Manipur Violence : मणिपूरमध्ये आणखी दोन तरुणींवर जमावाकडून अत्याचार करून निर्घृण हत्या

  109

इम्फाळ : दोन महिलांच्या व्हायरल व्हिडिओमुळे देशभरात संताप व्यक्त केला जात असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार (Manipur Violence) समोर आला आहे. इम्फाळामधील कोनुंग मामांग येथे दोन कुकी समाजाच्या तरुणींवर जमावाने बलात्कार करुन त्यांची हत्या केल्याचा आरोप पीडित तरुणींच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. एका वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे.


पीडित, २१ आणि २४ वर्षाच्या तरुणी होत्या. त्या इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील कोनुंग मामांग भागात कार धुण्याचे काम करत होत्या. ४ मे रोजी, राज्यात जातीय हिंसाचाराच्या उसळलेला असताना जमावाने त्यांना लक्ष्य केले. कार वॉश करताना दोन महिलांवर काही महिलांसोबत असलेल्या पुरुषांच्या मोठ्या गटाने हल्ला केल्याचे सांगण्यात आले.


दरम्यान, ही घटना घडली त्यानंतर सुरुवातीला पीडित तरुणीचे कुटुंबिय कलंक लागू नये म्हणून पीडितांची ओळख उघड करण्यात आलेली नाही. मात्र, एका मुलीच्या आईने याबाबत १६ मे रोजी सायकूल पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.


अत्याचार केल्यानंतर या दोन्ही तरुणींची हत्या केल्याचे या एफआयआरमध्ये म्हटले आहे. त्यानंतर हे प्रकरण इम्फाळ जिल्ह्यातील पोरोम्पत पोलीस ठाण्यात हस्तांतरित करण्यात आले. अजूनही या तरुणींचे मृतदेह सापडलेले नाहीत, या प्रकरणी पोलिसांनी एकाही आरोपीला अटक केलेली नाही. यामुळे कुकी समाजातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.


दरम्यान, घटनेच्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराच्या माहितीनुसार, काही महिलांनीच पीडित दोन तरुणींना एका खोलीत घेऊन गेले होते. त्यानंतर पुरुषांना त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यासाठी पाठबळ दिले. जवळपास तब्बल दीड तास पीडित तरुणींवर अत्याचार सुरु होते. त्यानंतर त्यांना ओढत बाहेर काढण्यात आले आणि त्यांना ठार मारुन फेकून दिल्याचे साक्षीदाराने सांगितले आहे. सुमारे २०० जणांच्या जमावाकडून हे अत्याचाराचे कृत्य करण्यात आले आहे.


 
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

जीएसटी सुसूत्रीकरणावर काँग्रेसने केलेल्या टीकेला पंतप्रधान मोदींचे चोख प्रत्युत्तर, काय म्हणाले पहा...

नवी दिल्ली: आज संपूर्ण देश केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या जीएसटी सुसूत्रीकरणावर सकारात्मक चर्चा

डिजिटल भारत: देशात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या १०० कोटींच्या पुढे

नवी दिल्ली: भारताने डिजिटल जगात एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. देशातील इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या तब्बल

New GST Rates : दिवाळी धमाका ऑफर सरकारकडूनच! आता खर्च कमी, मजा जास्त; पनीर, दूध, औषधं आणि शालेय साहित्य जीएसटीमुक्त, ही संपूर्ण यादी वाचा

नवी दिल्ली : सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. दिवाळीच्या

"वचन पूर्ण केलं" GST कर रचनेच्या बदलावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली: वाढणाऱ्या महागाईचा फटका प्रत्येक देशवासीयांना बसत आहे. त्यात सणासुदीच्या काळांत वाढणारे कर

'या' अल्पसंख्यांकांना पासपोर्टशिवाय भारतात राहण्याची मुभा

नवी दिल्ली : पाकिस्तान, अफगानिस्तान आणि बांगलादेश येथून भारतात आलेल्या हिंदू, शीख, ख्रिस्ती, बौद्ध, जैन आणि पारशी

चेक बाउन्स प्रकरणातील दोषीला तुरुंगवास टाळता येणार

नवी दिल्ली : चेक बाउन्सच्या (चेक वटणं) गुन्ह्यात दोषी ठरलेल्या व्यक्तीला सुनावण्यात आलेली तुरुंगवासाची शिक्षा