Maharashtra Update : आंबेनळी घाटात रात्री दरड कोसळली, वाहतूक ठप्प

ताम्हिणी मार्गे प्रवास करण्याची सूचना


पोलादपूर : आंबेनळी घाटात (Ambenali ghat) दोन दिवसांपासून दरड कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. मात्र आंबेनळी घाटात रात्री मोठी दरड कोसळल्याने वाहतूक पूर्ण ठप्प झाली आहे. कोसळलेल्या दरडीमुळे रस्त्याचा अर्ध्याहून अधिक भाग दरीत गेला आहे. घटनास्थळी अद्यापही दरड कोसळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरडीमुळे कोणतेही मोठे नुकसान झाले आहे किंवा कसे हे मात्र कळू शकलेले नाही. दरडी काढण्याचे काम सुरू आहे. यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे.


ज्या ठिकाणी दरड कोसळली आहे त्या ठिकाणी दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. आंबेनळी घाटाजवळ प्रतापगडाच्या पायथ्याजवळ पोलादपूर हद्दीत मोठी दरड कोसळली आहे. या घटनेची माहिती मिळातच पोलादपूर प्रशासनाची टीम पोहोचली आहे. आंबेनळी घाट हा रायगड जिल्ह्यातील पोलादपूर पासून ते सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या मार्गावर कुंभरोशी ते पोलादपूरपर्यंत आहे. जावळीच्या घनदाट अरण्यात हा घाट येतो. हा राज्य महामार्ग क्र. ७२ असून एकूण ४० कि.मी. लांबीचा रस्ता आहे. घाटाची उंची सर्वसाधारणपणे ६२५ मी (२०५१ फूट) आहे.


रायगड पोलिसांचे पथक, पोलीस अधिकारी घटनास्थळी हजर आहेत. महाडचे पोलीस उपविभागीय अधिकारी शंकर काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता व पोलादपूरचे तहसीलदार कपिल घोरपडे व कर्मचारी जेसीबी व अन्य साहित्य घेऊन घटनास्थळजवळ हजर आहेत. मात्र या ठिकाणी छोटे मोठे दगड खाली येण्याचा प्रकार सुरूच आहे. आंबेनळी घाटाबाबत तालुका व जिल्हा प्रशासन आज चर्चा करून मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. तसेच महाडकडून पुण्याकडे जाणा-या वरंद घाटातील वाहतुकी बाबतही मोठा निर्णय घेतला जाणार आहे. या घाटातील अवजड वाहनांची वाहतूक बंद करावी, अशी शिफारस जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. या सगळ्या घडामोडींवर महाडचे महसूल उपविभागीय अधिकारी डॉ. बनापुरे हेही लक्ष ठेवून आहेत.


कोकणातील आणि महाबळेश्वरातील पर्यटन वाढल्यामुळे या घाटात गाड्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या घाटातील रस्ता धोकादायक वळणाचा असल्याने अपघाताचे प्रमाणही बरेच वाढले आहे. या घाटात काही वर्षांपूर्वी कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांच्या बसचा अपघात झाला होता. त्या दरम्यान एक वगळता सर्वांचा दरीत कोसळून मृत्यू झाला होता.



ताम्हिणी मार्गे प्रवास करण्याची सूचना


दरम्यान, रायगड पोलिसांकडून प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. पोलादपूरकडून महाबळेश्वरकडे जाणारा आंबेनळी घाटामध्ये कालिका माता पॉईंटजवळ दरड कोसळली असल्याने आंबेनळी घाट दोन्ही बाजूकडून वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आलेला आहे. प्रवाशांनी ताम्हिणी घाटातून जाणाऱ्या मर्गाचा अवलंब करावा, अशी सूचना रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केली आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Ashok Kharat Case Update: खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

नाशिक: अशोक खरातच्या भोंदूगिरीने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. हे प्रकरण बाहेर आल्यापासून नवनवे खुलासे

Ashok Kharat Case: अशोक खरात महिलांना कसं भुलवायचा?; तपासात धक्कादायक माहिती समोर

नाशिक: नाशिक जिल्ह्यातील अशोक खरात प्रकरणात रोज नवीन खुलासे समोर येत आहेत. अशोक खरात महिलांना टार्गेट करुन

मंत्री नितेश राणेंची विराट हिंदू संमेलनाला उपस्थिती; 'हिंदू एकतेची ऊर्जा आणि धर्माभिमान खरोखर प्रेरणादायी'

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे सकल हिंदू समाजाकडून विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले.

३० मार्च ते ४ एप्रिल दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाचे नवीन सत्र

मुंबई: ३० मार्चपासून राज्यात आभाळी हवामान आणि दुपारनंतर होणाऱ्या वादळी पावसाचे नवीन सत्र सुरू होण्याचा अंदाज

ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये मंत्री नितेश राणेंच्या ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’चा डंक

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदीप पी. यांनी स्वीकारले प्रशस्तिपत्र  मुंबई : प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक,

Crime News : यवतमाळ हादरले! अर्धवट जळालेल्या 'त्या' तरुणीच्या मृतदेहाचं गूढ उकललं; पहिला गळा आवळला अन् मृतदेह जाळून....

यवतमाळ : जोडमोहा शिवारातील तासलोट जंगलात १५ दिवसांपूर्वी एका २६ वर्षीय तरुणीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह