पंढरपूर (वृत्तसंस्था) : ‘बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव, तुकाराम, पंढरीनाथ महाराज कि जय’ च्या जयघोषाने खुडूस (Khudus) येथील माउलींचे रिंगण (Ringan) पार पडले. यावेळी अतिशय शिस्तबद्ध आणि उत्साह संचारलेला दिसला. दुसरीकडे तुकोबारायांच्या पालखीचे माळीनगर (Malinagar) येथे उभे रिंगण संपन्न झाले. दरम्यान, सोमवारी माउलींची आणि सोपानदेव यांची बंधुभेट होऊन पालखी भंडीशेगाव येथे मुक्कमी असणार आहे. तर संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा प्रवेश पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली येथे राहणार आहे. आता भाविकांना सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची (Vitthal Darshan) आस लागली आहे.
माउलींची पालखी माळशिरस येथून प्रस्थान ठेवून खुडूस फाटा येथे रविवारी सकाळी पोहोचली. येथील मैदानावर माउलीच्या पालखीचे दुसरे रिंगण संपन्न झाले. भव्य मैदानावर गोलाकार भाविकांची गर्दी दिसून आली. हातात भगवी पताका, टाळ मृदुंगाचा , हरीनामाचा जयघोष आणि रिंगण सोहळा पाहण्याची उत्सुकता भाविकांना लागली होती. रिंगणाच्या ठिकाणी माउलीची पालखी विराजमान झाली. त्यानंतर माउलींचे अश्व आले. चोपदाराने इशारा करताच उपस्थित भाविकांनी ‘बोला पुंडली वरदे’चा जयघोष केला. टाळ – मृदुंग आणि ‘माउली माउली’ च्या जयजयकाराने आसमंत दुमदुमून गेला आणि अश्वाने गोल फेरी पूर्ण केली. त्यानंतर पालखी सोहळा वेळापूर येथे विसावला. माउलीची पालखी सोमवारी वेळापूर येथून प्रस्थान ठेवून ठाकुरबुवा समाधी येथे तिसरे गोल रिंगण आणि टप्पा येथे संत सोपानदेव यांची बंधुभेट करून भंडीशेगाव येथे मुक्कमी असणार आहे.
तर दुसरीकडे जगद्गुरू तुकारम महारज यांच्या पालखीने अकलूज येथून प्रस्थान ठेवले आणि पालखी माळीनगर येथे पोहोचली. या ठिकाणी उभे रिंगण पार पडले. तुकोबारायाचा नगारखाना त्यानंतर पालखी आणि पाठोपाठ अश्व आले. दुतर्फा भाविकांनी रांगा लावल्या होत्या. विठ्ठल विठ्ठलच्या जयघोषात अश्वाने उभी दौड पूर्ण करून पालखीला नमस्कार करून रिंगण सोहळा संपन्न झाला. या नंतर विविध खेळ खेळून भाविकांनी मनमुराद आनद घेतला. या नंतर पालखी बोरगाव येथे मुक्कमी पोहचली. आज पालखी पंढरपूर तालुक्यात प्रवेश करून पिराची कुरोली येथे मुक्कमी असणार आहे.
मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…
मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…
मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…
थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…
मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…