लहान तांड्यातील सुविधांसाठी लोकसंख्येचा निकष बदला

आमदार नितेश राणे यांची विधानसभेत मागणी


मुंबई ( प्रतिनिधी ): कोकणात अगदी लहान वाडी,वस्त्या आणि तांडे आहेत. त्याठिकाणी राहणाऱ्या लोकांना सर्व सुविधा पोहचविण्यासाठी लोकसंख्येच्या निकषाची अट दूर करा, अशी मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत केली.


कोकणातील वाडी वस्त्या आणि तांड्यात धनगरांचे ५० ते ६० कुटुंब राहतात. दलित वस्तीच्या लोकसंख्येचा आधार घेतल्यास या लोकांपर्यंत शासनाच्या आवश्यक त्या सुविधा पोहचत नाहीत. त्यामुळे लोकसंख्येच्या निकषाची अट तात्काळ दूर करून या लोकांना सुविधा द्याव्यात, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली.


त्यावर उत्तर देताना गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी लोकसंख्येच्या निकषाची अट दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी हरिष भांदिर्गे, बाजार - उद्यान समिती अध्यक्षपदी हेतल गाला

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समिती अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष

त्र्यंबक-नाशिक कुंभमेळ्यासाठी २२ हजार १८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

मुंबई: त्र्यंबक- नाशिक मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन २०२७ मध्ये करण्यात येत असून या कुंभमेळ्यात

मांजरानं पोपटाचा पिंजरा पाडला, दोन शेजाऱ्यांतला वाद हाणामारीपर्यंत गेला

पुणे : पुणे तिथे काय उणे असं म्हणतात , हे अगदी बरोबर कारण आता तिथे गुन्हेगारीच्याही काही कमतरता उरलेल्या नाही आहेत.

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या