मुंबई : मुंबईच्या (Mumbai) बोरिवली (Borivali News) पूर्वेतील अभिनव नगर परिसरात राहणा-या ठाकरे गटाचे माजी नगरसेवक भास्कर खुरसंगे (Bhaskar Khursunge) व रिद्धी खुरसंगे (Riddhi Khursunge) यांच्या घरात घुसून अज्ञातांनी त्यांच्या पुतणीवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना काल घडली. या हल्ल्यात पुतणी गंभीर जखमी झाली असून उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, या हल्ल्याबाबत शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांना माहिती मिळताच ते तात्काळ खुरसंगे यांच्या मदतीला धावून आले.
शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी रुग्णालयात जाऊन रिद्धी खुरसंगे यांच्या पुतणीची भेट घेतली आणि तिच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच, त्यांनी घडलेल्या धक्कादायक घटनेचा तपास करुन आरोपींच्या विरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
ठाकरे गटाचे माजी नगरसेवक भास्कर खुरसंगे व रिद्धी खुरसंगे यांच्या तिसऱ्या मजल्यावरील घरात सोमवारी २६ जूनला पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात तरुणांनी घुसून हल्ला केला. या हल्ल्यात त्यांची पुतणी विथिका हिचा गळा आवळून तिच्या छातीवर पोटांवर आणि मांड्यांवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला.
एकीकडे ठाकरे गट आणि शिवसेनेत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु असतानाच शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे ठाकरे गटाच्या माजी नगरसेविकेच्या मदतीला धावून गेल्याने शिवसेनेची मान उंचावली आहे. खरा शिवसैनिक कोणताही दुजाभाव न बाळगता थेट मदतीला धावून जातो, हे यातून दिसून आले.
या हल्ल्यामागे कोणाचा हात आहे, याबद्दल माहिती मिळू शकलेली नाही त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात महिला सुरक्षित आहेत की नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आज सकाळीच दर्शना पवार प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता राहिली. एमपीएससी करणा-या एका तरुणीवर तिच्या मित्राने एकतर्फी प्रेमातून कोयत्याने वार केला. त्यात कालच रिद्धी खुरसंगे यांच्या पुतणीवरील हल्ल्यामुळे राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
श्रीनगर : सलग तीन दिवस जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. लडाख या केंद्राशासित भागात…
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…
मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…