Governmental Help : नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना आता पाच हजारांऐवजी दहा हजारांची मदत

अर्थमंत्री अजित पवार यांची घोषणा


मुंबई : राज्यात पावसाने माजवलेल्या हाहाकारामुळे (Heavy rainfall) अनेक शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. काही दिवसांपूर्वी पावसाच्या आगमनाने आनंदलेला शेतकरी पुन्हा एकदा चिंताग्रस्त झाला आहे. विदर्भ आणि मराठवाड्याला (Vidarbha and marathwada) तर याचा जोरदार फटका बसला आहे. या प्रश्नाबाबत विरोधकांनी अधिवेशनात आवाज उठवला होता. त्यावर शासनाकडून तातडीने निर्णय घेण्यात आला असून याबाबतची घोषणा उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली.


पावसाळी अधिवेशनादरम्यान आज विधानपरिषदेमध्ये निवेदन सादर करताना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने पाच हजार ऐवजी १० हजारांची मदत करण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. अजित पवार म्हणाले, अन्नधान्य व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दुर्घटनेचा प्रसंग घडला तर ताबडतोब त्या ठिकाणी धान्य पोहोचवण्याचे आदेश दिले आहेत. ज्यांना धान्य शिजवणं शक्य नसेल त्यांना शिजवलेले धान्य बंद पॅकेट्समधून वाटण्यात येईल. तसेच पुराच्या ठिकाणी रोगराई पसरू नये यासाठी स्वच्छता करण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणी स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.


अजित पवार म्हणाले की, २३ जुलै रोजी राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यामध्ये मोठं नुकसान झालं आहे. यवतमाळ, बुलढाणा, वाशीम, अकोला या जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. पाणी पातळीत वाढ झाल्याने अनेक ठिकाणी रस्ते बंद झाले होते. अशा ठिकाणी बचाव कार्य करण्यात आले आहे. याठिकाणी मंत्र्यांनी भेटीही दिल्या आहेत. वायुदल, एनडीआरएफ (NDRF), एसडीआरएफ (SDRF) यांची मदत घेऊन अनेक लोकांना वाचवण्यात आले आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकार धावले आहे. तसेच जिल्ह्यातील पिकांची पाहणी करून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश अजित पवार यांनी दिले आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

मुंबई २०३० पर्यंत रेबीजमुक्त करणार, महापालिकेचा निर्धार

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेतील आरोग्य संस्थांमधील रेबीज प्रतिबंधक लसीकरण केंद्रे, लसीकरण आणि

थरारक! मेट्रो स्टेशनखालील खड्ड्यात अडकला तरूणाचा पाय, मोठ्या प्रयत्नाने केली सुटका

मुंबई: मुंबईत शुक्रवारी रात्री थरारक सुटकेची घटना घडली. जोगेश्वरी मेट्रो स्टेशनखाली असलेल्या खड्ड्यात तरूणाचा

गिरगावात आगीच्या दुर्घटनेत फूड स्टॉल जळून खाक

मुंबई: दक्षिण मुंबईतील गिरगाव येथे एका फूड स्टॉलला मोठी आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या दुर्घटनेत हा फूड स्टॉल

भूखंड पालिकेचा की, खासगी विकासकांचा ?

पालिकेच्या नावाचे फलक बसवण्याची मागणी मुंबई (प्रतिनिधी) : उपनगरात बहुतांश ठिकाणी मनपा प्रशासनाचे मोकळे भूखंड,

मुबंईत येत्या मंगळवारपासून तीन दिवस १० टक्के पाणीकपात

मुंबई : मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे, पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील १०० किलोव्हॅट

भायखळा-सायन स्थानकांदरम्यान पायाभूत कामांसाठी ब्लॉक

मुंबई (प्रतिनिधी) : सायन (शीव) आणि भायखळा अशा दोन रेल्वे स्थानकांवरील पादचारी पुलाच्या कामांसाठी मध्य रेल्वेकडून