Rahul Kanal : आदित्य ठाकरेंचे खास राहुल कनाल मोर्चाच्याच दिवशी शिवसेनेत

खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलं होतं सूचक वक्तव्य


मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून ठाकरे गटाला लागलेली गळती कायम आहे. ठाकरे गटाच्या अनेक बड्या बड्या नेत्यांनी पक्ष सोडल्यानंतर आता आदित्य ठाकरेंच्या युवासेनेतील कोअर कमिटीचे सदस्य व निकटवर्तीय असलेले राहुल कनाल देखील मोर्चाच्याच दिवशी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.


राहुल कनाल यांनी महिन्यापूर्वीच युवासेना कार्यकारिणीचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रूप सोडला होता. शिवसेनेत येण्यापूर्वी ते काँग्रेसमध्ये कार्यरत होते. राहुल कनाल युवासेनेत नाराज असल्याची चर्चा होती. पक्षातील अंतर्गत कुरघोडींना कंटाळून राहुल कनाल बाहेर पडल्याची चर्चा आहे.



ठाकरे गटाला आता अनेक धक्के बसणार


या सगळ्याबाबत जेव्हा खासदार श्रीकांत शिंदे यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी “ठाकरे गटाला आता अनेक धक्के बसणार आहेत. एकनाथ शिंदे यांचा जनाधार आणि विश्वास दररोज वाढतोय. नवी माणसं रोज मोठ्या प्रमाणात एकनाथ शिंदे यांच्यासोबत जोडली जात आहेत” अशी सूचक प्रतिक्रिया दिली होती. तर दुसरीकडे “मी माझा निर्णय लवकरच जाहीर करेन”, असं राहुल कनाल या सगळ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर म्हणाले होते. त्यामुळे ठाकरे गटाच्या मोर्चाच्या दिवशी साथीदारांनीच साथ सोडल्याने पक्षाला मोठा खड्डा पडला आहे.



नितेश राणेंनी उडवली खिल्ली


दरम्यान, यावर भाजप आमदार नितेश राणेंनी ट्विटद्वारे 'हमारी अधुरी कहानी' चित्रपटाचे पोस्टर व सोबत आदित्य ठाकरे व राहुल कनाल यांचा मिठी मारतानाचा फोटो अशी सूचक पोस्ट शेअर करत आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवली आहे.






हा चित्रपट १ जुलैला प्रदर्शित होत आहे तेव्हा पाहायची संधी गमवू नका असंही या ट्विटद्वारे नितेश राणे म्हणाले आहेत.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

खोकल्याच्या सिरपमुळे बालकांचा मृत्यू; खबरदारीसाठी राज्याने 'हा' टोल-फ्री क्रमांक केला जारी!

मुंबई: मध्य प्रदेश आणि राजस्थानसह देशातील काही राज्यांमध्ये 'कोल्ड्रिफ' (Coldrif) नावाच्या खोकल्याच्या सिरपमुळे काही

लाडक्या बहिणींची 'ई केवायसी'तील तांत्रिक अडचण लवकर दूर करणार, मंत्री आदिती तटकरेंचे आश्वासन

मुंबई(प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता 'ई-केवायसी' बंधनकारक केली आहे.

ठाकरे बंधूंची मात्रोश्रीवर भेट, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. शिवसेना

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करता येणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ते मालाड या पट्ट्यात प्रचंड लोकवस्ती आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय,

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात