Manipur Violence : राहुल गांधींनीच मणिपूरमध्ये आग लावली!

Share

केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचा खळबळजनक आरोप

नवी दिल्ली : मणिपूरमधील हिंसाचाराची वस्तुस्थिती काँग्रेस लपवत असल्याचा आरोप करत राहुल गांधी यांनीच (Rahul Gandhi) मणिपूरमध्ये आग लावल्याचे खळबळजनक वक्तव्य केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smruti Irani) यांनी केले आहे. पावसाळी अधिवेशनात संसदेच्या प्रश्नोत्तराच्या तासाला त्यांनी हा आरोप केला.

मणिपूरमध्ये गेल्या अडीच महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसाचारामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षांनी देखील लोकसभा आणि राज्यसभेत मणिपूर मुद्द्यावर चर्चे करण्याची मागणी केली. दरम्यान, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी बुधवारी मणिपूरच्या मुद्द्यावर विचारलेल्या प्रश्नावर चांगल्याच भडकल्या.

केंद्र सरकारमधील एकही महिला मंत्री या विषयावर बोलण्यास तयार आहे का, असा सवाल काँग्रेस खासदार यमी याज्ञिक यांनी संसदेत केला. यमी याज्ञिक यांच्या वक्तव्यावर स्मृती इराणी संतापल्या. त्यांनी आक्षेप घेत सांगिलते की, केवळ महिला मंत्र्यांनीच नाही तर सर्व महिला राजकीय नेत्यांनीही मणिपूर बरोबरच छत्तीसगड, राजस्थान आणि बिहारमधील घटनांकडे लक्ष दिले पाहिजे, असे त्या म्हणाल्या. स्मृती इराणी यांनी यमी याज्ञिक यांना विचारले की, या राज्यांतील घटनांवर बोलण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे का?

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या, “छत्तीसगडमध्ये घडलेल्या घटनांबद्दल बोलण्याची ताकद तुमच्यात आहे का? राजस्थानमध्ये घडलेल्या घटनांबद्दल बोलण्याची ताकद तुमच्यात आहे का? बिहारबद्दल बोलण्याची ताकद आहे का? लाल डायरीबद्दल बोलण्याची ताकद तुमच्यात आहे का? एवढेच नाही तर काँग्रेसचा एक नेता तिथे गेल्याने मणिपूर पेटू लागले, असे म्हणण्याची हिंमत कधी होणार? राहुल गांधींनी मणिपूरला आग कशी लावली हे सांगण्याची हिंमत तुम्हाला कधी येईल, असा प्रश्नांचा भडीमार त्यांनी केला.

स्मृती इराणी म्हणाल्या, काँग्रेसशासित राज्यांमध्ये बलात्काराच्या मुद्द्यावर बोलण्याची ताकद किंवा हिंमत तुमच्यात आहे का? असा सवाल करत याज्ञिक यांना इशारा दिला की, या मुद्दय़ांवर बोलण्याची हिंमत नसेल तर त्यांनी सरकारवर अवाजवी दबाव आणू नये, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

औट घटकेचा इंद्र ‘राजा नहूष’

विशेष - भालचंद्र ठोंबरे नहूष हा कुरूवंशातील पराक्रमी राजा होता. तो ययातीचा पिता आणि आयूचा…

2 hours ago

कवकांची अद्भुत दुनिया ! (भाग १)

निसर्गवेद - डॉ. महालक्ष्मी वानखेडकर गली खजिन्यातील एक हिरा म्हणजे ही कवक, बुरश्या, भूछत्र, अळंबी,…

3 hours ago

खून पतीचा; जेलमध्ये पत्नी

क्राइम - अ‍ॅड. रिया करंजकर प्रत्येकाला समाजामध्ये नाव कमवायचे असते. त्यामुळे लोक कुठल्याही थराला जाऊन…

3 hours ago

भेटी लागी जीवा…

हलकं-फुलकं - राजश्री वटे पहाटेची सूर्योदयाची वेळ... केशरी रंगाने अवकाश भरून गेले होते! पिवळा पितांबर…

3 hours ago

ऋषिमुनी : कविता आणि काव्यकोडी

भक्कम, विशाल आहे हा बहुगुणी ध्यानस्थ बसलेला जणू वाटे ऋषिमुनी विषारी वायू शोषून हा प्राणवायू…

3 hours ago

नवतारे

कथा - प्रा. देवबा पाटील यशश्री तू मला चहा पाजलास व मला खरोखरच तरतरी आली.…

4 hours ago