Agricultural courses : कृषी अभ्यासक्रमांना प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा!

अजित पवारांच्या बैठकीत 'हे' दोन महत्त्वाचे निर्णय...


मुंबई : राज्यातील कृषी आणि कृषी संलग्न महाविद्यालयांच्या (Agricultural courses) केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या नियमांमध्ये काही बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही प्रक्रिया अभियांत्रिकीसारख्या (Engineering) व्यावसायिक अभ्यासक्रमांप्रमाणे राबवण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज बोलावलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.


या निर्णयामुळे कृषी अभ्यासक्रमांना प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना प्रत्येक टप्प्यानंतर महाविद्यालयात रिक्त राहिलेल्या जागांची माहिती मिळू शकणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना पर्याय निवडता येणार आहेत. या निर्णयामुळे कृषी अभ्यासक्रमांना प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय दूर होऊ शकेल.


अजित पवार यांनी आज बोलावलेल्या बैठकीत कृषीमंत्री धनंजय मुंडे, उच्च तंत्र व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती होती. या बैठकीला दोन्ही विभागांचे सचिवदेखील उपस्थित होते. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंदर्भात ज्या अडचणी येतात त्या समोर मांडण्यात आल्या. त्यामुळे आज अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेच्या धरतीवर कृषी अभ्यासक्रमासाठी देखील रिक्त जागांप्रमाणे पर्याय उपलब्ध करुन द्यावा, असे आदेश अजित पवार यांनी दिले. त्यामुळे प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना राखीव जागांचा लाभ मिळणार आहे.


आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे उत्कृष्ट कामगिरी असलेल्या खाजगी कृषीसमूहांनाही कृषी विद्यापीठांचा दर्जा देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. या दोन्ही निर्णयांमुळे कृषी अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

खोकल्याच्या सिरपमुळे बालकांचा मृत्यू; खबरदारीसाठी राज्याने 'हा' टोल-फ्री क्रमांक केला जारी!

मुंबई: मध्य प्रदेश आणि राजस्थानसह देशातील काही राज्यांमध्ये 'कोल्ड्रिफ' (Coldrif) नावाच्या खोकल्याच्या सिरपमुळे काही

लाडक्या बहिणींची 'ई केवायसी'तील तांत्रिक अडचण लवकर दूर करणार, मंत्री आदिती तटकरेंचे आश्वासन

मुंबई(प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता 'ई-केवायसी' बंधनकारक केली आहे.

ठाकरे बंधूंची मात्रोश्रीवर भेट, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. शिवसेना

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करता येणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ते मालाड या पट्ट्यात प्रचंड लोकवस्ती आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय,

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात