प्रहार    

Eid mubarak : राज्यात आज बकरी ईदला कुर्बानी नाही!

  174

Eid mubarak : राज्यात आज बकरी ईदला कुर्बानी नाही!

आषाढी एकादशी व बकरी ईद एकाच दिवशी आल्याने मुस्लिम बांधवांनी घेतला सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी पुढाकार


मुंबई : आज आषाढी एकादशी (Aashadhi Ekadashi) निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण विठुमय झाले आहे. याच दिवशी बकरी ईदसुद्धा (Bakari Eid) साजरी केली जाणार आहे. मात्र बकरी ईदला दिली जाणारी कुर्बानी त्या दिवशी न देता दुसऱ्या दिवशी देण्याचा आदर्श निर्णय राज्यातील मुस्लीम बांधवांनी घेतला आहे. तर जळगावच्या अमळनेर शहरात तर यंदा कुर्बानीच दिली जाणारा नसल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुस्लीम बांधवांकडून घेण्यात आला आहे.


सोशल मीडियावरील वादग्रस्त मेसेजच्या कारणावरून राज्यात काही समाजकंटक तणाव निर्माण करत असताना दुसरीकडे राज्यभरातील अनेक गावांमधील हिंदू-मुस्लिम बांधवांनी सामाजिक सलोखा कायम राहण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यंदा आषाढी एकादशी व बकरी ईदचा सण २९ जून या एकाच दिवशी आला आहे. त्यामुळे या दिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय महाराष्ट्रातील अनेक गावातील मुस्लिम बांधवांनी घेऊन एक आदर्श निर्माण केला आहे. त्याऐवजी ३० जून रोजी कुर्बानी देण्यात येईल, असे शांतता समितीच्या बैठकीतून जाहीर केले जात आहे.



हे पण वाचा - Eid Mubarak : यंदा बकरी ईदला कुर्बानी देणार नाही!


‘एकादशीच्या दिवशी उपवास करून सर्वांना सुखी ठेवण्याची प्रार्थना केली जाते. बकरी ईदलाही आपण पैगंबरांजवळ हीच मागणी करतो. मग या दिवशी पशुहत्या करीत आपण काय साध्य करतो? यंदा एकादशी आणि बकरी ईद एकत्र आल्याने या दिवशी पशुहत्या टाळणे गरजेचे आहे,’ असे मत नगर जिल्ह्यातील निघोज येथे झालेल्या शांता समितीच्या बैठकीत डॉ. रफिक सय्यद यांनी व्यक्त केले. त्याला सर्व गावकऱ्यांनी एकमुखाने पाठिंबा दिल्याने या गावांचेही कौतुक होत आहे.


नगर जिल्ह्यातील नेवासे, घोडेगाव, शेवगाव, श्रीगोंदे तालुक्यातील बेलवंडी, विसापूर, मढेवडगाव, श्रीरामपूर, बेलापूर, जामखेड आदी गावातील मुस्लिम बांधवांनीही असाच निर्णय घेतला आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रासह शेजारी राज्यातील वारकरी मोठ्या संख्येने पंढरपूर शहर व सोलापूर जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील १०० गावे, मंगळवेढा तालुक्यातील ८१ गावे व करमाळा, वैराग या शहरांनीही शुक्रवारी कुर्बानी देण्याचे ठरवले आहे.


मराठवाड्यातील २१८, तर विदर्भातील ८० गावे


मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, धाराशिव जिल्ह्यातील २१८ गावांतील मुस्लिम बांधवांनीही बुधवारी कुर्बानी न देण्याचा एकमुखी ठराव केला. विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यात ३३ गावे, यवतमाळचे चार तालुके, वाशिमच्या ४७ गावांनीही हा आदर्श कायम ठेवला आहे. त्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरच्या जवळच्या असलेल्या छोट्या पंढरपूरच्या आसपासच्या गावांनी असाच निर्णय घेतला होता. या निर्णयाचे कौतुक झाले होते.


 
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

'ग्लोबल गणेश फेस्टिवल २०२५'च्या अध्यक्षपदी एकनाथ शिंदे, स्वागताध्यक्षपदी चंद्रकांत पाटील

पुणे: गौरवशाली परंपरा असलेल्या पुण्याचा गणेशोत्सवाला आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक व्यापक करण्यासाठी ग्लोबल

कांदा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नाशिक जिल्ह्यातील ९६७२ कांदा उत्पादक शेतकऱ्यांना १८ कोटी ५८ लाख रुपयांचे अनुदान वितरीत

येवला: राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला लासलगाव

तुळजाभवानी मंदिरात तणाव: आव्हाड समर्थकांनी सुरक्षा रक्षकांशी धक्काबुक्की केल्याचा आरोप

तुळजापूर: तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामावरून सुरू असलेल्या वादामुळे तुळजापूरमध्ये राजकीय

ठाण्यात यंदा टेंभीनाक्यावर अनुभवयाला मिळणार थरांचा थरार

ठाणे :  धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाण्यात टेंभीनाका येथे दहिहंडी उत्सव सुरु करुन साहसी उत्सवाला एका उंचीवर नेऊन

मुंबई-दिघी आणि मुंबई-काशीद रो-रो सेवा मार्चपर्यंत कार्यान्वित करा- मंत्री नितेश राणे

डिझेल परतावा योजनेपासून एकही पात्र मच्छीमार वंचित राहणार नाही मुंबई : मुंबईकरांचा कोकणात जाण्याचा प्रवास सुखकर

Laxman Hake on Manoj Jarange Patil: गणेशोत्सवात मुंबईला जाऊन दंगल घडवायचा जरांगेंचा प्लॅन! लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप

पुणे: मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील येत्या २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मराठा मोर्चा घेऊन धडकणार