Chitra Wagh : कुठं चाललीय महिला सुरक्षा? चित्रा वाघ कडाडल्या!

सरकारला टार्गेट करुन फक्त मणिपूरवर बोललं जातं; राजस्थान, बिहार, मालद्यामधील महिलांवरील अन्यायावर का बोलत नाही? चित्रा वाघ संतापल्या


मुंबई : मणिपूर प्रकरणाची चर्चा करायलाच हवी, त्याचसोबत मालद्याची आणि राजस्थानच्या प्रकरणाचीही चर्चा व्हावी, आपण काल बिहारमधला एका महिलेला त्रास देणारा एक व्हिडीओ पाहिला. तो पाहताना आपल्याला लक्षात येते की, कुठं चाललीय महिला सुरक्षा? (women safety) त्यामुळे फक्त सरकारला टारगेट करुन मणिपूरवर बोललं जात आहे. सरकार मणिपूरवर चर्चा करायला तयार असतानासुद्धा विरोधीपक्ष संसद चालू देत नाही. जेव्हापासून राहूल गांधी यांचं सदस्यत्व रद्द झालं तेव्हापासून फक्त गोंधळ घालणं हीच विरोधीपक्षाची भूमिका राहिल्याचा आरोप भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केला आहे.


चित्रा वाघ म्हणाल्या की, विरोधी पक्षातील लोक मीडियासमोर बोलत आहेत मात्र हाऊसमध्ये चर्चा व्हायला हवी, त्यासाठी विरोधक तयार नाहीत. राजस्थानमधील प्रकरणाबद्दल पाहिलं तर त्यांच्याच सरकारमधील एका मंत्र्याने उभा राहून आपलं मत मांडलं, का त्याला काढून टाकलं? असाही सवाल त्यांनी केला.



निवडणुकांच्या काळात अश्रू ढाळणा-या ममतांना महिलांवरील अन्याय दिसत नाही का?


निवडणुकांच्या काळात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्टेजवर जाऊन महिलांवर अन्याय होतोय म्हणून अश्रू ढाळत होत्या. आता त्यांना महिलांवरील अन्याय दिसत नाही का? असाही सवाल त्यांनी यावेळी केला. राहूल गांधी मणिपूरमध्ये गेले मात्र ते मालद्याला का गेले नाही? राजस्थानला का गेले नाही, बिहारला का गेले नाही? असाही सवाल केला.


जेव्हा चर्चा होईल तेव्हा मणिपूरवरही होईल, मालद्यावरही होईल, राजस्थानवरही होईल आणि बिहारवरही होईल असंही स्पष्टपणे सांगितलं. आपण पाहतोय की, मणिपूरमधील घटनेवर विरोधक बोलत आहेत मात्र त्याचवेळी विरोधक मालद्यावर बोलत नाहीत. पश्चिम बंगालमध्ये महिला मुख्यमंत्री असताना त्यावर त्या बोलत नाहीत.


 
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली

Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक

Sanjay Shirsat : "तुमचा डबा रुळावरून घसरलाय, आता काठावर बसा"; मंत्री शिरसाटांचा उद्धव ठाकरेंना टोला

छत्रपती संभाजीनगर : "उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाचा जीव केवळ मुंबईत अडकलेला आहे. नगरपालिका निवडणुकीत