Ashadhi Wari : वाखरीत संतांचा मेळा! सर्व संतांच्या पालख्या आज पंढरीत दाखल होणार

  205

मानाच्या पालख्यांचे आज स्वागत करणार संत नामदेव आणि संत मुक्ताई


पंढरपूर : आषाढी महासोहळ्यासाठी (Ashadhi Wari) राज्यभरातून संतांचे पालखी सोहळे पायी पंढरीची वाट चालत आहेत. पहिली मानाची संत मुक्ताबाईंची पालखी पंढरीत दाखल झाली आहे. तर आज बुधवारी सर्व संतांच्या पालख्या पंढरीत दाखल होणार आहेत. या सर्व पालख्यांच्या स्वागतासाठी संत मुक्ताबाईंची पालखी आणि संत नामदेव महाराज पालखी वाखरी येथे जाणार आहेत. संत मुक्ताबाई या संत ज्ञानेश्वरांच्या लहान भगिनी. पंढरीत आलेल्या सर्व संताना भेटण्यासाठी संत नामदेव महाराज आतुर असतात. आपल्या भावंडांना भेटण्यासाठी ते लवकर उठतात आणि भेटीसाठी वाखरीला येतात. सर्व संतांना पाहून ते आनंदून जातात. त्याचेच प्रतीक म्हणून नामदेवांची पालखी पंढरपूरहून वाखरीला आणण्याची प्रथा आहे.



संत नामदेवरायांचे जन्मस्थळ आणि समाधीस्थळ पंढरपूरच आहे. त्यामुळे नामदेवरायांचा पालखी सोहळा आषाढी वारीसाठी निघत नाही. पंढरपूरला येणाऱ्या सर्व संतांच्या स्वागतासाठी मात्र नामदेवरायांची पालखी वाखरीला संतांना सामोरी जाते. त्यानंतर सर्व संतांसोबत नामदेवांची पालखी पंढरपूरला येते.


Pandharpur Wari

संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्यासह अनेक पालखी सोहळे अखेरच्या विसाव्यासाठी वाखरी पालखीतळावर आले असून जवळपास १४ ते १५ लाखांचा वारकरी समाज याठिकाणी जमणार आहे. दोन दिवस हे वारकरी इथे असून २८ जून रोजी सायंकाळी ते पंढरपूरमध्ये प्रवेश करतील. दरम्यान वाखरी पालखी तळावर यावर्षी पहिले मोठे महाआरोग्य शिबीर ठेवण्यात आले आहे. इथे २७ आणि २८ जून असे दोन दिवस लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची तपासणी होणार आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

आदिवासी जमिनींच्या गैरहस्तांतरणाची चौकशी होणार- चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : राज्यातील आदिवासींच्या जमिनींचे बिगर आदिवासींकडे झालेल्या गैरहस्तांतरणाच्या

पडळकरांनी सांगितलेलं 'ते' कॉकटेल घर तुम्हाला माहिती आहे का?

पडळकरांची 'कॉकटेल कुटुंब' टिप्पणी, पवारांना अप्रत्यक्ष

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात प्रथमच डिजिटल क्रांती ; AI तंत्रज्ञानासाठी ऐतिहासिक करार

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा पहिला करार! मंत्री

कल्याण पश्चिम परिसरात ऐन पावसाळ्यात कचऱ्यांचे ढीग, तीन दिवसांपासून घंटागाड्यांची प्रतीक्षा

कल्याण (प्रतिनिधी) : केडीएमसीने शहर स्वच्छ सुंदर असावे यासाठी कोट्यवधींची तरतूद केलेली असताना, कल्याण-डोंबिवली

वारीदरम्यान ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ

सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक

11th Admission: अकरावीच्या पहिल्या फेरीत सहा हजार विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले, कारण...

योग्य कागदपत्रे सादर न केल्याने, तसेच अर्जामध्ये चुका करण्यात आल्याने प्रवेश नाकारला मुंबई: राज्यात अकरावी