Ashish Shelar : 'मातोश्रीच्या बाहेरच्या डबक्यात कागदी होड्या सोडायच्या वयात हे... इन्हे कोई लौटा दो बचपन का सावन'

  172

आशिष शेलारांची आदित्य ठाकरेंवर खोचक टीका


मुंबई : मुंबईत पहिल्याच पावसात पाणी तुंबल्यावरुन भाजप (BJP) आणि ठाकरे गटात (Thackeray Gat) चांगलेच राजकारण तापले आहे. ठाकरे गटाकडून नालेसफाईवर टीका करण्यात येत आहे तर भाजपचे नेते यावर आक्रमक होऊन आपली भूमिका मांडत आहेत. यातच ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) नालेसफाई झाली नसल्याचा आरोप केला. यावर भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ट्विटद्वारे आदित्य ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली.


'तमाशामधील आबुराव आणि बाबुराव एकापेक्षा एक फेकम फाक करुन मनोरंजन करतात. उबाठाचे विश्वविख्यात प्रवक्ते आबुरावपेक्षा कमी नाहीत. काल मातोश्रीच्या युवराजांनी बाबुरावची जागा घेतली', असं म्हणत आशिष शेलारांनी आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवली.



युवराज मुंबईची आकडेवारी सांगतात की चेरापुंजीची?

पुढे आदित्य ठाकरेंच्या पत्रकार परिषदेची एक व्हिडीओ क्लिप शेअर करत आशिष शेलार म्हणाले की, 'म्हणे, त्यांच्या कार्यकाळात मुंबईत एका तासाला ४०० मिमी पाऊस झाला, त्याचे यशस्वी व्यवस्थापन त्यांनी केले. मुंबईत एका तासात ४०० मिमी? कधी एवढा पाऊस पडला? युवराज मुंबईची आकडेवारी सांगतात, की चेरापुंजीची? मुंबईत २६ जुलै २००५ ला पण एवढा पाऊस एका तासात झाला नव्हता.' यामुळे आदित्य ठाकरेंच्या आपल्या कार्यकाळाच्या वेळी ४०० मिमी प्रतितास पाऊस होत होता, तेव्हा मी, महापौर किंवा उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरुन लोकांचे प्रश्न सोडवत होतो, या विधानाला आशिष शेलारांनी चपराक लगावली आहे.





इन्हे कोई लौटा दो बचपन का सावन

आशिष शेलार यांनी पुढे म्हटले की, 'यांची फेकंम् फाक तर त्या आबुराव, बाबुरावपेक्षा ही भयंकर! मुंबईकर हो, दोष युवराजांचा नाही, मातोश्रीच्या बाहेरच्या डबक्यात कागदी होड्या सोडायच्या वयात हे मुंबईच्या पावसावर बोलणार तर असेच होणार ना? म्हणून युवराजांसाठी आमची प्रार्थना... इन्हे कोई लौटा दो बचपन का सावन, वो काग़ज़ कि कश्ती, वो बारिश का पानी!' या शब्दांत आशिष शेलारांनी आदित्य ठाकरेंचा समाचार घेतला.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

आठवा वेतन आयोग लवकरच

केंद्र सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मिळणार दिलासा मुंबई : देशभरातील सुमारे एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी

रक्षाबंधन २०२५: 'या' वेळेत चुकूनही बांधू नका राखी

मुंबई: भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण २०२५ मध्ये शनिवार, ९ ऑगस्टला साजरा केला जाईल. या

खड्डा विरहित मंडप उभारण्याची अट कायम, पालिकेने सूचवले आधुनिक तंत्रज्ञान

मुंबई (प्रतिनिधी): गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यांवरील वाढीव दंड आकारण्याचा निर्णय मुंबई

शाळांमध्ये १४ ऑगस्टपासून पसायदानाचे पठण

संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुंबई (प्रतिनिधी) :

ऑनलाईन लोनच्या नावाखाली तरुणीची फसवणूक, अश्लील फोटो केले व्हायरल

मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरी भागात राहणाऱ्या तरुणीची ऑनलाइन फसवणूक करून तिचे अश्लील फोटो नातेवाईकांना

इंडिगोची ‘हॅपी इंडिगो डे सेल’ घोषणा, देशांतर्गत प्रवास १,२१९ पासून तर आंतरराष्ट्रीय ४,३१९ पासून

मुंबई: इंडिगोने आपल्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘हॅपी इंडिगो डे सेल’ची घोषणा केली आहे. प्रवाशांना केवळ ₹१,२१९