Asian Kabbadi Championship: इराणला नमवत भारताची अंतिम फेरीत धडक

  278

आशियाई कबड्डी चॅम्पियनशीप स्पर्धा


सेऊल (वृत्तसंस्था) : बलाढ्य इराणला ३३-२८ असे नमवत भारताने आशियाई कबड्डी चॅम्पियनशीप (Asia Kabbadi Championship) स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. गुरुवारी उपांत्य फेरीचा हा सामना झाला. भारतीय संघाचा हा लागोपाठ चौथा विजय आहे.


भारतीय संघाचा कर्णधार पवन सहरावतने दमदार चढाया मारत भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. भारताने जमवलेल्या ३३ पैकी १६ गुण एकट्या पवनने मिळवले. महाराष्ट्राच्या अस्लम इनामदारने सामन्याच्या ११व्या मिनिटाला चढाईत २ गुण मिळवत इराणला ऑलआऊट केले. त्यामुळे भारताने ११-५ अशी आघाडी घेतली. सहरावतच्या अप्रतिम चढायांच्या बळावर पहिल्या हापला चार मिनिटे शिल्लक असताना भारताची आघाडी १७-७ अशी होती. मध्यंतराला भारताकडे १९-९ अशी १० गुणांची आघाडी होती. इराणने पहिल्या हाफनंतर आपला खेळ उंचावत शानदार पुनरागमन केले. दुसऱ्या हापच्या सुरुवातीलाच इराणने भारताला ऑलआऊट केले. त्यामुळे २६-२२ असा अटीतटीचा सामना रंगला. इराण फक्त चार गुणांनी भारताच्या मागे होता. अखेरच्या काही मिनिटांत भारताने आपला खेळ उंचावला. सुपर टॅकलनंतर अर्जुन देशवालने दोन गुण मिळवले. अखेर भारताने ३३-२८ असा विजय मिळवला.


भारतीय संघाने लागोपाठ चौथ्या विजयाची नोंद केली. भारताने आठव्या आशियाई कबड्डी चॅम्पियनशीपच्या विजायाकडे कूच केली आहे. आतापर्यंत भारताने सात आशियाई चॅम्पियनशीप स्पर्धेत चषकावर नाव कोरले आहे. इराणने एक वेळा विजेतेपद पटकावला आहे. इराणने २००३ मध्ये आशियाई चॅम्पियनशीप स्पर्धेत चषकावर नाव कोरले आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार