Maharashtra Update : आंबेनळी घाटात रात्री दरड कोसळली, वाहतूक ठप्प

ताम्हिणी मार्गे प्रवास करण्याची सूचना


पोलादपूर : आंबेनळी घाटात (Ambenali ghat) दोन दिवसांपासून दरड कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. मात्र आंबेनळी घाटात रात्री मोठी दरड कोसळल्याने वाहतूक पूर्ण ठप्प झाली आहे. कोसळलेल्या दरडीमुळे रस्त्याचा अर्ध्याहून अधिक भाग दरीत गेला आहे. घटनास्थळी अद्यापही दरड कोसळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरडीमुळे कोणतेही मोठे नुकसान झाले आहे किंवा कसे हे मात्र कळू शकलेले नाही. दरडी काढण्याचे काम सुरू आहे. यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे.


ज्या ठिकाणी दरड कोसळली आहे त्या ठिकाणी दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. आंबेनळी घाटाजवळ प्रतापगडाच्या पायथ्याजवळ पोलादपूर हद्दीत मोठी दरड कोसळली आहे. या घटनेची माहिती मिळातच पोलादपूर प्रशासनाची टीम पोहोचली आहे. आंबेनळी घाट हा रायगड जिल्ह्यातील पोलादपूर पासून ते सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या मार्गावर कुंभरोशी ते पोलादपूरपर्यंत आहे. जावळीच्या घनदाट अरण्यात हा घाट येतो. हा राज्य महामार्ग क्र. ७२ असून एकूण ४० कि.मी. लांबीचा रस्ता आहे. घाटाची उंची सर्वसाधारणपणे ६२५ मी (२०५१ फूट) आहे.


रायगड पोलिसांचे पथक, पोलीस अधिकारी घटनास्थळी हजर आहेत. महाडचे पोलीस उपविभागीय अधिकारी शंकर काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता व पोलादपूरचे तहसीलदार कपिल घोरपडे व कर्मचारी जेसीबी व अन्य साहित्य घेऊन घटनास्थळजवळ हजर आहेत. मात्र या ठिकाणी छोटे मोठे दगड खाली येण्याचा प्रकार सुरूच आहे. आंबेनळी घाटाबाबत तालुका व जिल्हा प्रशासन आज चर्चा करून मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. तसेच महाडकडून पुण्याकडे जाणा-या वरंद घाटातील वाहतुकी बाबतही मोठा निर्णय घेतला जाणार आहे. या घाटातील अवजड वाहनांची वाहतूक बंद करावी, अशी शिफारस जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. या सगळ्या घडामोडींवर महाडचे महसूल उपविभागीय अधिकारी डॉ. बनापुरे हेही लक्ष ठेवून आहेत.


कोकणातील आणि महाबळेश्वरातील पर्यटन वाढल्यामुळे या घाटात गाड्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या घाटातील रस्ता धोकादायक वळणाचा असल्याने अपघाताचे प्रमाणही बरेच वाढले आहे. या घाटात काही वर्षांपूर्वी कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांच्या बसचा अपघात झाला होता. त्या दरम्यान एक वगळता सर्वांचा दरीत कोसळून मृत्यू झाला होता.



ताम्हिणी मार्गे प्रवास करण्याची सूचना


दरम्यान, रायगड पोलिसांकडून प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. पोलादपूरकडून महाबळेश्वरकडे जाणारा आंबेनळी घाटामध्ये कालिका माता पॉईंटजवळ दरड कोसळली असल्याने आंबेनळी घाट दोन्ही बाजूकडून वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आलेला आहे. प्रवाशांनी ताम्हिणी घाटातून जाणाऱ्या मर्गाचा अवलंब करावा, अशी सूचना रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केली आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

विहिरीतील मोटार काढताना काळाचा घाला; धाराशिवमध्ये बाप-लेकासह चौघांचा दुर्दैवी मृत्यू

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथे घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र

‘या’ उमेदवारांना मत देणार नाही; नाशिकमधील गावकऱ्यांचा ठाम निर्णय

नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबड गावातील ग्रामस्थांची

Tragedy at Nagpur Bachelor Party : मैत्री की क्रूरता? पार्टीत अडथळा नको म्हणून बेशुद्ध मित्राला चादरीत गुंडाळून फेकून दिलं; बॅचलर पार्टीचा 'सैतानी' चेहरा समोर

नागपूर : नागपूर जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या मित्राच्या

आंदेकर कुटुंबिय उतरलं आगामी निवडणुकीच्या रिंगणात! कडक पोलीस बंदोबस्तात केला उमेदवारी अर्ज दाखल

पुणे: यावर्षीच्या गणपतीमध्ये झालेल्या आयुष कोमकर खून प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर न्यायालयीन

आधी मतांसाठी सोनं वाटलं, पराभवानंतर धमकी देत.... अन त्र्यंबकेश्वरमध्ये खळबळ

नाशिक : निवडणुकीपूर्वी ‘कुबेर’ बनून मतदारांवर सोन्याची बरसात करणारा उमेदवार, पराभवानंतर मात्र मतदारांच्या

कोरेगाव भीमा विजयी दिनानिमित्त पुण्यात वाहतुकीत बदल; कोणते पर्यायी मार्ग वापरावेत?

पुणे: कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी १ जानेवारीला लाखो अनुयायी पुण्यात येत असतात.