Rain Update: भिवंडीत मुसळधार पावसाने बाजारपेठ पाण्याखाली

सखल भागात शिरले तीन फूट पाणी


भिवंडी (वार्ताहर) : भिवंडी शहर व ग्रामीण भागात बुधवारी पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने पुन्हा एकदा शहरातील नालेसफाईची पोलखोल झाली आहे. गुरुवारी बकरी ईद व आषाढी एकादशी असल्याने शहरातील नागरिकांसह ग्रामीण भागातील नागरिक खरेदीसाठी भिवंडी शहरातील तीनबत्ती येथील भाजी मार्केट,मच्छी व चिकन मार्केट असलेल्या बाजारपेठ परिसरात रस्त्यावर २ ते ३ फुटांपर्यंत पाणी साचल्याने सर्वांचीच त्रेधातिरपीट उडाली.



येथील अनेक दुकानात पाणी शिरल्याने दुकानांमधील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. यासोबतच नदी नाका, म्हाडा कॉलनी, इदगाह, मंगल भवन, कमला हॉटेल, अंजूर फाटा या परिसरात सुध्दा मोठ्या प्रमाणा वर पाणी साचले होते.त्यामुळे या भागातील अनेक भागात दुकानांमध्ये पाणी शिरले. तर धामणकर नाका ते कल्याण नाका दरम्यान रस्त्या लगतच्या गटारींची सफाई न झाल्याने रस्त्यावर तीन फुटापर्यंत पाणी साचल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. तर पाणी शिरल्याने दुचाकी बंद पडल्या होत्या. सखल भागासह बाजारपेठेत पाणी शिरण्याला महानगर पालिका प्रशासनाने कोट्यवधी रूपये खर्च करून केलेली नालेसफाई झाली नसल्याचे खापर नागरिकांकडून फोडले जात आहे.

Comments
Add Comment

शिवजन्मभूमीचा विकास करणे आमचे भाग्य

जुन्नरला देशातील क्रमांक-१ पर्यटन तालुका करणार एमआयडीसी, आयटी पार्क चांगले रस्ते तयार करून जुन्नरचा कायापालट

नाशिकच्या ६२२ ग्रामपंचायतींमध्ये ‘प्रशासक राज’

नाशिक : यंदा मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ६२२ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात येणार आहे. सार्वत्रिक

राष्ट्रीय खोखोपटू सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेत प्रमुख अधिकारी (प्र) म्हणून नियुक्ती

मुंबई : राष्ट्रीय खोखोपटू तथा क्रीडा प्रसारक श्री. सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेच्या दुकाने व आस्थापना

kajol : मी मारण्यापूर्वी..., अभिनेत्री काजोलच खळबळजनक वक्तव्य

kajol : बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री काजोल ही प्रेक्षकांच्या मनावर आजही तेवढंच राज्य करते जेवढं ती आधी करत होती.

तुम्हाला माहित आहे का डार्क चॉकलेट खाण्याचे फायदे ?

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच चॉकलेट खायला आवडतं. सध्या बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट

Raj Thackeray: रस्ता बांधला आणि टोल वसुल केला इतकीच सरकारची जबाबदारी आहे का ?

मुंबई: मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जवळपास ३२ तास ठप्प होता. प्रवाशांचे कमालीचे हाल झाले. यानंतर नेहमीप्रमाणे