Manipur Violence : मणिपूरमध्ये आणखी दोन तरुणींवर जमावाकडून अत्याचार करून निर्घृण हत्या

इम्फाळ : दोन महिलांच्या व्हायरल व्हिडिओमुळे देशभरात संताप व्यक्त केला जात असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार (Manipur Violence) समोर आला आहे. इम्फाळामधील कोनुंग मामांग येथे दोन कुकी समाजाच्या तरुणींवर जमावाने बलात्कार करुन त्यांची हत्या केल्याचा आरोप पीडित तरुणींच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. एका वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे.


पीडित, २१ आणि २४ वर्षाच्या तरुणी होत्या. त्या इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील कोनुंग मामांग भागात कार धुण्याचे काम करत होत्या. ४ मे रोजी, राज्यात जातीय हिंसाचाराच्या उसळलेला असताना जमावाने त्यांना लक्ष्य केले. कार वॉश करताना दोन महिलांवर काही महिलांसोबत असलेल्या पुरुषांच्या मोठ्या गटाने हल्ला केल्याचे सांगण्यात आले.


दरम्यान, ही घटना घडली त्यानंतर सुरुवातीला पीडित तरुणीचे कुटुंबिय कलंक लागू नये म्हणून पीडितांची ओळख उघड करण्यात आलेली नाही. मात्र, एका मुलीच्या आईने याबाबत १६ मे रोजी सायकूल पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.


अत्याचार केल्यानंतर या दोन्ही तरुणींची हत्या केल्याचे या एफआयआरमध्ये म्हटले आहे. त्यानंतर हे प्रकरण इम्फाळ जिल्ह्यातील पोरोम्पत पोलीस ठाण्यात हस्तांतरित करण्यात आले. अजूनही या तरुणींचे मृतदेह सापडलेले नाहीत, या प्रकरणी पोलिसांनी एकाही आरोपीला अटक केलेली नाही. यामुळे कुकी समाजातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.


दरम्यान, घटनेच्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराच्या माहितीनुसार, काही महिलांनीच पीडित दोन तरुणींना एका खोलीत घेऊन गेले होते. त्यानंतर पुरुषांना त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यासाठी पाठबळ दिले. जवळपास तब्बल दीड तास पीडित तरुणींवर अत्याचार सुरु होते. त्यानंतर त्यांना ओढत बाहेर काढण्यात आले आणि त्यांना ठार मारुन फेकून दिल्याचे साक्षीदाराने सांगितले आहे. सुमारे २०० जणांच्या जमावाकडून हे अत्याचाराचे कृत्य करण्यात आले आहे.


 
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

भारत-पाकिस्तान संघर्षामधील मध्यस्थीचा आणखी एक दावेदार, चीनचा दावा भारताने फेटाळला

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत

ओडिशाच्या किनाऱ्यावरून एकाच लाँचरमधून लागोपाठ दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

हैद्राबाद : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने

माजी एनआयए प्रमुख सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई : माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती

अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लाच्या अर्थात प्रभू रामाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या

स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच