Chitra Wagh : कुठं चाललीय महिला सुरक्षा? चित्रा वाघ कडाडल्या!

  195

सरकारला टार्गेट करुन फक्त मणिपूरवर बोललं जातं; राजस्थान, बिहार, मालद्यामधील महिलांवरील अन्यायावर का बोलत नाही? चित्रा वाघ संतापल्या


मुंबई : मणिपूर प्रकरणाची चर्चा करायलाच हवी, त्याचसोबत मालद्याची आणि राजस्थानच्या प्रकरणाचीही चर्चा व्हावी, आपण काल बिहारमधला एका महिलेला त्रास देणारा एक व्हिडीओ पाहिला. तो पाहताना आपल्याला लक्षात येते की, कुठं चाललीय महिला सुरक्षा? (women safety) त्यामुळे फक्त सरकारला टारगेट करुन मणिपूरवर बोललं जात आहे. सरकार मणिपूरवर चर्चा करायला तयार असतानासुद्धा विरोधीपक्ष संसद चालू देत नाही. जेव्हापासून राहूल गांधी यांचं सदस्यत्व रद्द झालं तेव्हापासून फक्त गोंधळ घालणं हीच विरोधीपक्षाची भूमिका राहिल्याचा आरोप भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केला आहे.


चित्रा वाघ म्हणाल्या की, विरोधी पक्षातील लोक मीडियासमोर बोलत आहेत मात्र हाऊसमध्ये चर्चा व्हायला हवी, त्यासाठी विरोधक तयार नाहीत. राजस्थानमधील प्रकरणाबद्दल पाहिलं तर त्यांच्याच सरकारमधील एका मंत्र्याने उभा राहून आपलं मत मांडलं, का त्याला काढून टाकलं? असाही सवाल त्यांनी केला.



निवडणुकांच्या काळात अश्रू ढाळणा-या ममतांना महिलांवरील अन्याय दिसत नाही का?


निवडणुकांच्या काळात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्टेजवर जाऊन महिलांवर अन्याय होतोय म्हणून अश्रू ढाळत होत्या. आता त्यांना महिलांवरील अन्याय दिसत नाही का? असाही सवाल त्यांनी यावेळी केला. राहूल गांधी मणिपूरमध्ये गेले मात्र ते मालद्याला का गेले नाही? राजस्थानला का गेले नाही, बिहारला का गेले नाही? असाही सवाल केला.


जेव्हा चर्चा होईल तेव्हा मणिपूरवरही होईल, मालद्यावरही होईल, राजस्थानवरही होईल आणि बिहारवरही होईल असंही स्पष्टपणे सांगितलं. आपण पाहतोय की, मणिपूरमधील घटनेवर विरोधक बोलत आहेत मात्र त्याचवेळी विरोधक मालद्यावर बोलत नाहीत. पश्चिम बंगालमध्ये महिला मुख्यमंत्री असताना त्यावर त्या बोलत नाहीत.


 
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Sambhajinagar Illegal Construction: छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैध बांधकामावर हातोडा; विरोध करणाऱ्यावर होणार कायदेशीर कारवाई

विरोध करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश  संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने दोन दिवसांच्या

OBC reservation : सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार!

२७ टक्के ओबीसी आरक्षणाला आव्हान देणारी याचिका फेटाळली नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात गेल्या अनेक

शिक्षकाने लॉजमध्ये जाऊन का केली आत्महत्या?

नांदेड : नांदेड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कंधार तालुक्यातील एका खासगी शिक्षण संस्थेत कार्यरत

महादेवी हत्तिणीला ‘वनतारा’मध्ये पाठवण्याबाबतचा अहवाल

पेटा संस्थेमार्फत सत्यपरिस्थिती नमूद कोल्हापूर : महादेवी या हत्तिणीला कोल्हापूर मधील एका मठातून वनतारा येथे

हुंड्याऐवजी मुलींसाठी फिक्स डिपॉझिट

मराठा समाजाची लग्न आचारसंहिता अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर मराठा समाजातील

डॉक्टरांसाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली अनिवार्य

बोगस डॉक्टरांना बसणार आळा पुणे : राज्यातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता