Mumbai Metro : संततधार पावसातही मुंबई मेट्रोची कामे अविरत चालू

  116

मेट्रो २ब च्या पियर कॅप ची उभारणी ५४ टक्के पूर्ण


मुंबई मेट्रो मार्ग २ब ची ५१.६३ टक्के भौतिक प्रगती पूर्ण


मुंबई : डी एन नगर ते मंडाळे दरम्यान प्रगतीपथावर असलेल्या (Mumbai Metro) मेट्रो मार्ग २ ब च्या पियर्स आणि पियर कॅपची उभारणी सुरू आहे. रात्रीच्या वेळी मुसळधार पाऊस सुरू असून देखील एमएमआरडीएच्या मेट्रो टीमने चेंबूर येथील मुंबई मेट्रो मार्ग २ब च्या पॅकेज सी १०२ मध्ये पिअर कॅपची उभारणी पूर्ण केली आहे. या मर्गिकेची कामे ३ पॅकेज मध्ये सुरू आहे.


जून आणि जुलै या मान्सूनच्या महिन्यात ३३ पियर्स तसेच २३ पियर कॅप्स ची उभारणी करण्यात टीम ला यश आले असून आत्तापर्यंत ८३९ पैकी ४५० पियर कॅप्स ची उभारणी पूर्ण झाली आहे. सध्यस्थितीतमेट्रो मार्ग २ ब ची ५१.६३ टक्के भौतिक प्रगती पूर्ण झाली असून सर्व कामे प्रगतीपथावर आहेत. सारी मुंबई थकून शांतपणे विसावत असते तेव्हा मुंबईतील मेट्रोची टीम आपले काम अविरत आणि शांतपणे करते.


मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस सुरू असून हवामान विभागामार्फत काही ठिकाणी रेड तसेच ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईची दळण वळण व्यवस्था सुधारण्याच्या दृष्टीने आणि मुंबईकरांच्या त्रासमुक्त प्रवासासाठी प्राधिकरणामार्फत हाती घेण्यात आलेल्या मुंबई मेट्रो प्रकल्पांची कामे मुसळधार पावसातही अविरत सुरू आहेत. मेट्रोची कामे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये यासाठी प्रामुख्याने रात्रीच्या वेळी केली जातात. ज्यावेळेस मुंबई थांबलेली असते त्यावेळेस मेट्रोची टीम ही मुंबईकरांच्या उज्वल भविष्यासाठी कार्यरत असते.


"मुसळधार पावसा सारख्या आव्हानात्मक हवामानात ही, मेट्रोची टीम मेट्रोची सर्व कामे उल्लेखनीय वेगाने करत आहे. ट्रॅफिक समस्यांचे निराकरण करताना पायलिंग, पाइल कॅप, खांबाचे काँक्रीटीरण आणि पिअर कॅपच्या कामांदरम्यान सुरक्षितता सुनिश्चित करून ही कामे प्रगतीपथावर आहेत. मुंबई महानगर प्रदेशाच्या विकासासाठी एमएमआरडीए वचनबद्ध आहे." असे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ संजय मुखर्जी, भा. प्र.से. म्हणाले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

कॉर्पोरेट कंपन्यांनी दुर्गम व मागास जिल्ह्यांमध्ये काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ग्राम विकासासाठी शासन व खासगी भागीदारांनी एकत्र येऊन परिवर्तन घडविण्याचे आवाहन मुंबई :  कॉर्पोरेट व खासगी

मुंबईकरांच्या वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये सध्या ९० टक्क्यांपेक्षा जास्त जलसाठा उपलब्ध आहे. गेल्या

ऑगस्ट महिन्याचा पगार ५ दिवस आधीच मिळणार! गणेशोत्सवानिमित्त सरकारी नोकरदारांना खुशखबर

मुंबई : सध्या राज्यभरात काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या तयारीची लगबग पाहायला मिळत आहे. दहा दिवसीय

मिठी नदीच्या घोटाळ्यातील तिसरा आरोपी अटकेत!

मुंबई : ६५ कोटी रुपयांच्या मिठी नदी गाळ काढण्याच्या घोटाळ्याच्या चालू तपासात एक मोठी प्रगती झाली आहे. मुंबई

बोईसर MIDC मध्ये वायू गळती, ४ कामगारांचा मृत्यू, तर अनेकांची प्रकृती चिंताजनक

पालघर: बोईसर तारापूर एमआयडीसीतील कारखान्यात वायुगळती झाल्याची घटना घडली आहे. या वायू गळतीमुळे ८ कामगारांना बाधा

ढोल-ताशा वाजवणाऱ्या मुस्लिम तरुणांचा व्हिडिओ व्हायरल!

मुंबई: गणेश चतुर्थीच्या आधी, डिजिटल क्रिएटर भावेशने शेअर केलेला एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात मुंबईतील