Manipur Violence : मणिपूरमध्ये चाललंय काय? स्वातंत्र्यसैनिकाच्या पत्नीला जिवंत जाळले

सेरो (मणिपूर) : आदिवासी महिलांची जमावाने विवस्त्र धिंड काढल्याच्या घटनेनंतर (Manipur Violence) इम्फाळमधील कोनुंग मामांग येथे आणखी दोन कुकी समाजाच्या तरुणींवर जमावाने बलात्कार करुन त्यांची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. त्यात आता हिंसाचारग्रस्त मणिपूरमधून आणखी संतापजनक घटना समोर येत आहेत. ककचिंग जिल्ह्यातील सेरो गावात, एका स्वातंत्र्यसैनिकाची ८० वर्षीय पत्नी इबेतोम्बी यांना घरात बंद करून एका सशस्त्र गटाने घर पेटवून दिल्याने त्यात त्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे.


इबेतोम्बी यांची नात प्रेमकांता हिने सांगितले की, तिचे कुटुंब तिला वाचवण्यासाठी धाव घेण्यापूर्वीच घराला आगीने संपूर्ण वेढले होते. घरावर हल्ला होणार हे लक्षात येताच त्यांनी आपल्या नातवंडांना पळून जाण्यास सांगितले तसेच नंतर परत या मला न्यायला, असे त्या म्हणाल्या. तेच त्यांचे अखेरचे शब्द ठरले.


स्वत: प्रेमकांता थोडक्यात बचावल्या. त्यांनी आजीला वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्या जखमी झाल्या.


इबेतोम्बी यांचे पती एस. चुरचंद सिंग हे स्वातंत्र्यसैनिक होते. ते ८० व्या वर्षी मरण पावले. माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी त्यांना सन्मानित केले होते.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव