मुंबई : मुंबईत पावसामुळे रविवारी (Mumbai Rain) दोन इमारती कोसळल्याच्या घटना घडल्या. यामध्ये विद्याविहारमधील (Vidyavihar Building Collapse) तीन मजली प्रशांत निवास इमारत दुर्घटनेत कालच दोघांचा मृत्यू झाला होता. तर तब्बल २० तासांच्या अथक प्रयत्नानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्यात यश आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अलका पालांडे आणि नरेश पालांडे अशी मृतांची नावे आहेत.
तर विले पार्ले येथे रविवारी दुपारी अडीच वाजता एका इमारतीचा भाग कोसळला. यामध्ये ६५ वर्षीय प्रिशिला मिसाईटा आणि ७० वर्षीय रोबी मिसाईटा या दोन जणींचा मृत्यू झाला. तर तीन जण जखमी आहेत. त्यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर आहे.
पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाली. अनेक ठिकाणी पाणी साचले. विद्याविहारमधील इमारत कोसळली. त्यानंतर तब्बल २० तास एनडीआरएफचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते २० तास ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्यात त्यांना यश आले. दोघांवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…