My BMC : महापालिकेचे वरातीमागून घोडे; संरक्षण भिंत कोसळल्यानंतर घरे रिकामी करण्याची पाठवली नोटीस!


  • किशोर गावडे


मुंबई : भांडुप पश्चिमेच्या मिश्रा भवन, गावदेवी रोड येथील नंदू भवन चाळी लगत गुरुवारी रात्री ९.४५ वाजण्याच्या सुमारास भूस्खलन होऊन येथील आधारभिंत कोसळली. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र आता महापालिकेच्या वतीने येथील अशोक मेडिकल मागील १६ घरांना नोटिसा बजावून धोकादायक भाग हटविण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच धोकादायक आणि पडका भाग तातडीने हटविण्यास सांगितले आहे.


ताबाधारकांनी (होल्डर ऑफ ऑक्युपन्सी) किंवा रहिवाशांनी त्यांच्या घराचा धोकादायक, घातक भाग तातडीने हटविण्याच्या सूचना पालिकेने केल्या आहेत. तसेच एखादी दुर्घटना घडल्यास, होणाऱ्या जीवित अथवा वित्तहानीस संबंधित मिळकतधारकाला जबाबदार धरले जाईल, अशी सूचना बजावलेल्या नोटिशीद्वारे करण्यात आली आहे.


नोटीस देण्यात आलेल्या काही घरांना तडे केले असून असाच संततधार पाऊस सुरू राहिल्यास घरांना धोका निर्माण होऊन जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या नोटीसमुळे आधीच जीव मुठीत घेऊन राहणाऱ्या नागरिकांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


दरम्यान, माजी आमदार अशोक पाटील व ईशान्य मुंबई महिला विभाग प्रमुख राजश्री मांदविलकर व शिवसेना पदाधिकारी यांनी पालिका प्रशासनाकडे तातडीने पर्यायी जागेची मागणी केली आहे.


बंद असलेल्या महापालिका शाळा, समाज मंदिरे या ठिकाणी पर्यायी व्यवस्थेबाबत माजी आमदार अशोक पाटील यांनी प्रशासनाला सुचवले आहे. पण नोटिसा मिळालेल्या नागरिकांनी संततधार पावसात जायचे कुठे? असा प्रतिप्रश्न अशोक पाटील यांनी महापालिका अधिकाऱ्यांना केला आहे. पालिका प्रशासनाने लवकरात लवकर नागरिकांचे पुनर्वसन करावे अशी मागणी अशोक पाटील यांनी केली आहे.


शुक्रवारी पहाटेपर्यंत एनडीआरएफचे जवान व अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी कार्यरत होते.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

कोकणच्या विकासाची नवी नांदी

मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेला मंत्री नितेश राणे यांनी दाखवला हिरवा झेंडा प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

कॅनडाला महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी अनेक संधी

मुंबई : जगात पर्यावरणाचे संवर्धन आणि हवामान बदलाच्या संकटाला सामोरे जात प्रगती साधण्याचे आव्हान उभे आहे.

मध्य रेल्वेच्या १८ होळी विशेष गाड्यांची घोषणा

मुंबई : होळी सणाच्या निमित्ताने होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज

BMC : मुंबईत शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन

मुंबई : जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार आदरणीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या

महिला सफाई कर्मचाऱ्यांना ‘लाडकी कर्मचारी बहीण’ म्हणून गौरवणार; महापालिका सभागृहात ठराव मंजूर

मुंबई: ‘स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान’ आणि ‘रस्ते स्वच्छता योजना’ अंतर्गत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना

मुंबईत उभारणार मल्टी-मॉडेल टनेल; रस्ते वाहतुकीसोबतच सेवा सुविधांच्या जाळ्यांसाठी असेल स्वतंत्र मार्ग

मुंबई: वाढत्या वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी आणि मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पूरस्थितीवर प्रभावी