Rain Update: भिवंडीत मुसळधार पावसाने बाजारपेठ पाण्याखाली

सखल भागात शिरले तीन फूट पाणी


भिवंडी (वार्ताहर) : भिवंडी शहर व ग्रामीण भागात बुधवारी पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने पुन्हा एकदा शहरातील नालेसफाईची पोलखोल झाली आहे. गुरुवारी बकरी ईद व आषाढी एकादशी असल्याने शहरातील नागरिकांसह ग्रामीण भागातील नागरिक खरेदीसाठी भिवंडी शहरातील तीनबत्ती येथील भाजी मार्केट,मच्छी व चिकन मार्केट असलेल्या बाजारपेठ परिसरात रस्त्यावर २ ते ३ फुटांपर्यंत पाणी साचल्याने सर्वांचीच त्रेधातिरपीट उडाली.



येथील अनेक दुकानात पाणी शिरल्याने दुकानांमधील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. यासोबतच नदी नाका, म्हाडा कॉलनी, इदगाह, मंगल भवन, कमला हॉटेल, अंजूर फाटा या परिसरात सुध्दा मोठ्या प्रमाणा वर पाणी साचले होते.त्यामुळे या भागातील अनेक भागात दुकानांमध्ये पाणी शिरले. तर धामणकर नाका ते कल्याण नाका दरम्यान रस्त्या लगतच्या गटारींची सफाई न झाल्याने रस्त्यावर तीन फुटापर्यंत पाणी साचल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. तर पाणी शिरल्याने दुचाकी बंद पडल्या होत्या. सखल भागासह बाजारपेठेत पाणी शिरण्याला महानगर पालिका प्रशासनाने कोट्यवधी रूपये खर्च करून केलेली नालेसफाई झाली नसल्याचे खापर नागरिकांकडून फोडले जात आहे.

Comments
Add Comment

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

आयपीएल 2026 : विराट कोहली बंगळूरुमध्ये दाखल

बंगळुरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा माजी कर्णधार आणि महान क्रिकेटपटू विराट कोहली आयपीएल २०२६ साठी संघात सामील

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु

मराठी कलाविश्वाचा सन्मान सोहळा; दिमाखात रंगला ‘चिरायू २०२६’

मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी आपण सगळेच सज्ज झाले आहोत.

Gyan Bharatam project : ज्ञानभारतम् प्रकल्पाची सुरुवात; देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ

मुंबई : भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेचा अमूल्य ठेवा असलेल्या हस्तलिखितांचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी