Nagpur Crime : बाप रे... एवढा संताप नक्की कशाचा? 'माझ्या गर्लफ्रेण्डला मेसेज करु नकोस' म्हणणा-या बॉयफ्रेण्डचा 'त्या' मित्राने केला थेट खून!

राज्यात गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ


नागपूर : राज्यभरातून प्रेमाला नकार दिल्याने मुलीचा जीवच घेणा-या विकृत तरुणांच्या संतापजनक घटना समोर येत असतानाच आता नागपुरातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या प्रेयसीला मेसेज करु नकोस असं धमकावणा-या बॉयफ्रेण्डचा प्रेयसीच्या एका मित्राने थेट खून केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारी २९ जूनला घडली. यात हत्या झालेल्या तरुणाचे नाव श्रेयांश पाटील असून अमित मेश्राम असं आरोपीचं नाव आहे.


आरोपी अमितने आपल्या गर्लफ्रेण्डला स्तुती करणारे मेसेज पाठवल्याने श्रेयांश संतप्त झाला होता व अमितला मेसेज न करण्याची ताकीद दिली होती. याबद्दल चीड येऊन अमितने आपल्या दोन मित्रांना सोबत घेऊन श्रेयांशवर लोखंडी रॉडने हल्ला केला. त्याला गंभीर जखमी करुन आरोपी तिथून फरार झाले. श्रेयांशला रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी उपनिरीक्षक प्रदीप कायटे यांच्या नेतृत्वाखाली जरीपटका पोलिसांच्या पथकाने काही तासात अमित मेश्रामसह तीन आरोपींना अटक केली. आरोपींमधील दोन जण अल्पवयीन आहेत. या प्रकरणाचा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून तपास केला जात होता. परंतु इन्स्टाग्राम मेसेजवरुन वाद झाल्याने हे हत्याकांड घडलं, अशी माहिती पोलीस उपायुक्त अर्चित चांडक यांनी दिली.



नेमकं प्रकरण काय?


श्रेयांश व अमित यांची एका तरुणीसोबत मैत्री होती, तर श्रेयांश हा त्या तरुणीचा प्रियकर होता. काही दिवसांपूर्वी अमितने तरुणीची स्तुती करणारे काही मेसेज तिला इन्स्टाग्रामवर पाठवले. या मेसेजची स्टोरी तरुणीने इन्स्टाग्रामवर शेअर केली. हे पाहून तरुणीचा प्रियकर श्रेयांश चिडला व त्याने अमितला इन्स्टाग्राम मेसेजद्वारे आपल्या प्रेयसीला मेसेज न करण्याबाबत धमकावले. यावरुन त्यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु होता आणि तो वाढत गेला. अमितला या गोष्टीचा प्रचंड राग आल्याने त्याने चर्चा करण्यासाठी श्रेयांशला बुद्ध विहाराजवळ बोलावून घेतले.


श्रेयांशलाही धोका असल्याचे कळल्याने त्याने सोबत चाकू ठेवला होता. बुद्ध विहाराजवळ अमित आपल्यासोबत आणखी दोन मित्रांना घेऊन आला होता व त्यांनी श्रेयांशसोबत झटापट केली. या झटापटीत अमितने लोखंडी रॉडने श्रेयांशवर हल्ला केला. श्रेयांशने चाकू काढताच दोन्ही मित्रांनी चाकू हिसकावून घेतला व श्रेयांशला गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला. श्रेयांशचा मात्र उपचारादरम्यानच मृत्यू झाला.


दरम्यान श्रेयांश पाटील हा जरीपटका परिसरातील एका कापडाच्या दुकानात कामाला होता. तर अमित मेश्रामवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचे वडील गणपत मेश्राम देखील गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. या संपूर्ण घटनेमुळे राज्यात विकृती विकोपाला गेल्याचे चित्र आहे. गुन्हेगारी वाढत असून यावर ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Jalgaon : छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील उमाळा घाटात भीषण अपघात, दोन ठार, चार गंभीर

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर–जळगाव महामार्गावर (Chhatrapati Sambhajinagar–Jalgaon Highway) भीषण अपघात घडल्याची माहिती समोर

Ahilyanagar : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान ; निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, राजकीय वातावरण तापले

अहिल्यानगर (राहुरी प्रतिनिधी) : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Ahilyanagar District Central Cooperative Bank) होवू घातलेल्या

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी

Ketan Agrawal Murder Case : 'मला त्याला स्लो पॉयझन देऊन मारायचं होतं..';केतन हत्याकांड प्रकरणातील 'त्या' गुप्त कटामागचा मास्टरमाइंड कोण?

केतन अग्रवाल हत्याकांडात धक्कादायक दावा; 'स्लो पॉयझन' देण्याचाही कट असल्याची तपासात चर्चा पुणे : केतन

Minister Radhakrishna Vikhe Patil : मतदार यादीत घुसखोरांना जागा नाही ; पुनरिक्षण मोहिमेत कार्यकर्त्यांनी पुढे या : ना. राधाकृष्ण विखे पाटील

Ahilyanagar (Shevgaon) : मतदार यादीची सखोल पुनरिक्षण मोहीम भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे.सरकारी स्तरावर काम सुरू असले

Wardha Murder : वर्ध्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना! 12 वर्षांच्या मुलीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; नराधमांनी ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा

वर्धा : वर्धा  (wardha) जिल्ह्यातील रोठा गावातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली