Devendra Fadanvis: सुशांत प्रकरणाबद्दल देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट, तपास सुरुच! कारण....

मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आणि दिशा सालियन (Disha salian) यांच्या मृत्यू प्रकरणाबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये  मोठा गौप्यस्फोट केला आहे.


एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणाबाबत विचारण्यात आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं,  या प्रकरणाची जी काही माहिती उपलब्ध होती ती ऐकीव माहिती होती. मात्र, नंतर काही लोकांनी सांगितले की, त्यांच्याकडे या प्रकरणाशी संबंधित काही ठोस पुरावे आहेत. आम्ही त्यांच्याशी बोलून ते पुरावे पोलिसांकडे देण्यास सांगितले आहे. सध्या उपलब्ध असलेले सर्व पुरावे बरोबर आहेत की नाही, हे तपासले जात आहे. तपास सुरू आहे, त्यामुळे त्याच्या निकालावर काहीही बोलणे योग्य ठरणार नाही. योग्य वेळ आल्यावर मी याबद्दल बोलेन  असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.



जाणून घ्या सुशांत प्रकरणात संशय का वाढला?


यावर्षी जानेवारी महिन्यात सुशांत प्रकरणात एक धक्कादायक बाब समोर आली होती. अभिनेत्याच्या शवविच्छेदनादरम्यान उपस्थित असलेले शवविच्छेदन कर्मचारी रूपकुमार शाह यांनी दावा केला की सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या करण्यात आली आहे.


त्यांनी सांगितले की, सुशांतचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी आणला असता त्याच्या मानेवर आणि शरीराच्या काही भागावर जखमांच्या खुणा होत्या. रूपकुमार यांना याबाबत वरिष्ठांशी बोलायचे होते, मात्र त्यांनी याबाबत नंतर बोलू, असे सांगितले.


तसेच, शवविच्छेदन कर्मचार्‍यांनी सांगितले की  सुशांतच्या मृत्यूच्या वेळी कूपर रुग्णालयात पाच मृतदेह होते. यातील एक मृतदेह व्हीआयपीचा असल्याचे त्यांना सांगण्यात आले. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काय लिहायचे हे डॉक्टरांचे काम आहे, पण सुशांतचे फोटो पाहून कोणीही म्हणू शकेल की त्याची हत्या झाली आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या