Governmental Help : नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना आता पाच हजारांऐवजी दहा हजारांची मदत

Share

अर्थमंत्री अजित पवार यांची घोषणा

मुंबई : राज्यात पावसाने माजवलेल्या हाहाकारामुळे (Heavy rainfall) अनेक शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. काही दिवसांपूर्वी पावसाच्या आगमनाने आनंदलेला शेतकरी पुन्हा एकदा चिंताग्रस्त झाला आहे. विदर्भ आणि मराठवाड्याला (Vidarbha and marathwada) तर याचा जोरदार फटका बसला आहे. या प्रश्नाबाबत विरोधकांनी अधिवेशनात आवाज उठवला होता. त्यावर शासनाकडून तातडीने निर्णय घेण्यात आला असून याबाबतची घोषणा उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली.

पावसाळी अधिवेशनादरम्यान आज विधानपरिषदेमध्ये निवेदन सादर करताना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने पाच हजार ऐवजी १० हजारांची मदत करण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. अजित पवार म्हणाले, अन्नधान्य व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दुर्घटनेचा प्रसंग घडला तर ताबडतोब त्या ठिकाणी धान्य पोहोचवण्याचे आदेश दिले आहेत. ज्यांना धान्य शिजवणं शक्य नसेल त्यांना शिजवलेले धान्य बंद पॅकेट्समधून वाटण्यात येईल. तसेच पुराच्या ठिकाणी रोगराई पसरू नये यासाठी स्वच्छता करण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणी स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.

अजित पवार म्हणाले की, २३ जुलै रोजी राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यामध्ये मोठं नुकसान झालं आहे. यवतमाळ, बुलढाणा, वाशीम, अकोला या जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. पाणी पातळीत वाढ झाल्याने अनेक ठिकाणी रस्ते बंद झाले होते. अशा ठिकाणी बचाव कार्य करण्यात आले आहे. याठिकाणी मंत्र्यांनी भेटीही दिल्या आहेत. वायुदल, एनडीआरएफ (NDRF), एसडीआरएफ (SDRF) यांची मदत घेऊन अनेक लोकांना वाचवण्यात आले आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकार धावले आहे. तसेच जिल्ह्यातील पिकांची पाहणी करून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश अजित पवार यांनी दिले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

Hathras Stampede : हाथरस दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना २ लाख तर जखमींना ५० हजार रूपयांची मदत

हाथरस : उत्तर प्रदेशचे (Uttar pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी हाथरस येथील…

1 min ago

SSC-HSC Exam : दहावी-बारावी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पुरवणी परीक्षेची तारीख जाहीर

मुंबई : दहावी आणि बारावीच्या (SSC-HSC Exam) परीक्षेत अनुत्तीर्ण (Fail) झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर…

39 mins ago

Nutrition Food : OMG! शालेय पोषण आहारात आढळले सापाचे पिल्लू

चिमुकल्यांसह पालकांमध्ये भीतीचे वातावरण सांगली : शालेय विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी यासाठी शालेय पोषण आहार…

2 hours ago

Milk Price Hike : ग्राहकांच्या खिशाला चाप! गोकुळच्या दूध दरात ‘इतक्या’ रुपयांनी वाढ

मुंबई : सध्या सातत्याने महागाई वाढत चालत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला…

2 hours ago

Horoscope: जुलै महिन्यात या ४ राशींचे जीवन होणार सुखकर, होणार हे बदल

मुंबई: जुलै महिन्याला सुरूवात झाली आहे. जुलै २०२४मध्ये ४ मोठे ग्रह शुक्र, बुध, मंगळ आणि…

3 hours ago

Indian Team: टीम इंडियाच्या परतण्याला पुन्हा उशीर, चक्रवाती वादळामुळे सातत्याने येतायत अडचणी

मुंबई: भारतीय क्रिकेट संघ अद्याप बार्बाडोसमध्येच अडकला आहे. टीम इंडियाने बार्डाडोसमध्ये फायनल सामना जिंकत टी-२०…

4 hours ago