Rain Update: भिवंडीत मुसळधार पावसाने बाजारपेठ पाण्याखाली

सखल भागात शिरले तीन फूट पाणी


भिवंडी (वार्ताहर) : भिवंडी शहर व ग्रामीण भागात बुधवारी पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने पुन्हा एकदा शहरातील नालेसफाईची पोलखोल झाली आहे. गुरुवारी बकरी ईद व आषाढी एकादशी असल्याने शहरातील नागरिकांसह ग्रामीण भागातील नागरिक खरेदीसाठी भिवंडी शहरातील तीनबत्ती येथील भाजी मार्केट,मच्छी व चिकन मार्केट असलेल्या बाजारपेठ परिसरात रस्त्यावर २ ते ३ फुटांपर्यंत पाणी साचल्याने सर्वांचीच त्रेधातिरपीट उडाली.



येथील अनेक दुकानात पाणी शिरल्याने दुकानांमधील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. यासोबतच नदी नाका, म्हाडा कॉलनी, इदगाह, मंगल भवन, कमला हॉटेल, अंजूर फाटा या परिसरात सुध्दा मोठ्या प्रमाणा वर पाणी साचले होते.त्यामुळे या भागातील अनेक भागात दुकानांमध्ये पाणी शिरले. तर धामणकर नाका ते कल्याण नाका दरम्यान रस्त्या लगतच्या गटारींची सफाई न झाल्याने रस्त्यावर तीन फुटापर्यंत पाणी साचल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. तर पाणी शिरल्याने दुचाकी बंद पडल्या होत्या. सखल भागासह बाजारपेठेत पाणी शिरण्याला महानगर पालिका प्रशासनाने कोट्यवधी रूपये खर्च करून केलेली नालेसफाई झाली नसल्याचे खापर नागरिकांकडून फोडले जात आहे.

Comments
Add Comment

३ इडियट्सचे १६ वर्षे: ५ कारणे ज्यामुळे राजकुमार हिरानींचा 'हा' चित्रपट आजही तितकाच ताजा वाटतो

मुंबई : राजकुमार हिरानी हे मोजक्या अशा फिल्ममेकर्सपैकी आहेत, ज्यांच्या कथा केवळ मनोरंजन करत नाहीत, तर दीर्घकाळ

आधी रेकी, मग बुरखा घालून दरोडा; उच्चभ्रू परिसरात भरदिवसा चोरी

नवी मुंबई : नवी मुंबईतील सीवूड्स परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या सशस्त्र दरोड्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

चहा बनवण्याची योग्य पद्धत,पित्त व ॲसिडिटीच्या त्रासापासून मिळेल कायमची सुटका

मुंबईकरांच्या दिवसाची सुरुवाट होतो ती म्हणजे चहाने ... भारतातच नाही तर संपूर्ण जगात असंख्य असे चहा प्रेमी आहेत .

श्रीराम लाईफ इन्शुरन्समधून पिरामल फायनान्स बाहेर पडणार 'या' कारणामुळे,६०० कोटीचा एकूण सौदा जाहीर

मुंबई: पिरामल फायनान्स लिमिटेड (Piramal Finance Limited) कंपनीने श्रीराम लाईफ इन्शुरन्स कंपनीतील आपला संपूर्ण १४.७२% हिस्सा

या वर्षीचा ख्रिसमस ठरतोय खास का ? जाणून घेऊया कारण

अंकांचा अनोखा योग जुळून आला आहे .तारीख बघा २५ /१२/२५ आहे ना आश्चर्यकारक डिसेंबर महिना सुरु झाला की सर्वांना आतुरता

उच्च रक्तदाबाने हैराण झाला आहात? मग रोज खा सुकं खोबर

रोज जेवण बनवताना वेगवेगळ्या पदार्थांचा वापर केला जातो.त्यामध्ये आवर्जून वापरला जाणारा पदार्थ म्हणजे