NCP fight: आता राष्ट्रवादीच्या चिन्हाच्या लढाईलाही सुरुवात? निवडणूक आयोगाने पाठवली 'ही' नोटीस

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या (NCP) फुटीनंतर अजित पवार (Ajit Pawar) गट विरुद्ध शरद पवार गट असा कायदेशीर लढा उभा राहण्याची चिन्हे आहेत. अजित पवार गटाने पक्षावर केलेल्या दाव्याबाबत शरद पवार (Sharad Pawar) गटाला निवडणूक आयोगानं नोटीस बजावली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आपणच आहोत हा दावा अजित पवारांनी केला आहे, त्याबाबत आपलं उत्तर द्या असं आयोगानं या नोटीशीत म्हटलं आहे. त्यासाठी ३ आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे.


२ जुलै रोजी, राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील होत मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर ५ जुलै रोजी अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगात कागदपत्रं सादर करण्यात आली होती. ३० जून रोजीच पक्षाच्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजित पवारांची निवड झाल्याचा दावा यावेळी करण्यात आला होता. ४० आमदारांच्या सह्यांनी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्याचाही दावा करण्यात आला होता. आता या सगळ्याबाबत शरद पवार गटाचं नेमकं आयोगासमोर म्हणणं काय आहे, हे त्यांना कळवावं लागणार आहे.


शरद पवार गटाकडून अभिषेक मनु सिंघवी, कपिल सिब्बल, देवदत्त कामत हे कायदेशीर बाजू सांभाळणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगात आता शिवसेनेपाठापोठ राष्ट्रवादीच्या चिन्हासाठीची लढाई लवकरच सुरु होण्याची चिन्हं दिसत असल्याचं म्हटलं जात आहे.


दरम्यान, शिवसेनेच्या चिन्हाबाबत निवडणूक आयोगानं शिंदेंच्या बाजूनं निर्णय दिला होता. त्यामुळे आता अजित पवारांच्या बाबतीत निवडणूक आयोग कोणता निर्णय घेतं, हे पाहणं देखील औत्सुक्याचं असणार आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

Bhendi Bazaar Fire : दक्षिण मुंबईत मध्यरात्री खळबळ! भेंडी बाजारजवळ बीएमसीच्या भूमिगत केबलला आग; परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार परिसरात रविवारी उशिरा रात्री भूमिगत बीएससी (BSC) केबलला अचानक आग लागल्याने

मढ-वर्सोवा पूलाच्या बांधकाम आता जोरात; विविध पर्यावरणीय परवानगी प्राप्त

कांदळवन विभागाला भरणार साडेबारा कोटींचे शुल्क मुंबई : मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या के/पश्चिम व पी/उत्तर

मुंबईत पाच ठिकाणी स्थापन करणार वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्र

मुंबई : मुंबईतील विविध प्रदूषकाचे नमूने गोळा करून विश्लेषण करणे तसेच प्रत्येक तासाला विविध प्रदूषक घटकांची

नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; कारच्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai : नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी झालेल्या एका भीषण अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी

Mumbai Municipal Corporation : मुंबई महापालिका उभारणार नवे सभागृह, ३५० आसनक्षमता, अधिकारी, पत्रकारांसाठी विशेष व्यवस्था

३५० आसनक्षमता, अधिकारी, पत्रकारांसाठी विशेष व्यवस्था मुंबई  : मुंबई महापालिकेचे सध्याचे ब्रिटिशकालीन सभागृह

Air quality monitoring : मुंबईत पाच ठिकाणी स्थापन करणार वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्र

मुंबई  : मुंबईतील विविध प्रदूषकाचे नमूने गोळा करून विश्लेषण करणे तसेच प्रत्येक तासाला विविध प्रदूषक घटकांची