Asaduddin Owaisi : विरोधीपक्षांच्या बैठकीवर एमआयएम नाराज; ओवेसींनीही घेतले तोंडसूख म्हणाले...

  107

छत्रपती संभाजीनगर : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व विरोधक भाजपला हरवण्यासाठी काल एकत्र आले होते. या बैठकीवरुन आम आदमी पार्टीने जाहीर नाराजी व्यक्त केल्यानंतर आता एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी दोखिल नाराजी व्यक्त करत तोंडसूख घेतले. ते आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आले होते, त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या बैठकीवरुन नाराजी व्यक्त केली.


असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, आमच्यावर विरोधकांचा विश्वास आहे की नाही माहित नाही, पण आम्हाला दुर्लक्षित केलं हे बरोबर नाही, असं म्हणत असदुद्दीन ओवेसी यांनी आपली नाराजी व्यक्त केली. त्याचवेळी मी स्वतःहून त्यांच्या बैठकीत जाणार नाही, भाजपाला हरवण्यासाठी अजेंडा गरजेचा आहे, असंही यावेळी असदुद्दीन ओवेसी म्हणाले.


छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी देखील विरोधकांच्या बैठकीला एमआयएमला न बोलवण्यावरुन नाराजी व्यक्त केली आहे. पाटण्याच्या बैठकीत एमआयएमला बोलवलं नाही. भाजपला हरवण्यासाठी एमआयएमला दुर्लक्षित करुन चालणार नाही. आम्हाला दुर्लक्षित करुन चालणार नाही, आम्हाला बोलवा आम्ही बैठकीला येऊ, असे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.


दरम्यान, असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यावर जोरदार टीका केली आहे. त्याचवेळी ओवेसी म्हणाले की, आम्हालाही वाटतं भारत अमेरिकेचे संबंध चांगले व्हावेत. पण पंतप्रधान मोदींनी तिकडे परदेशात पत्रकारांशी संवाद न साधता दिल्लीत साधावा. भारतामध्ये अल्पसंख्यांकांवर अन्याय होत नाही असं त्या ठिकाणी सांगितलं पण मग मणिपूरमध्ये चर्च जाळली गेली त्याचं काय असा सवालही यावेळी ओवेसी यांनी केला.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या