Pandharichi Wari : शिंदे-फडणवीस सरकारच्या 'या' निर्णयाचे वारकर्‍यांकडून जोरदार स्वागत

इतिहासात पहिल्यांदाच शासकीय महापूजा सुरु असताना मुखदर्शन सुरु ठेवण्याचा निर्णय


कोणालाही व्हीआयपी एंट्री (VIP Entry) मिळणार नाही


पंढरपूर : राज्यभरातून लाखो वारकरी तहानभूक विसरुन विठू माऊलीच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या वारीत सहभागी होत असतात. विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागलेल्या या वारकर्‍यांना आषाढी एकादशीदिवशी (Aashadhi Ekadashi) होणार्‍या शासकीय पुजेमुळे मात्र बराच काळ ताटकळत थांबावे लागते. पण यंदाच्या शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde - Fadanvis Government) एवढी पायपीट करुन येणार्‍या सर्व माऊलींना बाहेर थांबवून शासकीय महापूजा आटोपण्याची गोष्ट पटली नाही आणि महापूजा सुरु असतानादेखील मुखदर्शन सुरु ठेवण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय इतिहासात पहिल्यांदाच शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा निर्णय जाहीर केला. या निर्णयाचे वारकरी संप्रदायातून जोरदार स्वागत होत आहे.


यापूर्वी विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा सुरू व्हायच्या चार तास आधीच दर्शनाची रांग बंद करण्यात यायची. आषाढी एकादशीला मुख्यमंत्री पहाटे अडीच वाजता पूजेला येतात आणि जवळपास पहाटे पाचपर्यंत विठ्ठल रुक्मिणीची शासकीय पूजा आणि सत्कार कार्यक्रम मंदिरात पार पडतो. परंतु रांगेतला कालावधी चार तासांनी वाढल्याने वारकऱ्यांची मोठी गैरसोय होते. त्यामुळेच आषाढी एकादशी वारीतील या पर्वणीच्या दिवशी दिवसभर दर्शनाची वाट पाहणा-या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. इतिहासात पहिल्यांदाच अशी व्यवस्था केल्याने या वेळात जवळपास दीड ते दोन लाख भाविकांना विठ्ठलाचे मुखदर्शन होणार आहे.



कोणालाही व्हीआयपी एंट्री (VIP Entry) मिळणार नाही

याआधी शासकीय पूजा पार पडल्यानंतरही राज्यभरातील आमदार, खासदार, मंत्री, अधिकारी आणि त्यांचे कार्यकर्ते व्हीआयपी बनून दर्शन घेण्यासाठी गर्दी करत. त्यामुळे रांगेतील शेकडो भाविकांना आणखी काही काळ ताटकळत राहावे लागे. याबाबतदेखील शिंदे-फडणवीस सरकारने एक धाडसी निर्णय घेतला आहे. यानुसार आषाढी एकादशीला केवळ दर्शन रांगेतील भाविकांनाच विठ्ठलाचे दर्शन घेता येणार आहे. कोणतेही व्हीआयपी दर्शन पासेस वितरित करू दिले जाणार नसल्याचे महसूलमंत्री विखे पाटील यांनी आजच्या घोषणेत म्हटले.


यामुळे एकादशी दिवशी दिवसभर दर्शनासाठी घुसखोरी करणाऱ्या तथाकथित राजकारण्यांना मात्र चांगलाच चाप बसणार आहे. आषाढी एकादशीला व्हीआयपी बंदीची संपूर्ण व्यवस्था पोलिसांच्या ताब्यात दिली जाणार असल्याने मंदिर प्रशासन देखील यात हस्तक्षेप करू शकणार नाही. या निर्णयामुळे वारकरी संप्रदाय सुखावला आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Pune Nasrapur Girl Murder Case : नसरापूर प्रकरणातील मोठी अपडेट! १५ दिवसांत ११०० पानांचं आरोपपत्र, नराधमाला फाशीची शक्यता वाढली

पुणे : महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुरडी अत्याचार आणि हत्या प्रकरणात आता

Blinkit News : ऑनलाईन फूड डिलिव्हरीचा धक्कादायक प्रकार; एक्स्पायर मटकी पोहोचल्याने संताप

अकोला : ऑनलाईन फूड डिलिव्हरीच्या वाढत्या वापरामुळे ग्राहकांना घरबसल्या सुविधा मिळत असल्या, तरी याच सेवांच्या

Operation Antim Prahaar अंतर्गत ८ नक्षलवाद्यांना अटक, गडचिरोली जिल्हा अखेर नक्षलमुक्त

गडचिरोली : नक्षलवादी चळवळीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी राबविलेल्या 'ऑपरेशन अंतिम प्रहार' या

Kolhapur Sucide Case : पत्नी आणि दोन मुलांच्या मृत्यूचा धक्का सहन झाला नाही; पुईखडी घाटात विराट गौतम यांची आत्महत्या

कोल्हापूर : कोल्हापुरातील एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण शहर हळहळून गेलं आहे. पत्नी आणि दोन मुलांना अपघातात

Teachers : निवडणुकीसह विविध कार्यालयांमध्ये प्रतिनियुक्तीवर गेलेल्या शिक्षकांना पुन्हा वर्गावर धाडणार

शिक्षण संचालनालयाद्वारे परिपत्रक केले जारी मुंबई : मुंबईसह राज्यातील काही भागांमधील शिक्षक हे

Nagpur-Madgaon Biweekly Train Regular : कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! नागपूर-मडगाव द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस आता नियमित धावणार

कोकण : मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये तसेच भविष्यातही कोकणात ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारा