नाशिक: नाशिकच्या (Nashik) त्र्यंबकेश्वर येथील प्रकरणांबाबत एसआयटीकडून एका महिन्यात रिपोर्ट मागण्यात येणार असल्याची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे.
गेल्या आठवडाभरापासून पावसाळी अधिवेशन असून आजपासून अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु झाला आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वर मंदिर (Trimbakeshwer Mandir) प्रवेश प्रकरणांवर भाष्य केले. ते म्हणाले की, अशा प्रकारची परंपरा आहे का? हा वाद अजून सुरू आहे. कोणीतरी येतं आणि अशी घटना घडवतं. ते ही मिरवणूक थेट आतमध्ये घेऊन गेले. या ठिकाणी सेल्फी आणि फोटो काढण्यात आले. हा प्रकार आमच्या भावना दुखावणारा आहे. दोन्ही बाजूंची बैठक झाली. त्यामध्ये संबंधित समुदायाने माफी मागितली आहे. जे लोक त्या ठिकाणी होते, त्यांना नोटीस देण्यात आली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोणताही धर्म श्रध्दा पाळण्यास शासन आडवं येणार नाही. एखाद्या ठिकाणी परंपरेच्या आड काही खोडसाळ पणा होत असेल तर आम्ही सहन करणार नाही. ठराविक समुदायाने केलेल्या कृत्यामुळे दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होते. ते योग्य नाही जिथे श्रध्दा सर्व समावेशक असते. तिथे शासन त्यांच्या पाठीशी आहे. या संपूर्ण प्रकरणात त्र्यंबकेश्वर मंदिराच्या ट्रस्टीने केलेल्या तक्रारीचे नोंद घेणं सरकारचं काम आहे. नागपूरमधील दर्ग्याच्या विकासासाठी मी स्वत: पैसे दिले. पण एखादा म्हणत असेल, मशिदीसमोर जाऊन आम्हाला नाचायचं आहे, हे योग्य नाही. सर्वानी एकमेकांच्या धर्माचा आदर केला पाहिजे.
त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश प्रकरण झाले, त्यावेळी एफआयआर नोंदवून अत्यंत कडक कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. तसेच या घटनेच्या चौकशीसाठी अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत एसआयटी स्थापन करण्यात आली होती. ही एसआयटी केवळ यावर्षीच्या घटनेची चौकशी करणार नाही, तर गेल्या वर्षीच्या घटनेचीही चौकशी करेल, असेही सांगण्यात आले होते. त्यावर आज पावसाळी अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटीकडून या प्रकरणात एका महिन्यात रिपोर्ट मागण्यात येणार असल्याचे सांगितले.
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…