My BMC : महापालिकेचे वरातीमागून घोडे; संरक्षण भिंत कोसळल्यानंतर घरे रिकामी करण्याची पाठवली नोटीस!


  • किशोर गावडे


मुंबई : भांडुप पश्चिमेच्या मिश्रा भवन, गावदेवी रोड येथील नंदू भवन चाळी लगत गुरुवारी रात्री ९.४५ वाजण्याच्या सुमारास भूस्खलन होऊन येथील आधारभिंत कोसळली. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र आता महापालिकेच्या वतीने येथील अशोक मेडिकल मागील १६ घरांना नोटिसा बजावून धोकादायक भाग हटविण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच धोकादायक आणि पडका भाग तातडीने हटविण्यास सांगितले आहे.


ताबाधारकांनी (होल्डर ऑफ ऑक्युपन्सी) किंवा रहिवाशांनी त्यांच्या घराचा धोकादायक, घातक भाग तातडीने हटविण्याच्या सूचना पालिकेने केल्या आहेत. तसेच एखादी दुर्घटना घडल्यास, होणाऱ्या जीवित अथवा वित्तहानीस संबंधित मिळकतधारकाला जबाबदार धरले जाईल, अशी सूचना बजावलेल्या नोटिशीद्वारे करण्यात आली आहे.


नोटीस देण्यात आलेल्या काही घरांना तडे केले असून असाच संततधार पाऊस सुरू राहिल्यास घरांना धोका निर्माण होऊन जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या नोटीसमुळे आधीच जीव मुठीत घेऊन राहणाऱ्या नागरिकांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


दरम्यान, माजी आमदार अशोक पाटील व ईशान्य मुंबई महिला विभाग प्रमुख राजश्री मांदविलकर व शिवसेना पदाधिकारी यांनी पालिका प्रशासनाकडे तातडीने पर्यायी जागेची मागणी केली आहे.


बंद असलेल्या महापालिका शाळा, समाज मंदिरे या ठिकाणी पर्यायी व्यवस्थेबाबत माजी आमदार अशोक पाटील यांनी प्रशासनाला सुचवले आहे. पण नोटिसा मिळालेल्या नागरिकांनी संततधार पावसात जायचे कुठे? असा प्रतिप्रश्न अशोक पाटील यांनी महापालिका अधिकाऱ्यांना केला आहे. पालिका प्रशासनाने लवकरात लवकर नागरिकांचे पुनर्वसन करावे अशी मागणी अशोक पाटील यांनी केली आहे.


शुक्रवारी पहाटेपर्यंत एनडीआरएफचे जवान व अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी कार्यरत होते.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे

शब्दापलीकडे कृती’ची महायुतीकडून वचनपूर्ती युवकांना रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध : राणे म्हणाले की, राज्यातील

मुंबई विमानतळावर ७९ कोटींचे कोकेन जप्त

मुंबई : डीआरआय मुंबईने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७९ कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले असून या प्रकरणी दोन

नवी मुंबई विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आगामी 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ