Ashadhi Wari : वाखरीत संतांचा मेळा! सर्व संतांच्या पालख्या आज पंढरीत दाखल होणार

  194

मानाच्या पालख्यांचे आज स्वागत करणार संत नामदेव आणि संत मुक्ताई


पंढरपूर : आषाढी महासोहळ्यासाठी (Ashadhi Wari) राज्यभरातून संतांचे पालखी सोहळे पायी पंढरीची वाट चालत आहेत. पहिली मानाची संत मुक्ताबाईंची पालखी पंढरीत दाखल झाली आहे. तर आज बुधवारी सर्व संतांच्या पालख्या पंढरीत दाखल होणार आहेत. या सर्व पालख्यांच्या स्वागतासाठी संत मुक्ताबाईंची पालखी आणि संत नामदेव महाराज पालखी वाखरी येथे जाणार आहेत. संत मुक्ताबाई या संत ज्ञानेश्वरांच्या लहान भगिनी. पंढरीत आलेल्या सर्व संताना भेटण्यासाठी संत नामदेव महाराज आतुर असतात. आपल्या भावंडांना भेटण्यासाठी ते लवकर उठतात आणि भेटीसाठी वाखरीला येतात. सर्व संतांना पाहून ते आनंदून जातात. त्याचेच प्रतीक म्हणून नामदेवांची पालखी पंढरपूरहून वाखरीला आणण्याची प्रथा आहे.



संत नामदेवरायांचे जन्मस्थळ आणि समाधीस्थळ पंढरपूरच आहे. त्यामुळे नामदेवरायांचा पालखी सोहळा आषाढी वारीसाठी निघत नाही. पंढरपूरला येणाऱ्या सर्व संतांच्या स्वागतासाठी मात्र नामदेवरायांची पालखी वाखरीला संतांना सामोरी जाते. त्यानंतर सर्व संतांसोबत नामदेवांची पालखी पंढरपूरला येते.


Pandharpur Wari

संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्यासह अनेक पालखी सोहळे अखेरच्या विसाव्यासाठी वाखरी पालखीतळावर आले असून जवळपास १४ ते १५ लाखांचा वारकरी समाज याठिकाणी जमणार आहे. दोन दिवस हे वारकरी इथे असून २८ जून रोजी सायंकाळी ते पंढरपूरमध्ये प्रवेश करतील. दरम्यान वाखरी पालखी तळावर यावर्षी पहिले मोठे महाआरोग्य शिबीर ठेवण्यात आले आहे. इथे २७ आणि २८ जून असे दोन दिवस लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची तपासणी होणार आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती

Eknath Shinde : लाडक्या बहिणीला 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन'चा आधार! उपचारासाठी किडनीग्रस्त महिलेला एकनाथ शिंदेंनी केली मदत

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित