Nagpur Crime : बाप रे... एवढा संताप नक्की कशाचा? 'माझ्या गर्लफ्रेण्डला मेसेज करु नकोस' म्हणणा-या बॉयफ्रेण्डचा 'त्या' मित्राने केला थेट खून!

राज्यात गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ


नागपूर : राज्यभरातून प्रेमाला नकार दिल्याने मुलीचा जीवच घेणा-या विकृत तरुणांच्या संतापजनक घटना समोर येत असतानाच आता नागपुरातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या प्रेयसीला मेसेज करु नकोस असं धमकावणा-या बॉयफ्रेण्डचा प्रेयसीच्या एका मित्राने थेट खून केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारी २९ जूनला घडली. यात हत्या झालेल्या तरुणाचे नाव श्रेयांश पाटील असून अमित मेश्राम असं आरोपीचं नाव आहे.


आरोपी अमितने आपल्या गर्लफ्रेण्डला स्तुती करणारे मेसेज पाठवल्याने श्रेयांश संतप्त झाला होता व अमितला मेसेज न करण्याची ताकीद दिली होती. याबद्दल चीड येऊन अमितने आपल्या दोन मित्रांना सोबत घेऊन श्रेयांशवर लोखंडी रॉडने हल्ला केला. त्याला गंभीर जखमी करुन आरोपी तिथून फरार झाले. श्रेयांशला रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी उपनिरीक्षक प्रदीप कायटे यांच्या नेतृत्वाखाली जरीपटका पोलिसांच्या पथकाने काही तासात अमित मेश्रामसह तीन आरोपींना अटक केली. आरोपींमधील दोन जण अल्पवयीन आहेत. या प्रकरणाचा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून तपास केला जात होता. परंतु इन्स्टाग्राम मेसेजवरुन वाद झाल्याने हे हत्याकांड घडलं, अशी माहिती पोलीस उपायुक्त अर्चित चांडक यांनी दिली.



नेमकं प्रकरण काय?


श्रेयांश व अमित यांची एका तरुणीसोबत मैत्री होती, तर श्रेयांश हा त्या तरुणीचा प्रियकर होता. काही दिवसांपूर्वी अमितने तरुणीची स्तुती करणारे काही मेसेज तिला इन्स्टाग्रामवर पाठवले. या मेसेजची स्टोरी तरुणीने इन्स्टाग्रामवर शेअर केली. हे पाहून तरुणीचा प्रियकर श्रेयांश चिडला व त्याने अमितला इन्स्टाग्राम मेसेजद्वारे आपल्या प्रेयसीला मेसेज न करण्याबाबत धमकावले. यावरुन त्यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु होता आणि तो वाढत गेला. अमितला या गोष्टीचा प्रचंड राग आल्याने त्याने चर्चा करण्यासाठी श्रेयांशला बुद्ध विहाराजवळ बोलावून घेतले.


श्रेयांशलाही धोका असल्याचे कळल्याने त्याने सोबत चाकू ठेवला होता. बुद्ध विहाराजवळ अमित आपल्यासोबत आणखी दोन मित्रांना घेऊन आला होता व त्यांनी श्रेयांशसोबत झटापट केली. या झटापटीत अमितने लोखंडी रॉडने श्रेयांशवर हल्ला केला. श्रेयांशने चाकू काढताच दोन्ही मित्रांनी चाकू हिसकावून घेतला व श्रेयांशला गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला. श्रेयांशचा मात्र उपचारादरम्यानच मृत्यू झाला.


दरम्यान श्रेयांश पाटील हा जरीपटका परिसरातील एका कापडाच्या दुकानात कामाला होता. तर अमित मेश्रामवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचे वडील गणपत मेश्राम देखील गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. या संपूर्ण घटनेमुळे राज्यात विकृती विकोपाला गेल्याचे चित्र आहे. गुन्हेगारी वाढत असून यावर ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य

Fake cotton seeds : खरीपच्या तोंडावर मोठा घोटाळा उघड ! जामनेरमध्ये बनावट कापूस बियाण्यांचा साठा जप्त

Fake cotton seeds : जळगाव जिल्ह्यात खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा मोठा डाव उधळून लावण्यात आला आहे.

PM Suryaghar Yojana : सौर ऊर्जेत महाराष्ट्राची दमदार झेप ! पीएम सूर्यघर योजनेत ८ राष्ट्रीय पुरस्कार; जळगाव देशात टॉप-१० मध्ये

PM Suryaghar Yojana : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्राने (Maharashtra) देशभरात आपली वेगळी छाप उमटवली