Nashik crime: भयंकर! चक्क कोयता मिरवत वाहनांची जाळपोळ आणि तोडफोड

नाशिक: नाशिक (Nashik) शहरातील सुरक्षिततेवर एकंदरीतच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. काही दिवसांपूर्वी सिडको परिसरात १६ वाहनांची तोडफोड केल्याची घटना ताजी असतानाच काल मध्यरात्री विहितगाव (Vihitgaon) परिसरात युवकांनी चक्क कोयता मिरवत गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ केली आहे.


नाशिक शहरातील उपनगर परिसरातील रामकृष्ण हाऊसिंग सोसायटी विहित गाव येथील पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या दुचाकी आणि रस्त्यालगत उभे असलेल्या मालवाहू टेम्पो आणि काही चार चाकी गाड्यांचे या समाजकंटकांनी नुकसान केले आहे. गाड्यांची तोडफोड करत दुचाकी जाळत दहशत पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून संतप्त नागरिकांनी पोलिसांवरती रोष व्यक्त करत या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. सोबतच रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून प्रशासनाने योग्य ती खबरदारी न घेतल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.


दरम्यान, दोन संशयितांनी केलेल्या जाळपोळीचा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पहाटे दोन वाजता कोयता घेऊन संशयित वाहनतळात आले. ज्वलनशील पदार्थ टाकून त्यांनी वाहनतळातील दुचाकी पेटवून दिल्या. नंतर रस्त्यालगत उभ्या असलेल्या वाहनांवर कोयत्याने हल्ला करत परिसरात दहशत पसरविली.

दोन संशयितांनी केलेल्या जाळपोळीचा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पहाटे दोन वाजता कोयता घेऊन हे वाहनतळात आले. ज्वलनशील पदार्थ टाकून त्यांनी वाहनतळातील दुचाकी पेटवून दिल्या. नंतर रस्त्यालगत उभ्या असलेल्या वाहनांवर कोयत्याने हल्ला करत परिसरात दहशत पसरविली.

घटनेचा संपूर्ण व्हिडिओ:


Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

नैसर्गिक शेतीला चालना द्या : राज्यपाल

मुंबई : रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीची उत्पादक क्षमता बाधित होत असून त्यासोबतच कॅन्सर, मधुमेह, उच्च

येणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : आयुर्वेद या निसर्गाशी अनुरुप उपचार पद्धतीचे महत्त्व जगभरात मान्य झाले आहे. आयुष

स्वामी रामनंद तीर्थ यांचे मराठवाडा मुक्ती संग्रामात अमूल्य योगदान : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांनी तरुणाईमध्ये देशभक्ती जागृत

कुर्ला आणि घाटकोपर दरम्यानची वाहतूक कोंडी सुटणार ?

मुंबई : कुर्ला–घाटकोपर दरम्यान सततची वाहतूककोंडी दूर करण्यासाठी महापालिकेने एलबीएस रोडवर मोठा उड्डाणपूल

खारघर किनारा मार्ग प्रकल्पामुळे भविष्यात नवी मुंबईकरांचा प्रवास सुलभ

नवी मुंबई  : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रकल्पामुळे भविष्यात रस्ते मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक

महाराष्ट्रात येतेय देशातील पहिली पॉड टॅक्सी! सरकारकडून ग्रीन सिग्नल

मुंबई : काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतातील पहिली पॉड