मुंबई ( प्रतिनिधी ): कोकणात अगदी लहान वाडी,वस्त्या आणि तांडे आहेत. त्याठिकाणी राहणाऱ्या लोकांना सर्व सुविधा पोहचविण्यासाठी लोकसंख्येच्या निकषाची अट दूर करा, अशी मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत केली.
कोकणातील वाडी वस्त्या आणि तांड्यात धनगरांचे ५० ते ६० कुटुंब राहतात. दलित वस्तीच्या लोकसंख्येचा आधार घेतल्यास या लोकांपर्यंत शासनाच्या आवश्यक त्या सुविधा पोहचत नाहीत. त्यामुळे लोकसंख्येच्या निकषाची अट तात्काळ दूर करून या लोकांना सुविधा द्याव्यात, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली.
त्यावर उत्तर देताना गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी लोकसंख्येच्या निकषाची अट दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
निर्बीजीकरण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन - वन मंत्री गणेश नाईक मुंबई : कोकणातील फळबागा आणि…
गागोदे खुर्द अनुसूचित जातीसाठी, १४ ग्रामपंचायतीत आदिवासी सरपंच पेण (वार्ताहर) : पेण तालुक्यातील ६४ ग्रामपंचायत…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स…
राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती नवी दिल्ली : मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगतोय. मात्र…
मुख्यालयातील उपस्थितीचे महसूल विभागाचे काटेकोर आदेश मुंबई: महसूल विभाग जनतेच्या सेवेसाठी असून जनसेवेत कसूर करणाऱ्या…