Ashish Shelar : 'मातोश्रीच्या बाहेरच्या डबक्यात कागदी होड्या सोडायच्या वयात हे... इन्हे कोई लौटा दो बचपन का सावन'

  169

आशिष शेलारांची आदित्य ठाकरेंवर खोचक टीका


मुंबई : मुंबईत पहिल्याच पावसात पाणी तुंबल्यावरुन भाजप (BJP) आणि ठाकरे गटात (Thackeray Gat) चांगलेच राजकारण तापले आहे. ठाकरे गटाकडून नालेसफाईवर टीका करण्यात येत आहे तर भाजपचे नेते यावर आक्रमक होऊन आपली भूमिका मांडत आहेत. यातच ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) नालेसफाई झाली नसल्याचा आरोप केला. यावर भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ट्विटद्वारे आदित्य ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली.


'तमाशामधील आबुराव आणि बाबुराव एकापेक्षा एक फेकम फाक करुन मनोरंजन करतात. उबाठाचे विश्वविख्यात प्रवक्ते आबुरावपेक्षा कमी नाहीत. काल मातोश्रीच्या युवराजांनी बाबुरावची जागा घेतली', असं म्हणत आशिष शेलारांनी आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवली.



युवराज मुंबईची आकडेवारी सांगतात की चेरापुंजीची?

पुढे आदित्य ठाकरेंच्या पत्रकार परिषदेची एक व्हिडीओ क्लिप शेअर करत आशिष शेलार म्हणाले की, 'म्हणे, त्यांच्या कार्यकाळात मुंबईत एका तासाला ४०० मिमी पाऊस झाला, त्याचे यशस्वी व्यवस्थापन त्यांनी केले. मुंबईत एका तासात ४०० मिमी? कधी एवढा पाऊस पडला? युवराज मुंबईची आकडेवारी सांगतात, की चेरापुंजीची? मुंबईत २६ जुलै २००५ ला पण एवढा पाऊस एका तासात झाला नव्हता.' यामुळे आदित्य ठाकरेंच्या आपल्या कार्यकाळाच्या वेळी ४०० मिमी प्रतितास पाऊस होत होता, तेव्हा मी, महापौर किंवा उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरुन लोकांचे प्रश्न सोडवत होतो, या विधानाला आशिष शेलारांनी चपराक लगावली आहे.





इन्हे कोई लौटा दो बचपन का सावन

आशिष शेलार यांनी पुढे म्हटले की, 'यांची फेकंम् फाक तर त्या आबुराव, बाबुरावपेक्षा ही भयंकर! मुंबईकर हो, दोष युवराजांचा नाही, मातोश्रीच्या बाहेरच्या डबक्यात कागदी होड्या सोडायच्या वयात हे मुंबईच्या पावसावर बोलणार तर असेच होणार ना? म्हणून युवराजांसाठी आमची प्रार्थना... इन्हे कोई लौटा दो बचपन का सावन, वो काग़ज़ कि कश्ती, वो बारिश का पानी!' या शब्दांत आशिष शेलारांनी आदित्य ठाकरेंचा समाचार घेतला.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

ST : राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर (भंगार केंद्र) एसटीच्या जागेवर उभारले जाणार, 'एसटी'साठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत...

मुंबई : एसटी विभागीतल जुनी वाहने  स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुन्हा वापरात येणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची

पुढील दोन दिवस महत्त्वाचे! मुंबई, पुणे, दक्षिण कोकणसह राज्याच्या 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता, IMDचा ॲलर्ट

मुंबई : मुंबईमध्ये शुक्रवारी पावसाची उपस्थिती दिलासादायक होती. वीकेंडला एक-दोन ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

दिलासादायक! मुंबईत कोविड शून्य रुग्ण नोंद

कोविड सदृश्य अथवा तत्सम लक्षणे आढळल्यास कृपया योग्य ती काळजी घ्यावी : बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाचे