Nashik crime: भयंकर! चक्क कोयता मिरवत वाहनांची जाळपोळ आणि तोडफोड

नाशिक: नाशिक (Nashik) शहरातील सुरक्षिततेवर एकंदरीतच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. काही दिवसांपूर्वी सिडको परिसरात १६ वाहनांची तोडफोड केल्याची घटना ताजी असतानाच काल मध्यरात्री विहितगाव (Vihitgaon) परिसरात युवकांनी चक्क कोयता मिरवत गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ केली आहे.


नाशिक शहरातील उपनगर परिसरातील रामकृष्ण हाऊसिंग सोसायटी विहित गाव येथील पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या दुचाकी आणि रस्त्यालगत उभे असलेल्या मालवाहू टेम्पो आणि काही चार चाकी गाड्यांचे या समाजकंटकांनी नुकसान केले आहे. गाड्यांची तोडफोड करत दुचाकी जाळत दहशत पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून संतप्त नागरिकांनी पोलिसांवरती रोष व्यक्त करत या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. सोबतच रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून प्रशासनाने योग्य ती खबरदारी न घेतल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.


दरम्यान, दोन संशयितांनी केलेल्या जाळपोळीचा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पहाटे दोन वाजता कोयता घेऊन संशयित वाहनतळात आले. ज्वलनशील पदार्थ टाकून त्यांनी वाहनतळातील दुचाकी पेटवून दिल्या. नंतर रस्त्यालगत उभ्या असलेल्या वाहनांवर कोयत्याने हल्ला करत परिसरात दहशत पसरविली.

दोन संशयितांनी केलेल्या जाळपोळीचा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पहाटे दोन वाजता कोयता घेऊन हे वाहनतळात आले. ज्वलनशील पदार्थ टाकून त्यांनी वाहनतळातील दुचाकी पेटवून दिल्या. नंतर रस्त्यालगत उभ्या असलेल्या वाहनांवर कोयत्याने हल्ला करत परिसरात दहशत पसरविली.

घटनेचा संपूर्ण व्हिडिओ:


Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

नाव न सांगता साईबाबा चरणी "इतक्या" कोटींचा सोन्याचा हार अर्पण...

शिर्डी : साईबाबांचा १०७ वा पुण्यतिथी उत्सव १ ऑक्टोबर ते ४ ऑक्टोबर या दरम्यान झाला. अनेक भाविकांनी दर्शनासाठी

यंदा कधी आहे कोजागिरी पौर्णिमा ? जाणून घ्या या तिथीचे महत्त्व आणि शुभ मुहूर्त

कोजागिरी पौर्णिमा हा आश्विन पौर्णिमेला येणार भारतीय हिंदू संस्कृतीमधील महत्वाचा दिवस आहे. आणि इंग्रजी

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे चिपळूणमध्ये पुराचा धोका

चिपळूण (वार्ताहर) : चिपळूण शहराला असलेल्या पुराच्या धोक्याबाबत उपाययोजना सूचविण्यासाठी राज्य सरकारने जलसंपदा

मंत्री नितेश राणेंचा वैभववाडीत उबाठावर मोठा घाव!

मंगेश लोकेंसह शेकडो कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा भाजप प्रवेश ओरोस (वार्ताहर) : वैभववाडी तालुक्यात उद्धव

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात

रायगड जिल्हा परिषदेत २ हजार ६०९ पदे रिक्त

अलिबाग (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील विकासाला गती देण्याचे काम रायगड जिल्हा परिषदेचे असले, तरी जिल्हा परिषदेत