Shrawan : तब्बल १९ वर्षांनंतर पुन्हा आला तोच योग! अशी करा शिवलिंगाची पूजा, होतील मनोकामना पूर्ण

यंदाचा अधिक लय भारी; अधिक मासातील आज पहिला सोमवार


मुंबई : एखादा विशिष्ट महिना अधिकमास आला की १९ वर्षांनंतर तोच महिना अधिकमास म्हणून येतो. यंदाच्या वर्षी १९ वर्षांनंतरचा हाच दुर्मीळ योग आला आहे. त्यामुळे अधिक मासाला 'अधिक' महत्त्व प्राप्त झाले आहे.


शिवाय या वर्षी अधिक महिना असल्याने श्रावण (Shrawan) महिन्यात चार ऐवजी ८ श्रावणी सोमवारचे व्रत केले जाणार आहेत. सोमवार २४ जुलै रोजी अधिक मासातील पहिला सोमवार आहे.


अधिक मासचा पहिला सोमवार हा विशेष मानला जातो. या दिवशी उपवास करून भोलेनाथाची पूजा-अर्चा केल्यास त्यांचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात, असे मानले जाते.



सूर्याधारित पंचांग पाळणाऱ्या आसाम, ओरिसा, केरळ, तमिळनाडु, पश्चिम बंगाल या राज्यांत अधिक महिना नसतो. तो फक्त चांद्र पंचांग वापरणाऱ्या आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशांसारख्या राज्यांत पाळला जातो. चैत्रापासून आश्विन महिन्यांपर्यंतचा कोणताही एक महिना अधिक मास म्हणून येऊ शकतो. कारण या महिन्यांतच सूर्यांची गती मंद असते व त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत जायला जास्त वेळ लागतो. क्वचित कार्तिक ते फाल्गुन महिन्यातही अधिक मास येतो. त्या वर्षी एकाच नावाचे दोन चांद्र महिने असतात, अगोदरचा अधिकमास आणि नंतर लगेच येणारा महिना हा निजमास.



शिवलिंगाची पूजा कशी करावी?


श्री शंकर देव हे त्रिमूर्तींपैकी एक आहेत. श्री शंकराची पूजा ही शिवलिंग आणि मूर्तीच्या रुपात केली जाते. शिवलिंगाची पूजा करताना अनेक गोष्टींचा वापर केला जातो. श्री शंकराची नियमित पूजा केल्यास दारिद्र्य दूर होते, आरोग्य नीट राहते, स्वभाव शांत राहतो, समाजातला मान सन्मान वाढतो आणि यश प्राप्ती होते.



शिव शंकराची पूजा करताना...


१) पाणी- शंकराला पाणी खूप आवडते. ओम नम: शिवाय हा मंत्र बोलताना हळूहळू शिवलिंगावर पाणी वाहिल्यास तुमचा स्वभाव शांत होतो.


२) केशर- पाण्याप्रमाणे शंकराला केशर ही तितकीच प्रिय आहे. दर सोमवारी शिवलिंगावर केशरचे दूध वाहिल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि लग्न लवकर होते.


३) साखर- महादेवाला अभिषेक करायचा झाल्यास शिवलिंगावर साखर वाहायची, असे केल्यास धन लाभ होतो.


४) दूध - शिवलिंगावर दूध वाहावे. त्याने आरोग्य नीट राहते आणि कोणतेच आजार होत नाहीत.


५) दही - पाणी, केशरप्रमाणे शंकराला दही देखील खूप आवडते. शंकराला दही वाहिल्यास जीवनात असलेले सर्व त्रास निघून जातात.


६) चंदन - शिवलिंगावर चंदन वाहिल्यास व्यक्तीमध्ये सकारात्मक बदल दिसून येतात. तसेच समाजात देखील त्या व्यक्तिला मान सन्मान प्राप्त होतो.


७) मध - मध हे गोड असते. शिवलिंगावर मध वाहिल्यास व्यक्तीच्या वाणीत गोडवा निर्माण होतो.


८) गाईचे तूप - गाईच्या दूधापासून तयार केलेले तूप शंकरावर वाहावे. तूप वाहिल्यास जीवनात प्रगती होते.


९ ) भांग - शंकराला भांग खूप प्रिय आहे. शिवलिंगावर भांगचे लेप किंवा भांगाची पाने वाहू शकता. असे केल्यास जीवनातून नकारात्मकता आणि वाईट सावली निघून जाते.


 
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Ravi Pandit Passes Away : पुण्यातील नामांकित उद्योजक रवी पंडित यांचे निधन; आयटी क्षेत्रातील दूरदर्शी नेतृत्व हरपले...

पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक आणि KPIT Technologies चे संस्थापक व अध्यक्ष रवी पंडित यांचे आज (८ मे) पुण्यात निधन झाले. कंपनीने

Chief Minister Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केपीआयटीचे अध्यक्ष, ज्येष्ठ उद्योजक रवी पंडित यांना श्रद्धांजली

देशातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाच्या पहिल्या फळीतील मार्गदर्शक उद्योजक हरपला मुंबई : माहिती तंत्रज्ञानाच्या

Yuzi Chahal : युजवेंद्र चहलने वापरली ई - सिगरेट ; विमानातला 'तो' व्हिडिओ होतोयं व्हायरल...

आयपीएल २०२६ आता अखेरच्या टप्पयात आहे. हंगाम संपायला आता काही सामने बाकी आहेत. अशातच गेल्या काही दिवसांपासून रोज

कौतुकास्पद ! पेपर विक्रेत्याच्या मुलीने मिळविले शंभर टक्के, शिकवणी न लावता श्रावणीने गाठले यशाचे शिखर

नाशिक :  मनात जिद्द असेल तर आयुष्यातील कठोर प्रसंगांवरही मात करता येते. याचाच प्रत्यय नाशिकमध्ये आला आहे. आर्थिक

नाशिकच्या ‘कॉर्पोरेट जिहाद’नंतर राज्य सरकार अलर्ट मोडवर

‘पॉश’ कायद्याची अंमलबजावणी अनिवार्य; कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावले मुंबई : नाशिक येथील

मिरा भाईंदरमधील २५४ एकर जमिनीसाठी; राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार

मुंबई : मिरा भाईंदर येथील मिठागराची तब्बल २५४ एकर मोक्याची शासकीय जमीन एका खासगी कंपनीच्या घशात जाण्याची