरशायने (Leicestershire) अजिंक्य रहाणेचा आपल्या संघात समावेश केला होता. त्यामुळे अजिंक्य रहाणे रॉयल लंडन वनडे चषकात खेळणार होता, पण कामाचा ताण कमी करण्यासाठी त्याने ब्रेक घेतला आहे. म्हणून तो या स्पर्धेत खेळताना दिसणार नाही. याबाबत लीसेस्टरशायरचे क्रिकेट संचालक क्लॉड हेंडरसन यांनी माहिती दिली आहे.
लीसेस्टरशायरचे क्रिकेट संचालक म्हणाले की, ‘आम्ही अजिंक्य रहाणेची परिस्थिती चांगल्या प्रकारे समजून घेत आहोत. गेल्या काही दिवसांपासून त्याचे वेळापत्रक खूप तणावाचे होते. केवळ भारतातच नाही, तर राष्ट्रीय संघ जिथे जिथे दौऱ्यावर गेला आहे, तिथे अजिंक्य रहाणेही गेला आहे. आम्ही त्याच्याशी सतत संवाद साधत असतो आणि क्रिकेटमधील परिस्थिती लवकर कशी बदलते हे आम्ही जाणून आहोत.
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…