Aurangabad school: औरंगाबादमधील शाळेच्या आदेशाविरोधात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, कारण...

औरंगाबाद: औरंगाबादच्या (Aurangabad) पैठण तालुक्यातील एका खाजगी शाळेकडून विद्यार्थ्यांनी टिळा, गंध लावून येण्यास मनाई केली व तसे लेखी पत्रच पालकांना पाठवले. त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वयकांनी आक्रमक भूमिका घेत शाळा प्रशासनाला धारेवर धरले. शेवटी शाळेच्या मुख्याध्यापकांनी माफीनामा लिहून दिल्यानंतर हे प्रकरण शांत झाले.


पैठणच्या बिडकीन गावात महाराष्ट्र भूषण पब्लिक स्कूल आहे. काल शाळा प्रशासनाकडून पालकांना एक पत्र पाठवण्यात आले. ज्यात विद्यार्थ्यांना स्वच्छते सहीत नीटनेटकेपणाने शाळेत पाठविणे याबाबत सूचना करण्यात आल्या होत्या. या सूचना करतांना पालकांनी मुलांना कपाळावर कोणत्याही प्रकारचा टिका, रंग, गंध, लावून शाळेत पाठवु नयेत. तसेच हातात, कडे, दोरे, बांधुन पाठवू नये, हातात घडयाळ, स्मार्ट वॉच घालून पाठवू नये, विद्यार्थ्यांच्या कानात कोणत्याही प्रकारच्या बाळया नसाव्यात, अशा सूचना करण्यात आल्या होत्या.


मुलांना शाळेत पाठवताना कोणत्याही प्रकारचा कपाळावर टिका, रंग, गंध आणि हातात, कडे, दोरे, बांधुन पाठवू नयेत अशा सूचना करण्यात आल्याने मराठा क्रांती मोर्च्याचा समन्वयकांनी आक्रमक भूमिका घेतली. पालकांसह मराठा क्रांती मोर्च्याचे कार्यकर्ते आज थेट महाराष्ट्र भूषण पब्लिक स्कूलमध्ये पोहचले. यावेळी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक आणि शाळा प्रशासनाला धारेवर धरत जाब विचारला. तर असे कोणतेही नियम आम्ही मुलांवर बंधनकारक केले नसून, फक्त त्याबाबत आवाहन केले असल्याची माहिती शाळेतील शिक्षकांनी दिली. तर शाळा प्रशासनाने काढलेलं पत्र मागे घेण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चा आणि पालकांनी केली आहे.



पालक नाराज!


दरम्य़ान, शाळेच्या या सुचनांवर पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेक पालकांनी शाळेत जाऊन ही आपली संस्कृती असून, मुलांनी गंध लावल्याने शाळेला काय अडचण आहे, असा प्रश्न केला. मात्र, पत्रात फक्त सूचना करण्यात आल्या असून, त्या बंधनकारक नसल्याची सारवासार शाळेतील शिक्षकांनी केली.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

Nitesh Rane: आम्ही विरोधकांना दुर्बीण घेऊन शोधत...; नितेश राणेंचा विरोधकांवर हल्लाबोल

सिंधुदुर्ग: राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत सिमितीच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. याच निवडणुकीच्या

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू

आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०

पुणे एक्सप्रेस वे अपघात प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या १३९ फेऱ्या रद्द

मुंबई : पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या

एक्सप्रेवेवर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी अन् २५ किलोमीटर पर्यंत रांगा; नेमकं पुण्यात घडलं काय ?

लोणावळा : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी सायंकाळी घडलेल्या एका अपघातामुळे संपूर्ण मार्गावर