Manipur Violence : मणिपूरमध्ये चाललंय काय? स्वातंत्र्यसैनिकाच्या पत्नीला जिवंत जाळले

सेरो (मणिपूर) : आदिवासी महिलांची जमावाने विवस्त्र धिंड काढल्याच्या घटनेनंतर (Manipur Violence) इम्फाळमधील कोनुंग मामांग येथे आणखी दोन कुकी समाजाच्या तरुणींवर जमावाने बलात्कार करुन त्यांची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. त्यात आता हिंसाचारग्रस्त मणिपूरमधून आणखी संतापजनक घटना समोर येत आहेत. ककचिंग जिल्ह्यातील सेरो गावात, एका स्वातंत्र्यसैनिकाची ८० वर्षीय पत्नी इबेतोम्बी यांना घरात बंद करून एका सशस्त्र गटाने घर पेटवून दिल्याने त्यात त्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे.


इबेतोम्बी यांची नात प्रेमकांता हिने सांगितले की, तिचे कुटुंब तिला वाचवण्यासाठी धाव घेण्यापूर्वीच घराला आगीने संपूर्ण वेढले होते. घरावर हल्ला होणार हे लक्षात येताच त्यांनी आपल्या नातवंडांना पळून जाण्यास सांगितले तसेच नंतर परत या मला न्यायला, असे त्या म्हणाल्या. तेच त्यांचे अखेरचे शब्द ठरले.


स्वत: प्रेमकांता थोडक्यात बचावल्या. त्यांनी आजीला वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्या जखमी झाल्या.


इबेतोम्बी यांचे पती एस. चुरचंद सिंग हे स्वातंत्र्यसैनिक होते. ते ८० व्या वर्षी मरण पावले. माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी त्यांना सन्मानित केले होते.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

भारत-पाकिस्तान संघर्षामधील मध्यस्थीचा आणखी एक दावेदार, चीनचा दावा भारताने फेटाळला

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत

ओडिशाच्या किनाऱ्यावरून एकाच लाँचरमधून लागोपाठ दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

हैद्राबाद : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने

माजी एनआयए प्रमुख सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई : माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती

अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लाच्या अर्थात प्रभू रामाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या

स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच