Nitesh Rane : कोरोनाला घाबरून गळ्याला पट्टा लावून अडीच वर्षे घरात बसलेला हा कसला महाराष्ट्राचा कुटुंबप्रमुख

  380

आमदार नितेश राणे यांचा जोरदार प्रहार


मुंबई : छत्रपती शिवराय हेच महाराष्ट्राचे खरे कुटुंब प्रमुख आहेत. अडीच वर्षे गळ्याला पट्टा लावून घरात बसून स्वतःच्या कुटुंबाचे खिसे भरले त्याला महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख म्हणू नये, असे म्हणत भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार केला.


ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली आहे. त्या मुलाखतीचा प्रोमो प्रसिद्ध करण्यात आला आहे. यावरुन नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.


राणे म्हणाले की, अण्णा हजारेंना मशाल हाती घ्यायला सांगणे ही उबाठा गटावर आलेली वाईट वेळ आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी अण्णा हजारेंना वाकड्या तोंडाचा गांधी असे म्हटले होते. आणि आता तेच लोक अण्णा हजारेंना आंदोलन करायला सांगत आहेत. अण्णा हजारेंनी मातोश्री बाहेर आंदोलन करावे, सगळ्यात मोठा भ्रष्टाचारी मातोश्रीत बसलाय, असे राणे म्हणाले.


मुंबईत आलेल्या २६ जुलैच्या महापुरात बाळासाहेबांना एकटे टाकून उद्धव ठाकरे फॅमिली सोबत ताज हॉटेलमध्ये राहत होते. त्यावेळी मला हॉटलेच्या लॉबीमध्ये रश्मी ठाकरे भेटल्या होत्या. उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या विचारांवर कलंक आहे. उद्धव ठाकरेंनी संजय राऊतऐवजी राणेंकडून मुलाखत घेऊन दाखवावी तर कळेल आवाज कुणाचा, अशा शब्दात त्यांनी ठाकरेंना इशारा दिला.


तसेच बाबरी पाडली तेव्हा उद्धव ठाकरे मातोश्रीच्या एका खोलीत कॅमेरा साफ करत होते. त्यामुळे त्यांनी बाबरी या विषयावर बोलू नये. बाळासाहेब ठाकरे व इतर मातब्बर शिवसैनिकच या विषयावर बोलू शकतात, असे म्हणत राणेंनी ठाकरेंवर हल्लाबोल केला.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

राज्यात कुपोषित बालकांची आकडेवारी चिंताजनक

मुंबईत सर्वाधिक, तर पुण्यात संख्येत घट मुंबई : कधीकाळी कुपोषित बालकांचा जिल्हा अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा

सौर पंप शक्य नसल्यास पारंपरिक कृषी पंप देणार

भौगोलिक परिस्थितीनुसार निर्णय घेणार मुंबई : राज्य शासनाने सौर ऊर्जेवर आधारित कृषी पंप देण्यावर भर दिला आहे.

वाहतूकदारांच्या संपात ७० हजार वाहने सहभागी

नागरिकांसह आयात-निर्यातदारांना संपाचा मोठा फटका मुंबई : ई-चलन व वाहतूकदारावर लाभलेल्या इतर अनेक अन्यायकारक

मुंबईतील सर्व कबुतरखाने बंद करण्याचे निर्देश

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतरखान्यांमुळे श्वसन तसेच फुफ्फुसांचे आजार वाढले असून यात काही रहिवाशांचा

Nitesh Rane : “पिक्चर अभी बाकी हैं”, ‘तुम्हाला सांगून ठेवलेली उत्तर रेकॉर्ड करुन’ नंतर एकत्र…मंत्री नितेश राणेंचा हल्लाबोल

मुंबई : दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई

आरोग्यास अपायकारक तरीही मुंबई महापालिकेच्या हद्दीत ५१ कबुतरखाने पुन्हा सुरू

मनपाने मुंबईतील कबूतरखान्यांबाबत विशेष अभियान राबवावे – मंत्री उदय सामंत मुंबई : सध्या मुंबई महापालिकेच्या