ashadi ekadashi : आषाढी एकादशीसाठी रायगड आगाराच्या ५१ गाड्या

वारकऱ्यांच्या सुखकर प्रवासासाठी एसटी महामंडळ सज्ज



  • देवा पेरवी


पेण : आषाढी एकादशी निमित्त (ashadi ekadashi) आपल्या लाडक्या विठूरायाला भेटण्यासाठी लाखो वारकरी (Pandharichi Wari) यापूर्वीच मार्गस्थ झाले आहेत. तरी देखील पुढील दोन दिवसांत अनेक वारकरी पंढरपूरकडे रवाना होत असतात. हे वारकरी पंढरपूरकडे रवाना होत असताना त्यांची प्रवासाची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याचा विचार करून रायगड जिल्हा एसटी महामंडळाने रायगड जिल्हयातील आठ आगारातील ५१ गाड्या सज्ज ठेवल्या आहेत. यामध्ये स्वारगेट येथे ५० गाड्या रवाना करण्यात आल्या असून आयत्या वेळच्या पंढरपूर ग्रूप बुकिंगच्या माध्यमातून एक गाडी अशा एकूण ५१ गाड्या रायगड विभागीय एसटी महामंडळाने सज्ज ठेवल्या आहेत. वारकऱ्यांच्या सुखकर प्रवासासाठी एसटी महामंडळ सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे विभाग नियंत्रक दिपक घोडे यांनी सांगितले.


आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हणतात. हा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानण्यात येतो. पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकदशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकाद्शीला पायी चालत येतात. असे असले तरी अनेक वारकरी भगवंताच्या दर्शनासाठी विविध प्रकारच्या वाहनांनी देखील प्रवास करून पंढरपूर येथे रवाना होत असतात. त्यामुळे त्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये आणि प्रवास देखील सुखरूप व्हावा या दृष्टीने ज्या ठिकाणाहून वारकऱ्यांचा अधिक प्रवास होत असतो अशा ठिकाणी म्हणजेच स्वारगेट येथे रायगड जिल्हा एसटी महामंडळाने पन्नास गाड्या रवाना केल्या आहेत. तर एक बुकिंगची गाडी देखील रवाना होणार आहे.


एसटी महामंडळाने आजपर्यंत प्रत्येक सण-वारांना किंवा उत्सव, आपत्ती, लग्न समारंभ आदी गोष्टींसाठी बसेस उपलब्ध करून मोठी जबाबदारी पार पाडली आहे. आज देखील आषाढी एकादशीसाठी वारकऱ्यांची गैरसोय दूर व्हावी यासाठी एसटी महामंडळाने अधिकच्या बसेस देऊन पुढाकार घेतल्याने वारकरी मंडळी एसटी महामंडळाचे आभार मानत आहे.


वारकऱ्यांची पंढरपूर पर्यंत पोहोचण्याची गैरसोय दूर व्हावी यासाठी एसटी महामंडळाचा दरवर्षी सिंहाचा वाटा असतो. यावर्षी देखील त्यांनी चांगल्या प्रकारे नियोजन करून वारकऱ्यांना प्रवासात कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची दक्षता घेतली असून जादा गाड्या सज्ज ठेवल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे आम्ही स्वागत करत आहोत. - ह. भ. प. अमित महाराज - बळवली


 
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Dhurandhar 2 ; Virushka : वीरूष्काला पडली धुरंधर २ ची भुरळ; इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत.....

मुंबई : धुरंधर या चित्रपटाने सर्वानाच भुरळ पाडली आहे. पहिल्या भागाने जोरदार कमाई करत. भारतीयांच्या लोकांच्या

देवेंद्र फडणवीसांच्या एका कॉलनं बदलला निर्णय, प्राजक्त तनपुरेंनी राहुरी पोटनिवडणुकीतून घेतली माघार

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार अर्ज भरण्याची मुदत सोमवारी संपुष्टात आली आहे. या निवडणुकीत दिवंगत

Nagpur Crime : नागपूर हादरलं! पैशांसाठी १४ वर्षीय मित्राची निघृण हत्या

नागपूर : नागपूर शहरात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. शहराला हादरवून सोडणाऱ्या १४ वर्षीय मुलाच्या अपहरण आणि

Gautami patil : गौतमी पाटीलच्या 'या' नवीन गाण्यानं घातला धूमाकूळ

मुंबई : आपल्या मनमोहक अदांनी प्रेक्षकांची मनं जिंकणारी महाराष्ट्राची लाडकी नृत्यागंणा गौतमी पाटील ( Gautami Patil ) चा

Gautami Patil : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर गौतमी पाटीलनं दिली प्रतिक्रिया, म्हणाली...

नाशिक : नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरातचे दिवसेंदिवस अनेक काळे कारनामे समोर येत असून महिला लैंगिक शोषण, आर्थिक

Bigg Boss Marathi 6 : पहिला फायनलिस्ट कोण ठरणार ? तिकीट टू फिनालेची उत्सुकता वाढली

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सीझन आता शेवटच्या टप्प्यात पोहचलं असून ११ जानेवारी २०२५ रोजी सुरु झालेल्या बिग बॉस मराठी