मुंबई : राज्यातील कृषी आणि कृषी संलग्न महाविद्यालयांच्या (Agricultural courses) केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या नियमांमध्ये काही बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही प्रक्रिया अभियांत्रिकीसारख्या (Engineering) व्यावसायिक अभ्यासक्रमांप्रमाणे राबवण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज बोलावलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयामुळे कृषी अभ्यासक्रमांना प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांना प्रत्येक टप्प्यानंतर महाविद्यालयात रिक्त राहिलेल्या जागांची माहिती मिळू शकणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना पर्याय निवडता येणार आहेत. या निर्णयामुळे कृषी अभ्यासक्रमांना प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय दूर होऊ शकेल.
अजित पवार यांनी आज बोलावलेल्या बैठकीत कृषीमंत्री धनंजय मुंडे, उच्च तंत्र व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती होती. या बैठकीला दोन्ही विभागांचे सचिवदेखील उपस्थित होते. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंदर्भात ज्या अडचणी येतात त्या समोर मांडण्यात आल्या. त्यामुळे आज अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेच्या धरतीवर कृषी अभ्यासक्रमासाठी देखील रिक्त जागांप्रमाणे पर्याय उपलब्ध करुन द्यावा, असे आदेश अजित पवार यांनी दिले. त्यामुळे प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांना राखीव जागांचा लाभ मिळणार आहे.
आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे उत्कृष्ट कामगिरी असलेल्या खाजगी कृषीसमूहांनाही कृषी विद्यापीठांचा दर्जा देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. या दोन्ही निर्णयांमुळे कृषी अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रशियाची राजधानी मॉस्को येथे पोहोचले आहेत. राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन…
मुसळधार पावसाचा पालघरमध्ये पहिला बळी पालघर : मुंबई, ठाण्यासह उपनगरीय भागात काल रात्रभर जोरदार पाऊस…
मुंबई : कांदिवली पश्चिमेकडील पोयसर नदीवर बसवण्यात आलेल्या सक्शन पंपाचे पाईप फुटल्याने आज कांदिवलीत मोठ्या…
मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करा : एकनाथ शिंदे अजित पवार यांनीही…
हार्बर रेल्वे तसेच मेल एक्स्प्रेस रद्द झाल्याने अडकलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी बससेवा मुंबई : मुंबईत काल…
मुसळधार पावसामुळे घडली दुर्दैवी घटना मुंबई : मुंबईसह ठाणे आणि उपनगरांत काल रात्रीपासून मुसळधार पाऊन…