Aurangabad school: औरंगाबादमधील शाळेच्या आदेशाविरोधात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, कारण...

  389

औरंगाबाद: औरंगाबादच्या (Aurangabad) पैठण तालुक्यातील एका खाजगी शाळेकडून विद्यार्थ्यांनी टिळा, गंध लावून येण्यास मनाई केली व तसे लेखी पत्रच पालकांना पाठवले. त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वयकांनी आक्रमक भूमिका घेत शाळा प्रशासनाला धारेवर धरले. शेवटी शाळेच्या मुख्याध्यापकांनी माफीनामा लिहून दिल्यानंतर हे प्रकरण शांत झाले.


पैठणच्या बिडकीन गावात महाराष्ट्र भूषण पब्लिक स्कूल आहे. काल शाळा प्रशासनाकडून पालकांना एक पत्र पाठवण्यात आले. ज्यात विद्यार्थ्यांना स्वच्छते सहीत नीटनेटकेपणाने शाळेत पाठविणे याबाबत सूचना करण्यात आल्या होत्या. या सूचना करतांना पालकांनी मुलांना कपाळावर कोणत्याही प्रकारचा टिका, रंग, गंध, लावून शाळेत पाठवु नयेत. तसेच हातात, कडे, दोरे, बांधुन पाठवू नये, हातात घडयाळ, स्मार्ट वॉच घालून पाठवू नये, विद्यार्थ्यांच्या कानात कोणत्याही प्रकारच्या बाळया नसाव्यात, अशा सूचना करण्यात आल्या होत्या.


मुलांना शाळेत पाठवताना कोणत्याही प्रकारचा कपाळावर टिका, रंग, गंध आणि हातात, कडे, दोरे, बांधुन पाठवू नयेत अशा सूचना करण्यात आल्याने मराठा क्रांती मोर्च्याचा समन्वयकांनी आक्रमक भूमिका घेतली. पालकांसह मराठा क्रांती मोर्च्याचे कार्यकर्ते आज थेट महाराष्ट्र भूषण पब्लिक स्कूलमध्ये पोहचले. यावेळी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक आणि शाळा प्रशासनाला धारेवर धरत जाब विचारला. तर असे कोणतेही नियम आम्ही मुलांवर बंधनकारक केले नसून, फक्त त्याबाबत आवाहन केले असल्याची माहिती शाळेतील शिक्षकांनी दिली. तर शाळा प्रशासनाने काढलेलं पत्र मागे घेण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चा आणि पालकांनी केली आहे.



पालक नाराज!


दरम्य़ान, शाळेच्या या सुचनांवर पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेक पालकांनी शाळेत जाऊन ही आपली संस्कृती असून, मुलांनी गंध लावल्याने शाळेला काय अडचण आहे, असा प्रश्न केला. मात्र, पत्रात फक्त सूचना करण्यात आल्या असून, त्या बंधनकारक नसल्याची सारवासार शाळेतील शिक्षकांनी केली.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक